शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

कंटेनरची उभ्या ट्रकला धडक, आगीत कंटनेर जळून राख

By रवींद्र चांदेकर | Updated: July 12, 2024 19:06 IST

दोघे जखमी : जाम परिसरातील घटना, लाखो रुपयांचे साहित्य जळून राख

वर्धा : भरधाव कंटेनरने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. या अपघातात कंटेनरने पेट घेतल्याने त्यात वाहून नेत असलेले लाखो रुपयांचे साहित्य जळून राख झाले, तर दोघे जण गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवार, १२ रोजी पहाटेच्या सुमारास समुद्रपूर तालुक्यातील जाम परिसरात घडली. चालक अलताफ अली, रा. इलाहाबाद, वाहक दीपक कुमारपाल अशी जखमींची नावे आहे.

गुडगाव दिल्ली येथे एचआर ५५ एएम ३६२१ क्रमांकाचा कंटेनर हैदराबादवरून चप्पल, पर्स बॅग पॅकेट, रेनकोट, लेडीज व जेंट्स गारमेंट, काजू पॅकेट इत्यादी कुरिअरच्या वस्तू घेऊन दिल्ली गुडगाव येथे जाण्यासाठी निघाला होता. दरम्यान जाम परिसरात रस्त्याच्या बाजूला बंद स्थितीत असलेल्या सीजी १३ एलएल ४९३६ क्रमांकाच्या उभ्या असलेल्या ट्रकला या कंटनेरने मागून धडक दिली. या अपघातात कंटेनरला आग लागली. त्यामध्ये चालक अलताफ अली, वाहक दीपक कुमारपाल दोन्ही गंभीर जखमी झाले. घटना लक्षात येताच स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना तसेच हिंगणघाट अग्निशामक विभागाला दिली. हिंगणघाटवरून अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. मात्र, ते पोहोचेपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले. यात कंटेनरमध्ये असलेल्या वस्तू खाक झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस कर्मचारी मनोज कोसूरकर, आशिष कांबळे, जितेंद्र वैद्य, रमाकांत साळवे यांनी घटनास्थळी जाऊन जखमींना हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात व नंतर वर्धा येथे हलविण्यात आले. यासंबंधी समुद्रपूर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघातwardha-acवर्धा