शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
3
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
4
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
5
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
6
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
7
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
8
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
9
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
10
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
11
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
12
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
13
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
14
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
15
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
16
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
17
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
18
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
19
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
20
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख

विविध समस्यांसंदर्भात आंदोलने करणाऱ्यांची वाढली गर्दी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 16:22 IST

Wardha : समस्यांविरुद्ध आवाज वाढलेत; निवडणूक जवळ आली वाटतं!

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : गेल्या कित्येक वर्षांपासून जिल्ह्यात विविध समस्या कायम असून, त्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते; परंतु गत दोन महिन्यांत विविध प्रश्नांवर जिल्हाधिकारी कार्यालये, तर तालुकास्तरावर तहसील कार्यालयासमोर उपोषणे, आंदोलने करणाऱ्यांची गर्दी वाढली आहे. विशेष म्हणजे या आंदोलनात इच्छुक उमेदवारांची संख्या अधिक असल्याने निवडणूक जवळ आल्याचे जाणवत असल्याची भावना सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे. 

आगामी काही दिवसांत विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानुसार, अनेक इच्छुकांनी तयारी सुरू केल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी मतदारांच्या भेटी घेणे सुरू केले आहे, तसेच इच्छुक उमेदवार मतदारांची समस्या मार्गी लागण्यासाठी तत्पर असल्याचे दिसून येत आहे. एरवी दुर्लक्षित असलेल्या विविध समस्यांसंदर्भात आंदोलनांतची संख्या अचानक वाढल्याने निवडणूक जवळ आली असल्याची चर्चा आहे. 

शहरातील समस्यांबाबत इच्छुकांचा आवाज! आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांकडून शहरातील समस्यांबाबत आवाज उठविला जात आहे. याकरिता जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती, तहसील कार्यालयात धडक देऊन आंदोलने करणाऱ्यांची संख्या अचानक वाढली आहे.

स्थानिक समस्यांवर कुठे आंदोलने होतात? "शहरातील रस्ते दुरुस्तीशिवाय इतर स्थानिक समस्यांवर कुठेही आवाज उठविला जात नाही. शहर स्वच्छतेसह शहरात पार्किंगची समस्या, वाढते अतिक्रमण आदींवर कोणीही बोलायला तयार नाही." - सीताराम सातपुते, वर्धा

शहरातील या समस्यांवर प्रकाश कधी पडणार?मलनिस्सारण योजना : शहरात कोट्यवधी रुपये खर्ची घालून मलनिस्सारण योजना अमलात आणली. मात्र, अद्यापही या योजनेचे काम पूर्णत्वास गेलेले नाही. शिवाय फोडलेल्या रस्त्याचा प्रश्न अजूनही शहरातील काही भागांत कायम आहे. हा महत्त्वाचा प्रश्न असताना मात्र याकडे कुणीही लक्ष देताना दिसून येत नाही. 

शहराची स्वच्छता नाही : शहरातील नियमित स्वच्छता केली जाते. मात्र, असे असताना ठिकठिकाणी कचऱ्याचे ब्लॅक स्पॉट कायम आहेत. यामुळे परिसरात अनेक ठिकाणी दुर्गंधी पसरलेली आहे. याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर : शहरातील प्रमुख मार्गावरील रस्त्यांवर व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. मात्र, पालिका प्रशासनाच्या वतीने मोठ्या व्यावसायिकांना अभय दिले जात असल्याचे दिसून येत आहे. तर लहान व्यावसायीकांवर कारवाई होत आहे. याकडे कुणाचेही लक्ष नाही. 

टॅग्स :wardha-acवर्धा