शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वाद पेटला! खादीचे कार्य बंद होणार नाही; सेवाग्राम आश्रमाने घेतली ठाम भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2022 21:03 IST

Wardha News सेवाग्राममध्ये महात्मा गांधींच्या काळापासूनच खादीचे कार्य सुरू असल्याने ते बंद करणार नाही अशा आशयाचे पत्र सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानने खादी व ग्रामोद्योग आयोगाला पाठवले आहे.

ठळक मुद्देसेवाग्राम आश्रम-आयोग वाद पेटलासेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानने पाठविले पत्र

सेवाग्राम (वर्धा) : सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानअंतर्गत खादी ग्रामोद्योग भांडारातील खादी विक्रीला आयोगाचे मान्यता प्रमाणपत्र नसल्याने ते तत्काळ बंद करण्याच्या सूचना पत्रातून केल्या होत्या. यावर सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानने आश्रमात महात्मा गांधींच्या काळापासून खादीचे कार्य सुरू असल्याने ते बंद करणार नाही. तुम्हाला कारवाई करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे, असे उत्तर आश्रमचे अध्यक्ष टी. आर. एन. प्रभू व मंत्री चतुरा रासकर यांनी आयोगाच्या नागपूर विभागीय कार्यालयाला पत्राद्वारे पाठविले आहे.

सेवाग्राम आश्रमात गांधीजींच्या काळापासून कताई, बुनाईची कामे सुरू आहेत. निर्मित खादी वस्त्र आश्रमातील दुकानातून विक्री केले जाते. हे काम आयोगाच्या स्थापनेच्या पूर्वीपासून केले जात आहे. तसेच मान्यताप्राप्त खादी संस्थेतील खादी आवश्यकता आणि मागणीनुसार खरेदी करून विक्री केली जाते. खादी मार्क रेग्युलेशन २०१३ विरुद्ध संस्था कुठलेही कार्य करीत नाही. आश्रमाविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा आपण दिलेला असल्याने याबाबत आपणास स्वातंत्र्य असल्याचे मेलद्वारा निर्देशक विभागीय कार्यालय नागपूर यांना पत्रातून कळविले आहे. याबाबतचे पत्र उपमुख्य कार्यकारी अधिकारी, खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई, निदेशक (खादी व विपणन) खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई यांनाही पत्र पाठविण्यात आलेले आहे.

आयोगाचे प्रतिनिधी आश्रमात

२५ मार्च रोजी खादी व ग्रामोद्योग आयोगाचे प्रतिनिधी आश्रमात आले असता, त्यांना खादी व ग्रामोद्योग भांडारातून अवैध खादीची विक्री करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले होते. तसे आयोगाचे प्रमाणपत्र नसल्याचे लक्षात आले होते. यासंदर्भात २८ मार्च रोजी विभागीय कार्यालयाने तत्काळ विक्री बंद करण्याच्या सूचना पत्रकातून दिल्या होत्या.

खादी व ग्रामोद्योग आयोग शासनाचा विभाग आहे. खादी आमच्यासाठी आदर्श असून, खादी मार्क आवश्यक आहे, असे आम्हाला वाटत नाही. खादीची शुद्धता आणि उद्देश महत्त्वाचा आहे. तो सफल व्हावा, अशी आमची इच्छा आहे.

टी. आर. एन. प्रभू, अध्यक्ष सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान.

 

टॅग्स :Sewagramसेवाग्राम