शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

सात महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजनेची बैठकच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2015 02:15 IST

तालुक्यात गत सात महिन्यापासून संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेची बैठक झालेली नाही.

लाभार्थ्यांना प्रतीक्षा : ३०० अर्ज प्रलंबितकारंजा (घा.) : तालुक्यात गत सात महिन्यापासून संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेची बैठक झालेली नाही. त्यामुळे गरीब, ज्येष्ठ निराधार नागरिक, बैठक केव्हा होणार आणि आपली निवड होवून आर्थिक लाभ केव्हा मिळणार याची प्रतीक्षा करीत आहे. विधानसभा निवडणूक होवून सात ते आठ महिन्यांचा कालावधी लोटला. अद्याप भाजपा सरकारद्वारे संजय गांधी निराधार समितीचे गठन करण्यात आले नाही. यावरून या सरकारला गरीब जनतेच्या हिताची काळजी किती याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पालकमंत्र्यांनी त्वरित, समिती गठन करून गोरगरिबांना आर्थिक लाभ द्यावा, अशी मागणी तालुक्यातील ज्येष्ठ व निराधार नागरिक करीत आहे.२० डिसेंबर २०१४ रोजी जुन्या समितीची शेवटची सभा झाली. त्यानंतर भाजपा सरकार सत्तेवर आले. जुनी समिती बरखास्त झाली. पण नवीन समिती गठन करण्यात आली नाही. संजय गांधी व श्रावण बाळ योजनेंतर्गत जवळपास ३०० लाभार्र्थ्यांचे अर्ज प्रलंबित आहे. वास्तविक पाहता काही अपरिहार्य कारणास्तव समिती जर गठित झाली नाही, तर एसडीओच्या आदेशाने तहसीलदारांना विशेष बैठक घेवून लाभार्थ्यांची निवड करता येते, पण तहसील प्रशासनाने तशी तसदी घेतली नाही. एस.डी.ओ. आर्वी यांनी याकडे लक्ष घालून निराधाराची समस्या सोडवावी, अशी अपेक्षा आहे.(तालुका प्रतिनिधी)