शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
2
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
3
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
4
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
5
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
6
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
7
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
8
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
9
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
10
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
11
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
12
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
13
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
14
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
15
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
16
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
17
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
18
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
19
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
20
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक

दहाव्या दिवशी शिक्षकांचे उपोषण स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 23:58 IST

जिल्ह्यातील ३० शिक्षकांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट करण्याबाबत १ जानेवारीपासून जिल्हा परिषदेसमोर २० शिक्षकांसह आंदोलन सुरू करण्यात आले होते. याबाबत शिक्षण विभागाचे अवर सचिव रोहटकर यांचे शिक्षणमंत्र्यांकडे १६ जानेवारीला सभा असल्याचे पत्र बुधवारी प्राप्त झाले.

ठळक मुद्देउपोषणकर्त्यांची मागणी थेट शिक्षणमंत्र्यांच्या दालनात

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील ३० शिक्षकांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट करण्याबाबत १ जानेवारीपासून जिल्हा परिषदेसमोर २० शिक्षकांसह आंदोलन सुरू करण्यात आले होते. याबाबत शिक्षण विभागाचे अवर सचिव रोहटकर यांचे शिक्षणमंत्र्यांकडे १६ जानेवारीला सभा असल्याचे पत्र बुधवारी प्राप्त झाले. यावरून रात्री उपोषण स्थगित करण्यात आले.शालार्थ प्रणालीत नावे समाविष्ट करण्याचे राज्यात १२०० पेक्षा अधिक प्रकरणे संचालक पुणे स्तरावर बºयाच महिन्यांपासून प्रलंबित आहेत. यात वर्धा जिल्ह्यातील ३० प्रकरणे प्रलंबित होती. मागील ४-५ वर्षंपासून वेतन नसलेल्या शिक्षकांनी कंटाळून १ जानेवारीपासून बेमुदत उपोषण सुरू केले. यात आंदोलन काळात आठ शिक्षकांची शालार्थ आयडीची प्रकरणे मान्य करून अन्य प्रकरणांत जाणीवपूर्वक त्रुटी काढल्याने आंदोलक संतापले. जोपर्यंत सर्वांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचे ठरले. शेवटी लोकप्रतिनिधींनी मध्यस्थी करून शिक्षणमंत्र्यांकडे चर्चा करण्याचे आश्वासन दिले. यामुळे सातव्या दिवशी बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले. शिक्षक आ. नागो गाणार, शिक्षक परिषदेचे वेणू कडू, नरेंद्र वातकर यांनी मंत्र्यालयात पाठपुरावा करून शिक्षकमंत्र्याकडे १६ जानेवारी रोजी वर्धा जिल्ह्यातील शिक्षकांचे शालार्थ आयडीमध्ये नावे समाविष्ट करण्याबाबतच्या सभेचे पत्र प्राप्त झाले. यामुळे १ जानेवारीपासून सुरू केलेले आंदोलन दहाव्या दिवशी स्थगित करण्यात आले. आता शिक्षण मंत्र्यांच्या निर्णयाकडे आंदोलकांचे लक्ष लागले आहे. आंदोलनकर्त्यांना न्याय न मिळाल्यास अधिक उग्र आंदोलन करण्याचा इशारा अजय भोयर यांनी दिला आहे.आंदोलनाला मागील दहा दिवसांपासून ५०० शिक्षकांनी भेटी दिल्या. आंदोलनाला मनोहर वाके, अनिल टोपले, मुकेश इंगोले, नरेंद्र थुटे, संजय बारी, सुनील गायकवाड, चंदू वाणी, रवी कोठेकर, पुंडलिक नाकतोडे, पुंडलिक राठोड, रहिम शहा, विद्याधर वानखेडे, राजू कारवटकर, रमेश टपाले, धिरज समर्थ, अशोक काळे, अमोल वाशिमकर, परमेश्वर केंद्रे, संजय चौधरी, राजेंद्र तिरभाने, उद्धव गाढे, गजानन साबळे, मनीष मारोटकर, अशोक काळे, धनराज कावटे आदींनी सहकार्य केले.