शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

काँग्रेस नेत्यांच्या ताणाताणीत कार्यकर्त्यांमध्ये ताटातूट? आपापसातील कुरघोडींमुळे पक्षाची वाट बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2022 14:01 IST

वर्धा जिल्ह्यात खासदारांसह भाजपचे तीन, तर काँग्रेसचा एक आमदार आहे. भाजपनंतर काँग्रेस हाच जिल्ह्यात मोठा पक्ष असून दोन गटांत विभागला गेला आहे.

ठळक मुद्देऑनलाईन सदस्य नोंदणीतही जिल्हा माघारला

वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारधारेवर काम करणाऱ्या काँग्रेस पक्षाचा वर्धा जिल्हा एकेकाळी बालेकिल्ला होता; पण हा बालेकिल्ला गटबाजीमुळे पुरता खिळखिळा झाला आहे. स्थानिक नेत्यांच्या आपसी मतभेदामुळे कार्यकर्तेही कमालीचे अस्वस्थ असून अशीच परिस्थिती राहिली तर आगामी निवडणुकींच्या काळात कार्यकर्त्यांतही ताटातूट होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चर्चा आता काँग्रेसच्याच गोटातून होऊ लागली आहे.

जिल्ह्यातील काँग्रेस काही वर्षांपासून दोन गटांमध्ये विभागली गेली आहे. दोन्ही गटांत समेट घडवून आणण्यात काँग्रेसचे अनुभवी नेते पालकमंत्री सुनील केदार यशस्वी होतील, असा विश्वास काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाही होता. त्यांनी नगरपंचायतीच्या निवडणुकीदरम्यान तसे प्रयत्नही केले; परंतु त्यात त्यांना यश आले नाही. अखेर काँग्रेस उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. तरीही नेत्यांमधील हेवेदावे संपायचे नाव घेत नाही.

नुकताच कारंजा तालुक्यातील नारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्याला उद्घाटक म्हणून पालकमंत्री सुनील केदार यांची उपस्थिती होती. पालकमंत्री कार्यक्रमाच्या वेळेपूर्वीच कारंजा येथील विश्रामगृहामध्ये पोहोचले. विशेषत: येथील नगरपंचायतमध्ये काँग्रेसची सत्ता असतानाही काँग्रेसचा एकही नेता किंवा पदाधिकारी विश्रामगृहात आला नाही.

याशिवाय ज्या गावात प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन होते त्या गावातही काँग्रेसची सत्ता आहे; परंतु पालकमंत्री उपस्थित असताना काँग्रेसचे सरपंच, माजी आमदार किंवा नगरपंचायतचे पदाधिकारी व काँग्रेसचे पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. अखेर पालकमंत्र्यांना भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच हा उद्घाटन सोहळा पार पाडावा लागला. यामुळे जिल्ह्यात काँग्रेसचे ‘हम नही सुधरेंगे’ असेच धोरण असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.

जिल्ह्यात राज्याचे तीन पदाधिकारी

जिल्ह्यात खासदारांसह भाजपचे तीन, तर काँग्रेसचा एक आमदार आहे. भाजपनंतर काँग्रेस हाच जिल्ह्यात मोठा पक्ष असून दोन गटांत विभागला गेला आहे. जिल्ह्यात काँग्रेसचे दोन राज्य कार्यकारिणीचे उपाध्यक्ष असून एक सचिवही आहे. असे असतानाही आपापसातील कुरघोडीमुळे काँग्रेसची वाट फार बिकट होत आहे. काँग्रेसची विचारधारा तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याकरिता ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ या अभियानाच्या माध्यमातून ऑनलाईन सदस्य नोंदणी सुरू केली आहे. मात्र, याला अल्प प्रतिसाद असून राज्यात वर्धा जिल्हा शेवटून आठव्या स्थानी असल्याची माहिती आहे. या नोंदणीकरिता कार्यकर्ते झटत असताना नेत्यांचे सहकार्य नसल्याची ओरड होत आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी याकडे विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Politicsराजकारणwardha-acवर्धा