शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

जिल्ह्यातील अनाथ मुलांच्या 'बालसंगोपन' निधीला वर्षापासून 'ब्रेक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 18:13 IST

जिल्ह्यात सव्वा चार हजार लाभार्थी : २५ टक्के लाभार्थ्यांना मिळाला केवळ चार महिन्यांचा निधी

चेतन बेले लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पालकत्व गमावलेल्या बालकांसाठी बालसंगोपन योजना राबविली जात आहे. या योजनेचे जिल्ह्यात सव्वा चार हजार लाभार्थी आहेत. यापैकी केवळ २५ टक्के लाभार्थ्यांना चार महिन्यांचा निधी मिळाला आहे. उर्वरित ७५ टक्के लाभार्थ्यांना गेल्या वर्षभरापासून शासनाकडून मिळणारी अनुदानाची रक्कम मिळाली नसल्याने योजना कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे.

बेघर, निराश्रित व अन्य गरजू बालकांना संस्थेत दाखल करून घेण्याऐवजी कौटुंबीक वातावरणात त्यांचे संगोपन व विकास होण्यास संधी उपलब्ध व्हावी, हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवत महिला व बालविकास विभागाने राज्यात बालसंगोपन योजना सुरू केली. या योजनेच्या नावात बदल करून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना असे करण्यात आले आहे. शिवाय अनुदानात दुप्पट वाढ करण्यात आली. यात त्या बालकास अल्प व दीर्घ कालावधीसाठी पर्यायी कुटुंबात संगोपनासाठी निधी देण्यात येतो. एका कुटुंबात दोनपेक्षा जास्त मुले ठेवता येत नाहीत. बहुतेक प्रकरणात संबंधित लाभार्थी मुलांची जबाबदारी नातेवाइकांकडे दिली जाते.

अनुदानात वाढ झाल्याने लाभार्थी संख्येत वाढबालसंगोपन योजनेंतर्गत १८ वर्षांखालील वयोगटातील मुलांना संस्थाबाह्य संगोपन थेट पर्यायी कुटुंब उपलब्ध संगोपन केले जाते. पालनकर्त्या पालकास महिन्याकाठी पूर्वी १ हजार २०० रुपये देण्यात येत होते. यात शासनाने बदल करून अनुदान दुप्पट केले आहे. आता २ हजार २०० रुपये प्रतिलाभार्थी देण्यात येत असल्याने लाभार्थ्यांची संख्याही वाढतीवर असल्याचे सांगण्यात आले आहे.

जूनपासून अनुदान रखडलेजुन महिन्यापासून योजनेचे अनुदान थकले आहे. पूर्वी विभागाच्या खात्यावर योजनेचा निधी येत होता. त्यानंतर हा निधी लाभार्थ्यांच्या खात्यावर वळता करण्यात येत होता. मात्र, नव्याने काढण्यात आलेल्या जीआरमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावर डीबीटी तत्त्वावर थेट निधी जमा करण्यात येत असल्याची माहिती सांगण्यात आली आहे.

२,९६० लाभार्थ्यांना वर्षभरापासून प्रतीक्षागतवर्षी एप्रिल, मे, जून २०२४ या तीन महिन्यांचा १ हजार ३२० रुपये निधी लाभार्थ्यांच्या खात्यावर डीबीटी पद्धतीने जमा करण्यात आला आहे. उर्वरित २ हजार ९६० लाभार्थ्यांना गत वर्षभरापासून निधीसाठी प्रतीक्षा लागली आहे. लाभार्थ्यांची यादी आयुक्तालयाकडे पाठविण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात १,३२० लाभार्थ्यांच्या खात्यावर ४ महिन्यांचा निधी जमा केला. टप्प्याटप्प्यात ही प्रक्रिया सुरू असून, लवकरच उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यावर निधी वळता केला जाणार आहे. लहान वयातच खडतर अनुभवाचा सामना करावा लागणाऱ्या बालकांसाठी ही योजना खऱ्या अर्थाने नवसंजीवनी देणारी आहे.

१३० बालकांच्या अनुदानाला मिळणार थांबायोजनेत १८ वर्षापर्यंत बालकांना योजनेचा लाभ दिला जातो. १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या जिल्ह्यात १३०च्या घरात आहे. या लाभार्थ्यांच्या अनुदानाला थांबा दिला जाणार आहे. 

टॅग्स :wardha-acवर्धा