शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

साहेब, रस्ता खोदलाय; बांधकाम कधी? रखडलेल्या कामामुळे नागरिकांना वाहतुकीचा मनस्ताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 16:29 IST

कंत्राटदाराचे काम आस्तेकदम: सिंदी (मेघे) ते शांतीनगर रस्त्याची झाली दैनावस्था

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शहरालगत असलेल्या सिंदी (मेघे) ते शांतीनगर चौकापर्यंतच्या सिमेंटीकणाचे काम गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून सुरू आहे. कंत्राटदाराने एका बाजूने रस्ता खोदून ठेवला असून कामाला गती नसल्याने या रखडलेल्या कामामुळे नागरिकांना वाहतुकीचा चांगलाच मनस्ताप होत असून 'साहेब, रस्ता खोदलायः बांधकाम होणार कधी? असा प्रश्न विचारला जात आहे.

शहरासह लगतच्या ग्रामपंचायत परिसरातील रस्त्यांचीही कामे हाती घेण्यात आली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत ही सिमेंटीकरणाची कामे होत असून या रस्त्याचा मुख्य कंत्राटदार वेगळा आणि काम करणारा कंत्राटदार वेगळा अशी परिस्थिती आहे. त्यामुळे पेटी कंत्राटदारही मनमर्जीने काम करीत असून अधिकाऱ्यांचीही हातचेपी भूमिका राहत असल्याचे दिसून येत आहे. सिंदी (मेघे) ते शांतीनगर चौकापर्यंतच्या १.०१ किलोमीटर रस्त्याच्या सिमेंटीकरणाचे कंत्राट मुंबई येथील एसआरके कंपनीला १३ कोटी रुपयांत दिले आहे. परंतु या रस्त्याचे काम माया तिवारी नामक कंत्राटदार करीत आहे. साधारणतः दोन ते अडीच महिन्यांपासून हा रस्ता एका बाजूने खोदून ठेवला असून कामाची गती फारच मंद असल्याने एका बाजूने वाहतूक करताना नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. एका बाजुने रस्त्याचे खोदकाम केले तर दुसऱ्या बाजुने वाहतूक सुरु असलेल्या रस्त्यावर खड्डे पडले आहे. त्या खड्यात पाणी साचले असून त्यातून मार्गक्रमण करावे लागत आहे. या मार्गावर चांगलीच वर्दळ राहत असून रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे

सुरक्षा कठडे नसल्याने अपघाताचा धोका सिंदी (मेघे) ते शांतीनगर चौक हा रस्ता पुढे बायपास, नागठाणा व उमरीकडे जात असल्याने या रस्त्यावर सतत वर्दळ असते. कंत्राटदाराने हा रस्ता एका बाजूने चांगलाच खोदून ठेवला असून कामही धिम्यागतीने सुरू आहे. खोदकाम केलेल्या रस्त्याच्या बाजूला सुरक्षा कठडे नसल्याने रात्रीच्या सुमारास नवख्या वाहनचालकांना हे खोदकाम लक्षात येत नाही. त्यामुळे वाहने सरळ खोदलेल्या भागात शिरत असल्याचे दिसून येत आहे. अपघाताचे प्रमाण वाढत असून सुरक्षा व्यवस्था करण्याचीही गरज व्यक्त होत आहे.

वेळेत काम पूर्ण करणार का? सार्वजनिक बांधकाम विभागा- कडून ज्या कंत्राटदार कंपनीला काम दिले त्या कंपनीने वर्ध्यातील माया तिवारी नामक कंत्राटदाराला हे काम दिले आहे. दिलेल्या मुदतीत काम करण्याचा करारनामा झाला असला तरी तिवारी नामक कंत्राटदाराने काम कालावधीत पूर्ण केल्याचे ऐकिवात नाही. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जुनापाणी चौक या रस्त्याचे काम अद्यापही पूर्ण झाले नाही. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आरती चौकाचे कामही कालावधीत पूर्ण केले नाही. त्यामुळे सिंदी (मेघे) ते शांतीनगर चौक या रस्त्याचे काम तरी कालावधीत पूर्ण करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

"सिदी (मेघे) ते शांतीनगर चौक या मार्गाच्या सिमेंटीकरणाचे कंत्राट मुंबईच्या कंपनीला दिले असून वर्ध्यातील माया तिवारी हे काम करीत आहेत. दोन महिन्यांपासून कामाला सुरुवात झाली असून पावसाळ्यामुळे सुरुवातीला मुरुमाची अडचण होती. आता मुरुम टाकण्यात आला असून जीएसीबीचे कामही झाले आहे. लवकरच उर्वरित कामे पूर्ण केली जातील. पावसामुळे या रस्त्याच्या कामाची गती कमी झाली."- स्वप्नील खंडार, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

टॅग्स :wardha-acवर्धाroad transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षा