शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

७५ लाख खर्चूनही पाण्याचा थेंब नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 23:53 IST

बाकळी नदीवर ७५ लाख रुपये खर्च करून जलसंधारण विभागाने बंधाऱ्याचे बांधकाम केले; पण नियोजनाचा अभाव असल्याने या बंधााऱ्यात थेंबभरही पाणी दिसत नाही. यामुळे शासनाच्या निधीचा अपव्यय झाल्याचेच दिसून येत आहे.

अमोल सोटे।लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (श.) : बाकळी नदीवर ७५ लाख रुपये खर्च करून जलसंधारण विभागाने बंधाऱ्याचे बांधकाम केले; पण नियोजनाचा अभाव असल्याने या बंधााऱ्यात थेंबभरही पाणी दिसत नाही. यामुळे शासनाच्या निधीचा अपव्यय झाल्याचेच दिसून येत आहे.आष्टी शहरातील मुलभूत सुविधा व स्मारकासाठी अर्थमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पाच कोटी रुपयांचा निधी दिला होता. यातून तीन कोटींच्या आराखड्यात बाकळी नदीवरील पुलाचा समावेश होता. उर्वरित निधी रस्ते, नाल्याची संरक्षण भिंत, टेकडीवरील इदगाह फ्लोरिंग, स्मशानभूमीचे बांधकाम यावर खर्च करण्यात आले. बाकळी नदीवर बांधलेला बंधारा वजा पुलासाठी ७५ लाख रुपये खर्च केले. यातील ४० लाख खोदकामावर खर्च करून प्रचंड उधळपट्टी करण्यात आली. पुलाचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले. कॉक्रीटचा वरील भाग आतापासूनच उखडत चालला आहे.गणेशतीर्थावर जाण्यासाठी असलेला रस्ता बूजविला असून उर्वरित रस्त्यावर काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. नगरपंचायत हद्दीत असलेली विद्युत लाईनचे नुकसान करण्यात आले आहे. या कामामुळे पाईपलाईन अनेक ठिकाणी फुटली आहे. यामुळे आष्टीत दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. केवळ देखावा निर्माण करून निधीची अफरातफर जलसंधारण विभागाकडून केली जात असल्याचे दिसते.संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत पाहणी करावी. बंधाऱ्याच्या बांधकामाची सखोल चौकशी करावी. तथा शासनाच्या निधीचा अपव्यय केल्या प्रकरणी संबंधितांवर कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.बंधारा वजा पुलाची डागडुजी विहित मुदतीत करावी. तोपर्यंत सुरक्षा ठेव रक्कम अदा करू नये. नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कंत्राटदारावर कारवाईचा ठराव घ्यावा. जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त भेट देऊन पाहणी करावी. ग्रामस्थांना असलेल्या सर्व समस्या मार्गी लावाव्यात, अन्यथा उपोषण करू असा इशारा नगरसेवक लेकुरवाळे यांनी तक्रारीतून दिला आहे.

टॅग्स :Waterपाणी