शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् १४ चिनी नागरिकांचा जीव वाचला; चीननं मानले भारतीय नौदल आणि मुंबई कोस्ट गार्डचे आभार
2
'सोनम रघुवंशी म्हणत होती बिझी आहे, त्याला समजलंच नाही...!'; राजा रघुवंशीच्या मित्रानं केला मोठा खुलासा
3
विजेच्या धक्क्याने बाप गेलाच, दोन्ही मुलं पाणी घेऊन आली अन् त्यांचेही आयुष्य संपलं!
4
राजा रघुवंशी हत्या प्रकरणी मोठा खुलासा; हत्येनंतर सोनम इंदूरला पोहचली होती अन् त्याठिकाणी...
5
तुरुंगात जाणार हे माहित होते, सोनम हत्येपर्यंत का गेली? राजापासून वेगळे होण्याचे हे सोपे मार्ग होते..., पण...
6
मोठा दावा...! संकटात आलाय भारतातील हा मोठा व्यवसाय...! ५७७००० नोकऱ्या गेल्याचा अंदाज 
7
Raj Kushwaha : "राजचं नाव ऐकलं अन्..."; पोलिसांच्या एका ट्रिकने फेल झाला सोनमचा 'तो' प्लॅन
8
जयंत पाटील म्हणाले, मला सगळ्या जबाबदारीतून मुक्त करा; CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
9
गेम खेळण्यासाठी मोबाईल देणं नाकारलं; आईवडिलांवर चिडलेल्या मुलीनं स्वतःलाच संपवलं!
10
सेन्सेक्स घसरला, निफ्टीची नाममात्र वाढ! 'या' शेअर्सनी केली कमाल, बाजारातून मोठे संकेत!
11
सोनं, चांदी, रोख रक्कम नाही तर हुंड्यात मागितली किडनी, नकार दिला तेव्हा...
12
रस्त्यानं चालताना पाय घसरून पडला, पाठीमागून येणाऱ्या बेस्ट बसनं चिरडलं, गोवंडीतील घटना!
13
फारुक अब्दुल्ला यांचा ‘वंदे भारत’ने प्रवास, चिनाब नदीवरील पुल येताच झाले भावुक; म्हणाले...
14
Austria Shooting: बंदूक घेऊन विद्यार्थी थेट शाळेत घुसला, केला अंदाधुंद गोळीबार; ९ जणांचा मृत्यू, स्वतःलाही संपवलं
15
ICICI आणि HDFC बँकेचा ग्राहकांना धक्का! एका निर्णयामुळे होणार लाखो रुपयांचे नुकसान?
16
पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना ३३७३० रूपये विद्यावेतन मिळणार; कॅबिनेट बैठकीत ३ महत्त्वाचे निर्णय
17
Inspirational: 'या' तीन गोष्टी आजपासून फॉलो करा, पाच वर्षांनी लोक तुम्हाला फॉलो करतील!
18
भारतीयांनी ज्या देशाला 'बॉयकॉट' केलं, त्याचीच ग्लोबल ब्रँड अँबेसिडर बनली कतरिना कैफ
19
अनिल अंबानींच्या कंपनीनं तोडला १० वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड, एकाच महिन्यात कमावले हजारो कोटी

'भरोसा'चा दिलासा; घटस्फोटापर्यंत गेलेल्या ८६२ संसारांचा धागा जुळवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 16:40 IST

पोलिसांच्या समुपदेशनातून मिळाले यश : आठ महिन्यांत ९३९ तक्रारी झाल्या प्राप्त

चैतन्य जोशी लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : सध्या सोशल मीडियाच्या वापरामुळे पती-पत्नीत वादाचे प्रमाण वाढले आहे. वादाचे परिणाम थेट घटस्फोटापर्यंत जाऊन ठेपले आहे. असे असताना पोलिस अधीक्षक कार्यालयातील भरोसा सेलने आलेल्या करून तक्रारीवर समुपदेशन विस्कटलेले संसार पुन्हा जोडण्याचे काम केले आहे. मागील आठ महिन्यांत ९३९ तक्रारी आल्या, त्यापैकी ८६२ जोडप्यांचे संसार पुन्हा जुळविण्यात यश आले आहे.

