शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
2
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
3
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
4
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
5
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
6
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
7
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
8
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
9
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
10
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
11
गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म
12
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
13
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
14
पेट्रोलची चिंता मिटली! 2026 मध्ये येणार मारुतीची पहिली फ्लेक्स-फ्युएल कार, जाणून घ्या डिटेल्स...
15
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
16
Viral Video: दोघे भिडले, लाथा-बुक्क्या मारत एकमेकांवर तुटून पडले; मेट्रोतील राडा व्हायरल
17
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
18
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
19
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
20
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."

ज्वारीपेक्षा कडब्याचा भाव अधिक

By admin | Updated: November 27, 2015 02:19 IST

पाऊस कमी आला किंवा जास्त आला तरी हमखास होणारे उत्पन्न म्हणून ज्वारीची ओळख आहे. मात्र जंगली श्वापदांच्या हैदोसामुळे ही ज्वारी जिल्ह्यातून हद्दपार होत आहे.

पेरा घसरणीवरच : जंगली श्वापदांमुळे जिल्ह्यातून ज्वारी हद्दपारवर्धा : पाऊस कमी आला किंवा जास्त आला तरी हमखास होणारे उत्पन्न म्हणून ज्वारीची ओळख आहे. मात्र जंगली श्वापदांच्या हैदोसामुळे ही ज्वारी जिल्ह्यातून हद्दपार होत आहे. वैरणाकरिता उपयोगी येत असलेली ज्वारी बाजारात चढ्या दरात विकत घ्यावी लागत आहे. आजघडीला बाजार समितीचा फेरफटका माारला तरी ती येथे ज्वारी विक्रीला आली नसल्याचे दिसून आले आहे. एक क्विंटल ज्वारीला बाजारात १६०० ते २००० रुपये भाव मिळतो आहे. पण ज्वारीच्या धांड्यांची एक पेंडी ७ रुपयांच्या भावात विकली जाते. त्यामुळे हजार पेंड्यांकरिता ७ हजार रुपये मोजावे लागतात. हा भाव पाहिल्यावर ज्वारीपेक्षा वैरणाचा भाव अधिक असल्याचे दिसून आहे. कृ षी विभागाच्या खरीप हंगाम नियोजनात ज्वारीच्या पिकाचे लागवड क्षेत्र पाच हजार हेक्टरच्या आसपास अपेक्षित धरले जायचे. दिवसागणिक या क्षेत्रामध्ये घट होत गेली. आजच्या स्थितीला जास्तीत केवळ एक हजार हेक्टर क्षेत्रातही ज्वारीची लागवड होत असल्याचे दिसून आले आहे. पूर्वी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ज्वारीची पेरणी होत होती. आता तिची जागा हायब्रिडने घेतन्ली आहे. ज्वारीचा पेरा जिल्ह्यात वाढला. तेव्हा बाजारात ११०० रुपये क्विंटलचा भाव मिळायचा व उत्पन्नाचे प्रमाण एकरी १० क्विंटलच्या आसपास होते. १९९० नंतर जिल्ह्यात श्वापदांच्या हैदोसाला सुरुवात झाली. हळूहळू ज्वारीच्या पेऱ्याचे प्रमाण कमी होत गेले. परिणामी ज्वारीच्याा धांड्यांना वैरण म्हणून असलेली मागणी वाढली. ज्वारीपेक्षा वैरणाची किंमत अधिक झाली. १९९५ च्या दरम्यान २२०० रुपयात १ हजार पेंडी कडबा विकला जात होता. गुरांच्या पंसतीचे खाद्य म्हणून ज्वारीच्या कडब्याची ओळख असताना दुहेरी उत्पन्न ज्वारीतून पिकांतून मिळत होते. ज्वारी भाकरीकरिता तर कडबा गुरांकरिता असे समीकरण राहायचे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी बैलजोडीसह दुधाळू जनावरे होती. श्वापदांनी ज्वारीचा फडशा पाडायला प्रारंभ केल्याने ज्वारीच्या उत्पन्नात घट झाली.जिल्ह्यात रोह्यांसह रानडुकरांची संख्या वाढली. ही दोन्ही श्वापद पिकांची सर्वाधिक नासाडी करणारे आहेत. जवारीचा धांडा गोड लागत असल्याने तो खाण्याकरिता रोही व डुक्कर याच शेतांमध्ये ठाण मांडायचे. तर पक्षी ज्वारीच्या कणसातील दाणे टिपून नुकसान करीत होते. सर्वांधिक नुकसान श्वापदांनी केल्यामुळे उत्पादन सतत घटत राहिले. रोही व डुक्कर पीक खाण्याऐवजी ते खाली पाडत असल्याने त्याचे नुकसान अधिक व्हायचे. यात नुसता वेळ जात असल्यामुळे शेतकऱ्यांनी ज्वारीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली. परिणामी असा झाला की बाजारपेठेत हायब्रिड ज्वारीचा भाव आज २ हजार रुपये क्विंटलच्या घरात पोहोचला तर भारी ज्वारीला ३ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. शहरातील गोपालकांना हिरव्या वैरणाची एक पेंडी १५ रुपयांची झाली आहे. म्हणजेच १५ हजार रुपयात १ हजार पेंड्या कडबा विकला जातो. ज्वारीपेक्षा वैरणाचा भाव आज अधिक झाला. जंगली श्वापदांमुळे जिल्ह्यातील असंख्य शेतकऱ्यांनी ज्वारीची लागवड बंद केली. म्हणूनच बाजार समित्यांमध्ये ज्वारीचे पांढरे शुभ्र बारिक दाणे विक्रीकरिता येत नसल्याचे वास्तव आहे. बाजार समित्यांमध्ये धान्य खरेदीचा शुभारंभ होऊन दोन महिन्यांचा कालखंड लोटला, पण एकाही ठिकाणी ५ क्विंटलपेक्षा जास्त ज्वारी विक्रीकरिता आली नाही. हे विदारक सत्य लक्षात घेऊन तरी कृती होणार काय, असा प्रश्न आहे.(प्रतिनिधी)