शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात होत आहेत कमी कोविड टेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 05:00 IST

मे महिन्यातील पाच दिवसांत जिल्ह्यात १ व ५ मे वगळता इतर इतर तीन दिवशी एप्रिल महिन्याच्या शेवट्या आठवड्यातील प्रत्येक दिवशीच्या तुलनेत कमीच कोविड चाचण्या झाल्यात. तर १ व ५ मे रोजीला जिल्ह्यात अनुक्रमे ४ हजार २९८ तसेच ४ हजार ६३ कोविड चाचण्या करण्यात आल्या. असे असले तरी जिल्ह्याचा प्रत्येक दिवशीचा पॉझिटिव्हीटी दर २० पेक्षा जास्तच असल्याने  प्रत्येक नागरिकाने सध्याच्या कोरोना संकटात दक्ष राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देपॉझिटिव्हीटी दर २० पेक्षा जास्तच : मृतांच्या संख्येत रोज पडतेय भर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोविड-१९ विषाणूचा वाढता संसर्ग तसेच वाढत्या संसर्गाच्या तुलनेत अपुरी पडत असलेली आरोग्य सेवा लक्षात घेवून राज्य शासनाने कठोर निर्बंध लादले आहेत. परंतु, अजूनही जिल्ह्याचा प्रत्येक दिवशीचा पॉझिटिव्हीटी दर २० पेक्षा जास्तच असून एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात जिल्ह्यात कमी कोविड टेस्ट होेत असल्याचे आकडेवारीवरून बघावयास मिळत आहे.मे महिन्यातील पाच दिवसांत जिल्ह्यात १ व ५ मे वगळता इतर इतर तीन दिवशी एप्रिल महिन्याच्या शेवट्या आठवड्यातील प्रत्येक दिवशीच्या तुलनेत कमीच कोविड चाचण्या झाल्यात. तर १ व ५ मे रोजीला जिल्ह्यात अनुक्रमे ४ हजार २९८ तसेच ४ हजार ६३ कोविड चाचण्या करण्यात आल्या. असे असले तरी जिल्ह्याचा प्रत्येक दिवशीचा पॉझिटिव्हीटी दर २० पेक्षा जास्तच असल्याने  प्रत्येक नागरिकाने सध्याच्या कोरोना संकटात दक्ष राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्ही दर हाय असून ज्या दिवशी कोविड टेस्ट जास्त त्या दिवशी नवीन रुग्णांची संख्याही वाढत आहे. तर ज्या दिवशी कोविड चाचण्या कमी त्या दिवशी नवीन कोविड बाधितांचा आकडा कमी अशी परिस्थिती सध्या जिल्ह्यात बघावयास मिळत आहे. असे असले तरी कुठल्याही कोविड बाधिताचा उपचाराअभावी मृत्यू होऊ नये म्हणून सध्या प्रशासन ट्रेस, टेस्ट आणि ट्रिट या त्रिसुत्रीवर भर देत आहे.

आरटीपीसीआरचे अहवाल अधिक पॉझिटिव्हआरटीपीसीआर आणि ॲन्टिजेन या दोन पद्धतीने कोविड चाचण्या जिल्ह्यात केल्या जात आहेत. ॲन्टिजेन किटद्वारे कोविड चाचणी केल्यास त्याचा अहवाल अवघ्या २५ मिनिटांत येतो. तर आरटीपीसीआर पद्धतीने केलेल्या कोविड चाचणीचा अहवाल किमान १६ तासानंतर मिळत आहे. असे असले तरी सर्वाधिक पॉझिटिव्हीटी दर आरटीपीसीआर पद्धतीने केलेल्या कोविड चाचणीचाच आहे. ॲन्टिजेनपेक्षा आरटीपीसीआर चाचणी ही अधिक प्रभावी असल्याचे वैद्यकिय तज्ज्ञ सांगतात. 

ट्रेस, ट्रेस आणि ट्रिट या त्रिसुत्री संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून जिल्ह्यात कोविड परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दररोज मोठ्या संख्येने नवीन कोविड बाधित सापडत असल्याने प्रत्येकाने जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. कुठल्याही कोविड बाधिताचा उपचाराअभावी मृत्यू होणार नाही, यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.- डॉ. अजय डवले,  जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

आर्वी, हिंगणघाट उपविभागात टेस्टींग कमीच जिल्ह्यात महसूलची वर्धा, हिंगणघाट व आर्वी अशी तीन उपविभाग आहेत. परंतु, तिन्ही महसूल विभागांचा विचार केल्यास कोविड चाचण्या करण्यात वर्धा उपविभाग पुढे आहे. तर उर्वरित दोन्ही उपविभागात पाहिजे तशा प्रमाणात कोविड चाचण्या होत नसल्याचे सांगण्यात आले. कोविड चाचणी ही आरटीपीसीआर आणि ॲन्टिजेन  अशा दोन पद्धतीने केली जाते. परंतु, जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात ॲन्टिजेन किटद्वारे कोविड चाचण्या केल्या जात आहेत. विशेष म्हणजे आरटीपीसीआर ही गोल्ड स्टॅन्डर मानले जाते.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या