शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
2
"बेबी, आय लव्ह यू, तू खूप...", स्वयंघोषित बाबा रात्रभर पाठवायचा अश्लील मेसेज, ३५ मुलींचा छळ
3
डोळ्यांत मिरची पूड ओतली, नंतर साडीने लेकाचा गळा आवळला अन्...; जन्मदात्री आई इतकी क्रूर का झाली?
4
भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी...
5
मुंबई पोलीस कॉन्स्टेबलच्या मृत्यूचं गूढ उकललं; ४ महिन्यांनी हत्येचा खुलासा, 'त्या' पत्रावर संशय
6
बाहुबली नेते राजा भैय्या यांच्या मुलांनी आईवर केले गंभीर आरोप, म्हणाले, "आमच्या घरात…’’  
7
ललिता पंचमी व्रत २०२५: शुक्रवारी इच्छापूर्तीसाठी 'असे' करा ललिता पंचमीचे व्रत; टाळा 'ही' एक चूक!
8
"हो मला बाबा व्हायचंय...", ५९व्या वर्षी सलमान खानला हवंय मूल, म्हणाला...
9
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
10
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
11
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
12
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
13
"पैशाचं सोंग आणता येत नाही, मग सरकार शेतकऱ्यांना जीवन संपवू देणार का?’’, विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
14
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
15
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
16
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
17
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका
18
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब आणि मुलावर गुन्हा दाखल; १५० हून अधिक लोकांना लाखोंचा फटका
19
Stock Market Today: सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात घसरण, निफ्टी ४० अंकांनी घसरला; Glenmark Pharma, Dixon Tech मध्ये तेजी
20
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या

उर्ध्व वर्धातून विसर्ग सुरूच

By admin | Updated: August 7, 2015 01:54 IST

जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून आलेल्या पावसाचा चांगलाच फटका बसला. सतत सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

पावसाचा फटका : १९६ गावातील १,१३९ कुटुंबे बाधित झाल्याचा अंदाजवर्धा: जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून आलेल्या पावसाचा चांगलाच फटका बसला. सतत सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. या पावसामुळे धाम, मदन उन्नई, वर्धा कार नदी आणि सुकळी लघु प्रकल्पात गत दोन दिवसांच्या पावसाने १०० टक्के उपयुक्त जलसाठा उपलब्ध झाला आहे. धाम प्रकल्पावरून १११.१०, मदन उन्नई धरणावरून ०.७८, उर्ध्व धरण १०३, वर्धा कार नदी ३५.९१, निम्न वर्धा ५५७ आणि सुकळी लघु प्रकल्प १.०९, क्युमेक्सने पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. तर निम्न वर्धाचे ३१ दरवाजे, उर्ध्व वर्धाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर दोन दिवसांपूर्वी दमदार पाऊस आला. तर बुधवारी समुद्रपूर वगळता सातही तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला. काही भागात या पुराचे पाणी गावात शिरल्याने त्याचा फटका नागरिकांना बसला. तर काही भागात पावसाच्या संततधारीमुळे घरांची पडझड झाली. पडझड झालेल्या घरांचा सर्व्हे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला असला तरी शेतीच्या नुकसानीचा सर्व्हे करणे बाकी असून शेतकऱ्यांना मदतीची मागणी होत आहे. गत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा फटका जिल्ह्यातील १९६ गावांना बसला. तर सततच्या पावसामुळे १ हजार १३९ घरांची पडझड झाली. यात ८८६ घरे अंशत: तर २५३ घरे पुर्णत: बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जिल्ह्यात गत २४ तासात ७०.७० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस आष्टी तालुक्यात २३.८० मि.मी एवढा नोंदविण्यात आला. आतापर्यंत सर्वाधिक पाऊसही आष्टी तालुक्यातच ६६८. मि.मी पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. इतर तालुक्याची पावसाची आकडेवारी कंसात आतापर्यंतच पाऊस वर्धा ३.७० (६६६), सेलू १ (४५१), देवळी ३.२० (५३७.९०), हिंगणघाट ६५२.३२, समुद्रपूर २ (५०५.५१), आर्वी ११ (६३५.३२) आणि कारंजा २२ (६४१.७०) एकूण पाऊस ७०.७० (४७५७.७५), सरासरी ८.८४ (५९४.७२) पावसाची नोंद आहे.शेताच्या नुकसानीचा सर्वेक्षण करण्यात दिरंगाई बुधवारी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतात पाणी साचले तर बऱ्याच भागात नदी नाल्याच्या पुराखाली शेती आली. त्यातील पाणी अद्यापही बाकीच आहे. यामुळे शेतात असलेले उभे पीक खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बऱ्याच शेतातील जमीन खरडून गेली आहे. पावसात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेताचा सर्व्हे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.