शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

व्याघ्र दर्शनामुळे दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 22:57 IST

तालुक्यातील लाडकी व सावंगी (हेटी) परिसरात वाघाने दर्शन होत असल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाच्या भीतीमुळे शेतकरी व शेतमजुर शेतात जाण्यास टाळत असून वन्यप्राण्यांकडून उभ्या शेतपिकांची नासडी केली जात आहे. त्यामुळे या भागातील वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी आहे.

ठळक मुद्देलाडकी, सावंगी शिवारातील घटना : नागरिकांची अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : तालुक्यातील लाडकी व सावंगी (हेटी) परिसरात वाघाने दर्शन होत असल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाच्या भीतीमुळे शेतकरी व शेतमजुर शेतात जाण्यास टाळत असून वन्यप्राण्यांकडून उभ्या शेतपिकांची नासडी केली जात आहे. त्यामुळे या भागातील वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी आहे.हिंगणघाट तालुका आतापर्यंत वाघाच्या प्रकोपापासून दूरच होता. मात्र, आता या भागातही पट्टेदार वाघाचे दर्शन झाल्याने त्याबाबतची नोंद घेण्यात आली आहे. या वाघाचा सध्या लाडकी व सावंगी (हेटी) परिसरात मुक्तसंचार होत असल्याने शेतीची विविध कामे सध्या ठप्प पडली आहेत. आज सकाळी वाघाने बैलाला गतप्राण केल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. लाडकी व सावंगी (हेटी) शिवार चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्याला लागून आहे. शनिवारी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील नागरी येथील रेल्वे पुलाजवळ पहाटे ६.३० वाजताच्या सुमारास व्याघ्र दर्शन झाले. तेव्हापासून वाघाचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी आहे.दहा गावांना सतर्कतेचा इशाराहिंगणघाट तालुक्यातील लाडकी व सावंगी (हेटी) शिवारात पट्टेदार वाघ दिसून येत असल्याने अनुचित घटना टाळण्यासाठी वन विभागाच्यावतीने परिसरातील दहा गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या गावातील नागरिकांना दिवसाला एकटे फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. शिवाय लहान मुलांसह महिलांना रात्रीला घराबाहेर निघण्याचे टाळण्यास सांगण्यात आले आहे. या भागात मुक्तसंचार होणार वाघ सुमारे ३ वर्षांचा असल्याचे सांगण्यात येते. तर वन विभागाची सात अधिकाºयांसह कर्मचाºयांची चमु सध्या परिसरात गस्त घालत आहेत.बैलाचा पाडला फडशावडनेर/ हिंगणघाट : नजीकच्या सारंगी (हेटी) शिवारात व्याघ्र दर्शन होत असल्याने या भागातील नागरिकांसह शेतकºयांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इतकेच नव्हे तर वाघाच्या भीतीमुळे या भागातील शेतीची कामे पुर्णपणे ठप्प झाली आहेत. अनिल किसना साबळे यांच्या मालकीचा बैलाचा वाघाने फडशा पाडला. यामुळे त्यांचे बºयापैकी नुकसान झाले आहे. तर दिलीप राऊत, गोपीनाथ दाते, हर्षल सावंकार यांना नदीच्या काठच्या परिसरात वाघाचे दर्शन झाले. घटनेची माहिती मिळताच वर्धा वनपरिक्षेत्र अधिकारी सागर बन्सोड, क्षेत्र सहायक एस. ए.काटकर, अमोल पिसे, प्रदीप थुल व प्रदीप दळवेयांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.