पोलिस अधीक्षक कायार्लयात भरोसा सेलची निर्मिती करण्यात आली. या कक्षांतर्गत महिला सुरक्षा, विशेष बालसाहाय्य, स्त्री-भ्रूणहत्या, कौटुंबिक हिंसाचार, वयोवृद्धांचे समुपदेशन केले जाते. दिवसभरात सरासरी १५ ते २० तक्रारी प्राप्त होतात. त्यानंतर विस्कळीत झालेल्या जोडप्यांचे समुपदेशन करून त्यांचा सुखी संसार पुन्हा सुरू करण्यास मदत केली जाते.

अनेक जोडपे समुपदेशन झाल्यावर आपला सुखी संसार पुन्हा सुरू करण्यासाठी तयार होतात. समुपदेश केल्यानंतरही काही समाधानी होत नाहीत किंवा आपल्या तक्रारीवर ठाम असतात. अशा जोडप्यांना त्यांच्या अधिकाराची माहिती देऊन न्यायालयात दाद मागण्याचा मार्ग दाखविला जातो. मागील काही वर्षांत संसार जुळविण्यात या कक्षाची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. शहरासह जिल्ह्यात कोरोना महामारीपासून अनेकांचे रोजगार हिरावले, अनेक जण रस्त्यावर आले. अशातच काहींच्या नोकऱ्या 'वर्क फ्रॉम होम' झाल्या, यामुळे अनेक कुटुंबामध्ये खटके उडू लागले. अशातच पोलिस अधीक्षक कार्यालयातील भरोसा सेलमध्येही तक्रारींचा ओघ वाढू लागला आहे. नवरा दारु पितो, मोबाईलवर राहतो, असे अगदी क्षुल्लक वाद पोलिस ठाण्याची पायरी चढत आहे. 

महिलांना मिळतोय आधारया कक्षाच्या निर्मितीमुळे पीडित महिलांना आधार मिळाला आहे. सध्या कक्ष प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक माधुरी वाघाडे यांच्यासह आठ ते दहा महिला कर्मचारी कार्यरत आहेत. याठिकाणी तक्रार दाखल होताच कक्षातील समुप- देशन अधिकारी तक्रारदार महिला व ज्याच्या विरोधात तक्रार केली अशा दोघांचेही समुपदेशन करतात.

आठ महिन्यांतील किती अर्ज ? महिना                    प्राप्त तक्रारी               निपटारा               दाखल गुन्हेजानेवारी                     ११५                             ११५                          ०१फेब्रुवारी                       ८९                              ८९                          ०१मार्च                           १२१                              १२१                         ०३एप्रिल                         १०१                              १०१                          ०२मे                               १११                              १११                          ०२जून                             १४५                             १४५                         ०४जुलै                             १४५                             १४५                         ०३ऑगस्ट                         ११२                              ७७                          ०३

हे काय तक्रारीचे कारण झाले ? 

  • पत्नीचे सोशल मीडियावर दिवसेंदिवस फॉलोअर्स कसे काय वाढत चालले. 
  • पतीने पत्नीचा मोबाइल हिसकावत विनाकारण वाद घातल्याने हे प्रकरण घटस्फोटापर्यंत येऊन ठेपले.
  • पती दारु पितो, मोबाईलवर जास्त वेळ घालवतो. वेळ देत नाही.

३५ प्रकरणांत समुपदेशन सुरूभरोसा सेलमधील महिला पोलिस कर्मचाऱ्यांकडून दुरावलेल्या दाम्पत्यांचे समुपदेशन केले जाते. मागील आठ महिन्यांत तब्बल ९३९ तक्रारी भरोसाकडे प्राप्त झाल्या. यापैकी ८६२ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. मात्र, काही प्रकरणे पोलिस ठाण्याची पायरी चढले असून, तब्बल ३५ प्रकरणे प्रलंबित असून, या प्रकरणांत दाम्पत्यांचे समुपदेशन सुरू आहे. 

"भरोसा सेलकडे केवळ महिलाच नाही, तर पुरुष, बालके, वयोवृद्धही तक्रार करू शकतात. त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन त्याचे समुपदेशन केले जाते. कोणताही संकोच न बाळगता तक्रारीसाठी पीडितांनी तक्रारीसाठी पुढे यावे."- माधुरी वाघाडे, सहायक पोलिस निरीक्षक, भरोसा सेल

 

टॅग्स :wardha-acवर्धा