शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
3
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
4
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
5
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
6
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
7
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
8
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
9
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
10
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
11
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
12
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
13
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
14
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
15
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
16
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
17
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
18
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

नाट्य निर्मिती ही सर्व सामान्यासाठी झाली पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 22:10 IST

बहुदा नाटक हे समाजातील उच्चविद्याविभुषित लोकांच्या घरातील जीवन व घडामोडी यावर लिहिल्या जात आहे. यातून मनोरंजन होत असल्यामुळे पे्रक्षक वर्ग मोठा मिळतो, टाळ्या, प्रोत्साहन मिळून आर्थिक फायदा ही होतो. त्यासाठी नाटयनिर्मिती व सादरीकरण ही उच्चभू्रपेक्षा झोपडीतील लोकांकडून व लोकांसाठी झाली पाहिजे, असे प्रतिपादन नाट्य रंगकर्मी मंजुल भारद्वाज यांनी केली वर्धा इप्टा व यशवंतराव दाते स्मृती संस्थेच्यावतीने आयोजित नाटय चर्चेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.

ठळक मुद्देमंजूळ भारद्वाज : इप्टा व दाते स्मृती संस्थेचा कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बहुदा नाटक हे समाजातील उच्चविद्याविभुषित लोकांच्या घरातील जीवन व घडामोडी यावर लिहिल्या जात आहे. यातून मनोरंजन होत असल्यामुळे पे्रक्षक वर्ग मोठा मिळतो, टाळ्या, प्रोत्साहन मिळून आर्थिक फायदा ही होतो. त्यासाठी नाटयनिर्मिती व सादरीकरण ही उच्चभू्रपेक्षा झोपडीतील लोकांकडून व लोकांसाठी झाली पाहिजे, असे प्रतिपादन नाट्य रंगकर्मी मंजुल भारद्वाज यांनी केली वर्धा इप्टा व यशवंतराव दाते स्मृती संस्थेच्यावतीने आयोजित नाटय चर्चेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.इंडियन पिपल्स थिएटर असोशिएशन (इप्टा) आणि यशवंतराव दाते स्मृती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या सभागृहात ‘थिएटर आॅफ रिलेवंस या विषयावरील चर्चात्मक व्याख्यान घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव दाते स्मृती संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते तर प्रमुख अतिथी म्हणून रंगकमी डॉ. सतीश पावडे, इप्टा वर्धाचे जिल्हाध्यक्ष राजू बावने, सरचिटणीस डॉ. स्मिता वानखेडे उपस्थित होत्या. तर डॉ. सतीश पावडे म्हणाले की केवळ सिद्धांत मांडून चालणार नाही तर तसे प्रयोगही करावे लागतात. नाट्यलेखकाला समाजाचे दु:ख व अस्वस्थता दिसावी, काहींना जे पटत नाही ते मुळीच स्वीकारु नये, असे जे वागतात प्रसंगी त्यांना शासकीय पद व प्रतिष्ठा लाभत नाही. समाजाचा आशिर्वाद लाभतो, म्हणून समाजांकडून मिळणारे प्रेम हाच खरा पुरस्कार होय. मंजूळ भारद्वाज म्हणाले की, भांडवलशाहीच्या विरोधात जे नाटक निर्माण करतात सादर करतात त्यांचा प्रवास दुखातूनच होतो. काही लोकांसाठी अशी निर्मिती धोकादायक ठरू शकते. परिणामी राजसत्ता ही जावू शकते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजेंद्र मुंडे यांनी केले. संचालन गौतम पाटील यांनी केले तर आभार जयवंत भालेराव यांनी मानले. यशस्वीतेकरिता रंजना दाते, संगीता इंगळे, सूर्यप्रकाश पांडे, संजय तिळले, चंद्रकांत तिळले, अंकुश डांगे, भूषण भोयर, गजेंद्र सुरकार आदींनी सहकार्य केले.