शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

समुद्रपुरात पिण्याचे पाणी नाही

By admin | Updated: May 28, 2017 00:22 IST

नगर पंचायतच्या लहरी कारभाराने कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याने शहरातील तीन प्रभागातील नागरिकांची पाण्याकरिता भटकंती होत आहे.

नागरिकांची भटकंती : टँकरणे पाणी पुरवठ्याची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क समुद्रपूर : नगर पंचायतच्या लहरी कारभाराने कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याने शहरातील तीन प्रभागातील नागरिकांची पाण्याकरिता भटकंती होत आहे. या प्रभागातील नागरिकांना मागील पाच दिवसांपासून पिण्याचेही पाणी मिळाले नाही. यामुळे नागरिकांची भटकंती होत असून पाण्याकरिता हाहाकार माजला आहे. चार दशकांपूर्वी बांधलेली येथील पाण्याची टाकी जीर्ण झाली आहे. तसेच शहराच्या लोकसंख्येत वाढ झाली आहे. यामुळे अस्तित्त्वात असलेली पाणी पुरविण्याची व्यवस्था तोकडी पडत आहे. यामुळे नागरिकांना पाण्याकरिता भटकावे लागत आहे. तत्कालीन सरपंच स्व. वसंतराव निखाडे यांनी तत्कालीन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे येथे शासन असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची नळ योजना मंजूर करून घेतली; पण त्या योजनेचे पाणी टाकीत पोहोचले नाही. यामुळे येथील स्मशानभूमित एक बोर खोदले. त्याला पाणी लागले. ते पाणी विहिरीत घेत जनतेला पुरविण्यात आले. ग्रामपंचायतीचे रूपांतर आता नगरपंचायतीत झाले. यामुळे शहराचा विकास होईल, असे वाटत असताना नियोजनाअभावी नागरिकांची पाण्याकरिता होरपळ होत आहे. यावर्षी असलेल्या उष्णतेमुळे पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. नगर पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांत एकजुटता तसेच कर्मचाऱ्यांवर नसलेल्या वचकाचा परिपाक म्हणून येथील नारिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नळ योजनेची विहीर पूर्ण आटली असून नगर पंचायतने टँकरने पाणी पुरवावे, अशी मागणी या पाचही प्रभागात जोर धरत आहे. ९ मे रोजी झालेल्या मासिक सभेत टँकरने पाणी वाटप करण्याची विरोधी पक्षाची मागणी मान्य केली; पण अद्याप टँकरची व्यवस्था झालेली नाही. नगर पंचायतने त्वरित व्यवस्था करावी. - मधुकर कामडी, गटनेता. पिण्याच्या पाण्याची टंचाई पाहता टँकरकरिता वर्क आॅर्डर दिली आहे. टँकर लवकर येऊन सर्वांना पाणी मिळेल. - गजानन राऊत, पाणी पुरवठा सभापती, न.पं. समुद्रपूर.