शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

गावपुढाऱ्यांना पुन्हा निवडणुकीची चिंता, ग्रामपंचायतीची निवडणूक कधी होणार?

By रवींद्र चांदेकर | Updated: May 23, 2024 21:28 IST

लोकप्रतिनिधी हतबल : सर्वत्र प्रशासकांचे राज, विकासाचा हाेतोय खोळंबा

वर्धा : नुकतीच २६ एप्रिल रोजी लोकसभेची निवडणूक आटोपली. आता ४ जूनला निकाल घोषित होणार आहे. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले असताना जिल्ह्यातील ५२१ पैकी निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे तब्बल ३०१ ग्रामपंचायतींची मुदत संपली. त्यामुळे गावपुढाऱ्यांना पुढील ग्रामपंचायत निवडणुकीची चिंता लागली आहे.

लोकसभा निवडणुकीचे कवित्व अद्याप सुरू आहे. यावेळी तुल्यबळ लढत झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, ४ जूनलाच खरे चित्र स्पष्ट होणार आहे. मतदारांनी नेमका कुणाला कौल दिला, हे त्यावेळी समजणार आहे. लोकसभा निवडणुकीची धामधूम संपत नाही तोच जिल्ह्यातील ३१० ग्रामपंचायतींची मुदत संपली. तेथे प्रशासकांना बसविण्यात आले. मात्र, सरपंच संघटनेने थेट न्यायालयाची पायरी चढून प्रशासक नियुक्तीला स्थगिती मिळविली. त्यामुळे तूर्तास सरपंच मंडळी आपल्या पदावर कायम राहणार आहे. मात्र, हे असे किती काळ चालेल, याची शाश्वती नाही. परिणामी, पुढील काळात ग्रामपंचायतींवर पुन्हा प्रशासक बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ग्रमपंचायतींची मुदत संपल्याने आता गावपुढाऱ्यांना पुढील निवडणुकीची चिंता सतावू लागली आहे. ही निवडणूक कधी होणार, याची कुणालाच माहिती नाही. त्यामुळे गावपुढारी, सरपंच, सदस्य हतबल झाले आहे. ग्रामीण भागात ग्रामपंचायतीची निवडणूक लोकसभा, विधानसभेपेक्षाही अत्यंत चुरशीने लढविली जाते. ग्रामपंचायत निवडणूक गाव विकासासाठी महत्त्वाची असते. सरपंच अन् सदस्य बनण्यासाठी अनेक जण इच्छुक असतात. विशेषत: वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायतींना थेट मिळू लागला, तेव्हापासून ही निवडणूक रंगतदार ठरू लागली आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील ३०१ ग्रामपंचायतींची निवडणूक कधी होणार, असा प्रश्न आहे.बॉक्स

जिल्हा परिषदेला ‘वाली’च उरला नाहीगेल्या दोन वर्षांपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक रखडली आहे. मार्च २०२२ मध्ये जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. तेव्हापासून निवडणूक झालीच नाही. त्यामुळे सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांना कुणीच वाली नसल्याचे दिसून येत आहे. दोन्ही ठिकाणी दोन वर्षांपासून प्रशासक राज सुरू आहे. लोकप्रतिनीधींचा वावर संपला आहे. पदाधिकारी आणि सदस्य नसल्याने विकासात बाधा येत असल्याची ओरड सुरू आहे. त्यात आचारसंहितेचे भूत मानगुटीवर बसले आहे. परिणामी, विकासाचा खोळंबा होत असल्याचा सूर ऐकू येत आहे. आता ग्रामपंचायतींची निवडणूक लांबल्यास ग्रामीण भागातही प्रशासक राज अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. चार महिन्यांनी पुन्हा आचारसंहिता

जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींची निवडणूक कधी होणार, हा प्रश्न कायम असताना ऑक्टोबरच्या सुमारास विधानसभेची निवडणूक निश्चित होणार आहे. तत्पूर्वी सप्टेंबरच्या अखेरीस पुन्हा आचारसंहिता लागू हाेण्याची शक्यता आहे. त्यासाठी अवघे चार महिने उरले आहे. लोकसभेची आचारसंहिता सुरू असल्याने अनेक विकासकामे रखडली. विधानसभेची आचारसंहिता लागू झाल्यानंतर पुन्हा विकासाचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. त्यात लवकरच पावसाळा सुरू होत आहे. पावसाळ्यात तसाही विकासकामांना ब्रेक लागतो. त्यामुळे हे वर्ष विकासाशिवायच जाणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

टॅग्स :wardha-acवर्धा