शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
3
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
4
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
5
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
6
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
7
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
8
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
9
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
10
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
11
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
12
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
13
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
14
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
15
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
16
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
17
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
18
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
19
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
20
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”

सात महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजनेची बैठकच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2015 02:15 IST

तालुक्यात गत सात महिन्यापासून संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेची बैठक झालेली नाही.

लाभार्थ्यांना प्रतीक्षा : ३०० अर्ज प्रलंबितकारंजा (घा.) : तालुक्यात गत सात महिन्यापासून संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेची बैठक झालेली नाही. त्यामुळे गरीब, ज्येष्ठ निराधार नागरिक, बैठक केव्हा होणार आणि आपली निवड होवून आर्थिक लाभ केव्हा मिळणार याची प्रतीक्षा करीत आहे. विधानसभा निवडणूक होवून सात ते आठ महिन्यांचा कालावधी लोटला. अद्याप भाजपा सरकारद्वारे संजय गांधी निराधार समितीचे गठन करण्यात आले नाही. यावरून या सरकारला गरीब जनतेच्या हिताची काळजी किती याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पालकमंत्र्यांनी त्वरित, समिती गठन करून गोरगरिबांना आर्थिक लाभ द्यावा, अशी मागणी तालुक्यातील ज्येष्ठ व निराधार नागरिक करीत आहे.२० डिसेंबर २०१४ रोजी जुन्या समितीची शेवटची सभा झाली. त्यानंतर भाजपा सरकार सत्तेवर आले. जुनी समिती बरखास्त झाली. पण नवीन समिती गठन करण्यात आली नाही. संजय गांधी व श्रावण बाळ योजनेंतर्गत जवळपास ३०० लाभार्र्थ्यांचे अर्ज प्रलंबित आहे. वास्तविक पाहता काही अपरिहार्य कारणास्तव समिती जर गठित झाली नाही, तर एसडीओच्या आदेशाने तहसीलदारांना विशेष बैठक घेवून लाभार्थ्यांची निवड करता येते, पण तहसील प्रशासनाने तशी तसदी घेतली नाही. एस.डी.ओ. आर्वी यांनी याकडे लक्ष घालून निराधाराची समस्या सोडवावी, अशी अपेक्षा आहे.(तालुका प्रतिनिधी)