शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

समुद्रपुरात पिण्याचे पाणी नाही

By admin | Updated: May 28, 2017 00:22 IST

नगर पंचायतच्या लहरी कारभाराने कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याने शहरातील तीन प्रभागातील नागरिकांची पाण्याकरिता भटकंती होत आहे.

नागरिकांची भटकंती : टँकरणे पाणी पुरवठ्याची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क समुद्रपूर : नगर पंचायतच्या लहरी कारभाराने कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याने शहरातील तीन प्रभागातील नागरिकांची पाण्याकरिता भटकंती होत आहे. या प्रभागातील नागरिकांना मागील पाच दिवसांपासून पिण्याचेही पाणी मिळाले नाही. यामुळे नागरिकांची भटकंती होत असून पाण्याकरिता हाहाकार माजला आहे. चार दशकांपूर्वी बांधलेली येथील पाण्याची टाकी जीर्ण झाली आहे. तसेच शहराच्या लोकसंख्येत वाढ झाली आहे. यामुळे अस्तित्त्वात असलेली पाणी पुरविण्याची व्यवस्था तोकडी पडत आहे. यामुळे नागरिकांना पाण्याकरिता भटकावे लागत आहे. तत्कालीन सरपंच स्व. वसंतराव निखाडे यांनी तत्कालीन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे येथे शासन असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची नळ योजना मंजूर करून घेतली; पण त्या योजनेचे पाणी टाकीत पोहोचले नाही. यामुळे येथील स्मशानभूमित एक बोर खोदले. त्याला पाणी लागले. ते पाणी विहिरीत घेत जनतेला पुरविण्यात आले. ग्रामपंचायतीचे रूपांतर आता नगरपंचायतीत झाले. यामुळे शहराचा विकास होईल, असे वाटत असताना नियोजनाअभावी नागरिकांची पाण्याकरिता होरपळ होत आहे. यावर्षी असलेल्या उष्णतेमुळे पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. नगर पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांत एकजुटता तसेच कर्मचाऱ्यांवर नसलेल्या वचकाचा परिपाक म्हणून येथील नारिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नळ योजनेची विहीर पूर्ण आटली असून नगर पंचायतने टँकरने पाणी पुरवावे, अशी मागणी या पाचही प्रभागात जोर धरत आहे. ९ मे रोजी झालेल्या मासिक सभेत टँकरने पाणी वाटप करण्याची विरोधी पक्षाची मागणी मान्य केली; पण अद्याप टँकरची व्यवस्था झालेली नाही. नगर पंचायतने त्वरित व्यवस्था करावी. - मधुकर कामडी, गटनेता. पिण्याच्या पाण्याची टंचाई पाहता टँकरकरिता वर्क आॅर्डर दिली आहे. टँकर लवकर येऊन सर्वांना पाणी मिळेल. - गजानन राऊत, पाणी पुरवठा सभापती, न.पं. समुद्रपूर.