शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
3
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
4
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
5
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
6
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
7
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
8
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
9
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
10
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
11
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
12
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
13
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
14
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
15
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
16
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
17
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
18
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
19
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
20
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

गावपुढाऱ्यांना पुन्हा निवडणुकीची चिंता, ग्रामपंचायतीची निवडणूक कधी होणार?

By रवींद्र चांदेकर | Updated: May 23, 2024 21:28 IST

लोकप्रतिनिधी हतबल : सर्वत्र प्रशासकांचे राज, विकासाचा हाेतोय खोळंबा

वर्धा : नुकतीच २६ एप्रिल रोजी लोकसभेची निवडणूक आटोपली. आता ४ जूनला निकाल घोषित होणार आहे. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले असताना जिल्ह्यातील ५२१ पैकी निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे तब्बल ३०१ ग्रामपंचायतींची मुदत संपली. त्यामुळे गावपुढाऱ्यांना पुढील ग्रामपंचायत निवडणुकीची चिंता लागली आहे.

लोकसभा निवडणुकीचे कवित्व अद्याप सुरू आहे. यावेळी तुल्यबळ लढत झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, ४ जूनलाच खरे चित्र स्पष्ट होणार आहे. मतदारांनी नेमका कुणाला कौल दिला, हे त्यावेळी समजणार आहे. लोकसभा निवडणुकीची धामधूम संपत नाही तोच जिल्ह्यातील ३१० ग्रामपंचायतींची मुदत संपली. तेथे प्रशासकांना बसविण्यात आले. मात्र, सरपंच संघटनेने थेट न्यायालयाची पायरी चढून प्रशासक नियुक्तीला स्थगिती मिळविली. त्यामुळे तूर्तास सरपंच मंडळी आपल्या पदावर कायम राहणार आहे. मात्र, हे असे किती काळ चालेल, याची शाश्वती नाही. परिणामी, पुढील काळात ग्रामपंचायतींवर पुन्हा प्रशासक बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ग्रमपंचायतींची मुदत संपल्याने आता गावपुढाऱ्यांना पुढील निवडणुकीची चिंता सतावू लागली आहे. ही निवडणूक कधी होणार, याची कुणालाच माहिती नाही. त्यामुळे गावपुढारी, सरपंच, सदस्य हतबल झाले आहे. ग्रामीण भागात ग्रामपंचायतीची निवडणूक लोकसभा, विधानसभेपेक्षाही अत्यंत चुरशीने लढविली जाते. ग्रामपंचायत निवडणूक गाव विकासासाठी महत्त्वाची असते. सरपंच अन् सदस्य बनण्यासाठी अनेक जण इच्छुक असतात. विशेषत: वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायतींना थेट मिळू लागला, तेव्हापासून ही निवडणूक रंगतदार ठरू लागली आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील ३०१ ग्रामपंचायतींची निवडणूक कधी होणार, असा प्रश्न आहे.बॉक्स

जिल्हा परिषदेला ‘वाली’च उरला नाहीगेल्या दोन वर्षांपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक रखडली आहे. मार्च २०२२ मध्ये जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. तेव्हापासून निवडणूक झालीच नाही. त्यामुळे सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांना कुणीच वाली नसल्याचे दिसून येत आहे. दोन्ही ठिकाणी दोन वर्षांपासून प्रशासक राज सुरू आहे. लोकप्रतिनीधींचा वावर संपला आहे. पदाधिकारी आणि सदस्य नसल्याने विकासात बाधा येत असल्याची ओरड सुरू आहे. त्यात आचारसंहितेचे भूत मानगुटीवर बसले आहे. परिणामी, विकासाचा खोळंबा होत असल्याचा सूर ऐकू येत आहे. आता ग्रामपंचायतींची निवडणूक लांबल्यास ग्रामीण भागातही प्रशासक राज अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. चार महिन्यांनी पुन्हा आचारसंहिता

जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींची निवडणूक कधी होणार, हा प्रश्न कायम असताना ऑक्टोबरच्या सुमारास विधानसभेची निवडणूक निश्चित होणार आहे. तत्पूर्वी सप्टेंबरच्या अखेरीस पुन्हा आचारसंहिता लागू हाेण्याची शक्यता आहे. त्यासाठी अवघे चार महिने उरले आहे. लोकसभेची आचारसंहिता सुरू असल्याने अनेक विकासकामे रखडली. विधानसभेची आचारसंहिता लागू झाल्यानंतर पुन्हा विकासाचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. त्यात लवकरच पावसाळा सुरू होत आहे. पावसाळ्यात तसाही विकासकामांना ब्रेक लागतो. त्यामुळे हे वर्ष विकासाशिवायच जाणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

टॅग्स :wardha-acवर्धा