शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

वर्ध्याचा ऑक्सिजन पार्कच्या धर्तीवर कनार्टकमध्ये होणार प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2022 11:06 IST

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची प्रकल्पाला भेट; वर्धेचे सुपुत्र जि. प.चे.मुख्य कार्यकारी अधिकारी

वर्धा : वर्धेच्या हनुमान टेकडी आयटीआय कॉलेजजवळील निसर्गसेवा समितीच्या ऑक्सिजन पार्कच्या धर्तीवर कर्नाटक राज्याच्या होसपेट जिल्ह्यात प्रकल्प राबविला जाणार आहे. होसपेट जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व वर्धेचे सुपुत्र हर्षल नारायणराव भोयर यांनी नुकतीच ऑक्सिजन पार्क प्रकल्पाला भेट दिली. येथील विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली.

पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून विराण टेकडीवर उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाचे त्यांनी कौतुक केले. यावेळी निसर्गसेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे यांनी त्यांना या प्रकल्पातील सर्व वृक्षवल्लींची माहिती दिली. निसर्गसेवा समितीने ८० प्रकारचे विविध वृक्ष येथे लावले आहेत. तसेच वृक्ष वाचनालय हा अभिनव उपक्रमही येथे राबविला जात आहे. याशिवाय बीज संकलन करून नर्सरी तयार करण्यात आली आहे. हा रोप, घनवन प्रकल्प असा हा २५ वर्षांचा प्रवास असून विराण ते हिरवी टेकडी ही सर्वांच्या सहकार्याने तयार झाली आहे, अशी माहिती भोयर यांना बेलखोडे यांनी दिली.

या वेळी होसपेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांनी कर्नाटक राज्याच्या होसपेट भागात शासकीय योजनेच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचे हे मॉडेल उभे केले जाईल, अशी ग्वाही दिली. यावेळी विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

वर्धेचे सुपुत्र आहेत हर्षल भोयर

- माजी न्यायाधीश नारायण व पुष्पा भोयर यांचे सुपुत्र असलेले हर्षल भोयर हे वर्धेचे रहिवासी आहेत. पुण्याच्या सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून आयपीएससाठी त्यांची निवड झाली. पोलीस विभागाची नोकरी सांभाळून त्यांनी आयएएसची तयारी करून परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर त्यांना कर्नाटक राज्याच्या होसपेट येथे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.

टॅग्स :Governmentसरकारwardha-acवर्धा