शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

...तर स्कूल बसचा परवाना होईल निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 21:42 IST

प्रत्येक विद्यार्थ्यांचा सुरक्षित प्रवास या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने सर्व स्कूल बस चालक व मालकांसाठी ८ ते ३१ मे या कालावधीत विशेष स्कूल बस तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देउपप्रादेशिक परिवहनचा बडगा : ८ ते ३१ मे विशेष मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : प्रत्येक विद्यार्थ्यांचा सुरक्षित प्रवास या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने सर्व स्कूल बस चालक व मालकांसाठी ८ ते ३१ मे या कालावधीत विशेष स्कूल बस तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या कालावधीत स्कूल बसची तपासणी न करणाऱ्यांच्या वाहनांचा परवानाच निलंबित करण्यात येणार आहे. परिणामी, स्कूल बसची तपासणी न करून घेणाऱ्यांच्या अडचणीत भर पडणार आहे.शाळकरी मुला-मुलींची वाहतूक करणाºया स्कूल बस मालक, शाळा संचालक यांनी त्यांच्याकडे असलेल्या स्कूल बसची वेळोवेळी तपासणी करून घेणे क्रमप्राप्त आहे. विशेष म्हणजे २४ मार्च २०१७ उच्च न्यायालयात जनहित याचिका क्र. २/२०१२ च्या सुनावणीच्या वेळीस उच्च न्यायालयाने उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत शाळकरी मुलांची वाहतूक करणाºया बससेची सुरक्षतेच्या दृष्टीने फेर तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय परिवहन आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली १० मे २०१८ ला झालेल्या बैठकीमध्ये दिलेल्या निर्देशानुसार व शासन अधिसूचना क्र. एम.व्ही.आर./सी.आर. ६३७/२०१३/का. २ (३)/जा.क्र. ५६०९ दि. ६ एप्रिल २०१७ नुसार स्कूल बस संदर्भात नियमावली लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे शाळकरी मुला-मुलींची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करणे क्रमप्राप्तच आहे.उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून स्कूल बस वाहनाची फेरतपासणी करण्यासाठी मौजा सालोड हिरापूर येथील वाहन तळावर ८ मे २०१९ ते ३१ मे २०१९ या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. ही विशेष मोहीम सुविधेसाठी असली तरी त्याच्याकडे पाठ करणाऱ्यांवर उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने कठोर कारवाईच करण्यात येणार आहे. त्यामुळे स्कूल बस चालक, मालक व शाळा संस्थांनी वाहनांची तपासणी करणे गरजेचे आहे.फेरतपासणी सर्व स्कूलबससाठी क्रमप्राप्तमोटार वाहन कायदा कलम ५६ अंतर्गत जारी करण्यात आलेल्या योग्यता प्रमाणपत्र वैध असले तरी स्कूल बस फेरतपासणी करून घेणे आवश्यक आहे.सदर फेरतपासणीमध्ये दोष आढळून आल्यास दोष पूर्ण करून सदर स्कूल बस हे सर्व सुरक्षातत्त्वाचे पालन करीत आहे, अशा आशयाचे प्रमाणपत्र संबंधितांना देण्यात येणार आहे.विशेष म्हणजे ही फेरतपासणी सर्व स्कूल बस वाहनांना अनिवार्य आहे.जिल्ह्यात एकूण ४७४ स्कूल बसवर्धा जिल्ह्यात शाळकरी मुला-मुलींची वाहतूक करणाºया छोट्या व मोठ्या अशा एकूण ४७४ स्कूल बसेस असल्याची नोंद उपप्रादेशिक परिवहन विभागाने घेतली आहे. या सर्व स्कूल बसेसची सदर विशेष मोहिमेदरम्यान फेरतपासणी होणे गरजेचे आहे.विद्यार्थ्यांची सुरक्षा तसेच विद्यार्थ्यांचा सुरक्षित प्रवास या हेतूने ८ ते ३१ मे या कालावधीत स्कूल बसची फेरतपासणी करण्यात येणार आहे. ज्या स्कूलबसची सदर कालावधीत फेरतपासणी केली जाणार नाही त्या वाहनाचा परवाना निलंबीत करण्यात येणार आहे.- विजय तिरणकर, सहा. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वर्धा.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसSchoolशाळा