शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

कंटेनरची उभ्या ट्रकला धडक, आगीत कंटनेर जळून राख

By रवींद्र चांदेकर | Updated: July 12, 2024 19:06 IST

दोघे जखमी : जाम परिसरातील घटना, लाखो रुपयांचे साहित्य जळून राख

वर्धा : भरधाव कंटेनरने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. या अपघातात कंटेनरने पेट घेतल्याने त्यात वाहून नेत असलेले लाखो रुपयांचे साहित्य जळून राख झाले, तर दोघे जण गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवार, १२ रोजी पहाटेच्या सुमारास समुद्रपूर तालुक्यातील जाम परिसरात घडली. चालक अलताफ अली, रा. इलाहाबाद, वाहक दीपक कुमारपाल अशी जखमींची नावे आहे.

गुडगाव दिल्ली येथे एचआर ५५ एएम ३६२१ क्रमांकाचा कंटेनर हैदराबादवरून चप्पल, पर्स बॅग पॅकेट, रेनकोट, लेडीज व जेंट्स गारमेंट, काजू पॅकेट इत्यादी कुरिअरच्या वस्तू घेऊन दिल्ली गुडगाव येथे जाण्यासाठी निघाला होता. दरम्यान जाम परिसरात रस्त्याच्या बाजूला बंद स्थितीत असलेल्या सीजी १३ एलएल ४९३६ क्रमांकाच्या उभ्या असलेल्या ट्रकला या कंटनेरने मागून धडक दिली. या अपघातात कंटेनरला आग लागली. त्यामध्ये चालक अलताफ अली, वाहक दीपक कुमारपाल दोन्ही गंभीर जखमी झाले. घटना लक्षात येताच स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना तसेच हिंगणघाट अग्निशामक विभागाला दिली. हिंगणघाटवरून अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. मात्र, ते पोहोचेपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले. यात कंटेनरमध्ये असलेल्या वस्तू खाक झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस कर्मचारी मनोज कोसूरकर, आशिष कांबळे, जितेंद्र वैद्य, रमाकांत साळवे यांनी घटनास्थळी जाऊन जखमींना हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात व नंतर वर्धा येथे हलविण्यात आले. यासंबंधी समुद्रपूर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघातwardha-acवर्धा