शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

काँग्रेस नेत्यांच्या ताणाताणीत कार्यकर्त्यांमध्ये ताटातूट? आपापसातील कुरघोडींमुळे पक्षाची वाट बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2022 14:01 IST

वर्धा जिल्ह्यात खासदारांसह भाजपचे तीन, तर काँग्रेसचा एक आमदार आहे. भाजपनंतर काँग्रेस हाच जिल्ह्यात मोठा पक्ष असून दोन गटांत विभागला गेला आहे.

ठळक मुद्देऑनलाईन सदस्य नोंदणीतही जिल्हा माघारला

वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारधारेवर काम करणाऱ्या काँग्रेस पक्षाचा वर्धा जिल्हा एकेकाळी बालेकिल्ला होता; पण हा बालेकिल्ला गटबाजीमुळे पुरता खिळखिळा झाला आहे. स्थानिक नेत्यांच्या आपसी मतभेदामुळे कार्यकर्तेही कमालीचे अस्वस्थ असून अशीच परिस्थिती राहिली तर आगामी निवडणुकींच्या काळात कार्यकर्त्यांतही ताटातूट होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चर्चा आता काँग्रेसच्याच गोटातून होऊ लागली आहे.

जिल्ह्यातील काँग्रेस काही वर्षांपासून दोन गटांमध्ये विभागली गेली आहे. दोन्ही गटांत समेट घडवून आणण्यात काँग्रेसचे अनुभवी नेते पालकमंत्री सुनील केदार यशस्वी होतील, असा विश्वास काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाही होता. त्यांनी नगरपंचायतीच्या निवडणुकीदरम्यान तसे प्रयत्नही केले; परंतु त्यात त्यांना यश आले नाही. अखेर काँग्रेस उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. तरीही नेत्यांमधील हेवेदावे संपायचे नाव घेत नाही.

नुकताच कारंजा तालुक्यातील नारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्याला उद्घाटक म्हणून पालकमंत्री सुनील केदार यांची उपस्थिती होती. पालकमंत्री कार्यक्रमाच्या वेळेपूर्वीच कारंजा येथील विश्रामगृहामध्ये पोहोचले. विशेषत: येथील नगरपंचायतमध्ये काँग्रेसची सत्ता असतानाही काँग्रेसचा एकही नेता किंवा पदाधिकारी विश्रामगृहात आला नाही.

याशिवाय ज्या गावात प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन होते त्या गावातही काँग्रेसची सत्ता आहे; परंतु पालकमंत्री उपस्थित असताना काँग्रेसचे सरपंच, माजी आमदार किंवा नगरपंचायतचे पदाधिकारी व काँग्रेसचे पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. अखेर पालकमंत्र्यांना भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच हा उद्घाटन सोहळा पार पाडावा लागला. यामुळे जिल्ह्यात काँग्रेसचे ‘हम नही सुधरेंगे’ असेच धोरण असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.

जिल्ह्यात राज्याचे तीन पदाधिकारी

जिल्ह्यात खासदारांसह भाजपचे तीन, तर काँग्रेसचा एक आमदार आहे. भाजपनंतर काँग्रेस हाच जिल्ह्यात मोठा पक्ष असून दोन गटांत विभागला गेला आहे. जिल्ह्यात काँग्रेसचे दोन राज्य कार्यकारिणीचे उपाध्यक्ष असून एक सचिवही आहे. असे असतानाही आपापसातील कुरघोडीमुळे काँग्रेसची वाट फार बिकट होत आहे. काँग्रेसची विचारधारा तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याकरिता ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ या अभियानाच्या माध्यमातून ऑनलाईन सदस्य नोंदणी सुरू केली आहे. मात्र, याला अल्प प्रतिसाद असून राज्यात वर्धा जिल्हा शेवटून आठव्या स्थानी असल्याची माहिती आहे. या नोंदणीकरिता कार्यकर्ते झटत असताना नेत्यांचे सहकार्य नसल्याची ओरड होत आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी याकडे विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Politicsराजकारणwardha-acवर्धा