शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

कापूस वेचणीच्या संशोधन अहवालावर कार्यवाही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:44 IST

भारत हा जागतिक बाजारातील मोठा कापूस उत्पादक देश आहे; पण भारतात अनेक भागांत कापूस वेचणीचे काम महिला मजुरांकडून करून घेतले जाते.

ठळक मुद्देमहिला मजुरांना त्रास : यांत्रिकीकरणाकडे सरकारची पाठ

सुधीर खडसे।लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : भारत हा जागतिक बाजारातील मोठा कापूस उत्पादक देश आहे; पण भारतात अनेक भागांत कापूस वेचणीचे काम महिला मजुरांकडून करून घेतले जाते. यामुळे महिला मजुरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन भारतीय कृषी कापूस अनुसंधान संस्थेने आॅक्टोबर २००४ मध्ये अभ्यास करून शासनाकडे निष्कर्ष अहवाल सादर केला होता. यावर कार्यवाही करून कापूस वेचणीच्या कामात यांत्रिकीकरण, महिलांचा त्रास कमी होणाºया बाबी अंमलात आणाव्या, अशा सूचना केल्या होत्या; पण या अहवालावर कोणतीही कार्यवाही अद्याप झाली नाही. यामुळे कापूस मजुरांच्या व्यथा कायमच आहेत.जगात भारत, पाकिस्तान, आॅस्ट्रेलिया, इस्राईल, अमेरिका या देशांमध्ये ९० टक्के कापसाचे उत्पादन होते. येथे कापूस वेचणीसाठी वापरण्यात येणाºया वेगवेगळ्या पद्धती आहेत. भारतात मात्र महिला मजुरांकडून कापूस वेचून घेतला जातो. पाच बोटांमध्ये कापूस पकडून तो बोंडाबाहेर काढण्याचे काम करण्यात येते. कापूस वेचणीची ही पद्धती अत्यंत त्रासदायक आहे. यामुळे महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतो. यामध्ये मणक्याचे, कमरेचे आदी अनेक आजार आदी जडतात, असा निष्कर्ष अभ्यासकांनी काढला आहे.आॅक्टोबर २०१४ मध्ये भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने कापूस पिकावर जागतिक संशोधन केले. या संशोधनात कापूस वेचणीबाबत काही निष्कर्ष मांडलेत. त्यात भारत, पाकिस्तान आणि चीन या देशांत कापूस वेचणीसाठी यांत्रिकीकरणाचा वापर करण्याची टक्केवारी शून्य असल्याचे नमूद केले आहे. कापूस वेचणीसाठी मराठवाड्यातील परभणी येथील कृषी विद्यापीठाने कापडाचा खिसा असलेला कोट वापरण्याची सूचना केली होती. समोरच्या भागात साडेपाच किलो कापूस ठेवता येईल, अशा पद्धतीचा कोट तयार करण्यात आला होता; पण कापूस वेचणाºया महिला स्व-खर्चाने हा कोट खरेदी करीत नाहीत, असे आढळून आले आहे. भारतात कापूस वेचणीचे यंत्र तयार करण्यात आले आहे. हे यंत्र बोंडाजवळ नेल्यावर ५० ते ६० किलो कापूस एका तासात वेचता येतो. एका तासात १०० किलो कापूस वेचणे शक्य आहे; पण आपल्याकडे राज्य सरकारचा कृषी विभाग कापूस वेचणीच्या कामात यांंत्रिकीकरणाचा वापर करून घेण्याबाबत प्रचंड उदासीन आहे. त्यामुळे आजही महिलांना कापूस वेचणीचे काम करावे लागत असल्याची खंत नॅशनल हार्टिकल्चर मिशनचे संचालक चंद्रशेखर पडगिलवार यांनी व्यक्त केली आहे.यंदा कापूस वेचणी महागलीपूर्वी विदर्भाच्या विविध भागात एक महिला दिवसभर जितका कापूस वेचत होती, त्यानुसार किलोच्या आधारे तिला मजुरी दिली जात होती. यंदा मात्र शेतकºयांना २०० रुपये मजुरीवर महिलांना कापूस वेचणीच्या कामासाठी बोलवावे लागत आहेत. एक महिला साधारणत: २० ते २५ किलो कापूस दिवसभरात वेचते. पूर्वी १३० रुपयांत हे काम होत होते. आता २०० रुपये द्यावे लागत आहेत. म्हणजे ७० रुपये अधिकचे शेतकºयाला मोजावे लागत आहेत. त्यामुळे आता कापूस वेचणीसाठी यांत्रिकीकरणावर भर देणे गरजेचे झाले आहे. विदर्भात कापूस हे सर्वात महत्त्वाचे तथा ते नगदी पीक असल्याने शेतकरी यावरच निर्भर आहे.कापूस पिकावर संशोधनं होऊन शेतकºयांना शासकीय आधार मिळणे गरजेचे आहे. हे लक्षात घेऊनच संशोधनं केली जात आहेत; पण त्यावर अंमलबजावणी होत नसल्याचेच दिसून येत आहे. परिणामी, शेतकºयांना आजही वेचणीचा अधिक खर्च करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.