शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

निसर्गकोपाचे दहा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 06:00 IST

मागील उन्हाळ्यातील जलाशयांची खालावलेली पातळी आणि दीड महिना उशिरा आलेल्या पावसामुळे यावर्षी जलाशयाची पातळी सुधारेल की नाही, अशी शंका होती. पण; उशिरा का होईना आलेल्या दमदार पावसाने सर्वच जलाशय ओव्हरफ्लो करुनच उसंत घेतली. त्यामुळे नदी-नाल्यांनाही पूर आल्याने या पुरामध्ये सात जण वाहून गेले.

ठळक मुद्देनैसर्गिक आपत्ती : जून ते सप्टेंबर या चार महिन्यांतील वास्तव

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यावर्षी वरुणराजाने तब्बल दीड महिना उशिराने कृपादृष्टी करित जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले. त्यामुळे जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत नदी-नाल्यांना आलेला पूर आणि विजेच्या स्पर्शाने जिल्ह्यातील दहा जणांना आपला जीव गमवावा लागल तर पाच जण जखमी झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.मागील उन्हाळ्यातील जलाशयांची खालावलेली पातळी आणि दीड महिना उशिरा आलेल्या पावसामुळे यावर्षी जलाशयाची पातळी सुधारेल की नाही, अशी शंका होती. पण; उशिरा का होईना आलेल्या दमदार पावसाने सर्वच जलाशय ओव्हरफ्लो करुनच उसंत घेतली. त्यामुळे नदी-नाल्यांनाही पूर आल्याने या पुरामध्ये सात जण वाहून गेले. यामध्ये बाहेर राज्यातील एकाचा समावेश आहे. या सात जणांपैकी एकाचा अद्यापही मृतदेह सापडला नसल्याची नोंद आहे.यासोबतच शेतशिवारात काम करीत असताना पडलेल्या विजेमुळेही तीन जणांना आपला जीव गमवावा लागला. तर पाच जण जखमी झाले होते. जखमींवर उपचार केल्याने सध्या त्यांची प्रकृती सुधारली आहे.या निसर्ग कोपामुळे चार महिन्यात दहा जणांचा बळी गेला असून शासनानेही याची नोंद घेत तत्काळ आर्थिक मदत दिली आहे.८९ जनावरे दगावलीनैसर्गीक आपत्तीचा जनसामान्यांसह पुशधनालाही मोठा फटका बसला. या चार महिन्यात जिल्ह्यातील जवळपास ८९ जनावरांचा मृत्यू झाला. यामध्ये मोठी दुधाळ जनावरे ४०, लहान जनावरे २४, बैल २४ आणि १ गोºह्याचा समावेश आहे. ऐन हंगामात पूर आणि विज पडल्यामुळे जनावरे दगावल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. दगावलेल्या जनावरांची किंमत जास्त असतानाही शासनाकडून मिळालेली मदत ही तोकड्या स्वरुपाची असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.मृतकाच्या परिवाराला मिळाली शासकीय मदतशासनाकडून मृतकाच्या परिवाराला प्रत्येकी चार लाखाची मदत देण्यात आली. वीज पडून मृत पावलेल्या तिघांपैकी दोघांना मदत मिळाली असून एकाला मदत देण्याची प्रक्रिया सुरु आहे. तर पुरात वाहून गेलेल्या सात जणांपैकी एक बाहेर राज्यातील आहे तर एकाचा मृतदेह अद्याप सापडला नाही. त्यामुळे उर्वरित मृतकांच्या परिवाराला प्रत्येकी ४ लाख रुपयांप्रमाणे मदत देण्यात आली.यासोबतच जखमींना मदत मिळाली असून एक आठवड्यापर्यंत रुग्णालयात उपचार घेणाºयाला ४ हजार ३०० रुपये तर एक आठवड्यापेक्षा जास्त दिवस उपचार घेणाऱ्याला १२ हजार ७०० रुपयाची मदत दिली आहे.नैसर्गिक आपत्तीत दगावलेल्या ४० मोठ्या दुधाळ जनावरांच्या मालकांना प्रत्येकी ३० हजार रुपये तर लहान दुधाळ जनावरे, बैल अशा ४८ जनावरांच्या मालकांना प्रत्येकी २५ हजार आणि गोºह्याच्या मोबदल्यात १६ हजार रुपयाची शासनाने मदत दिली आहे.

टॅग्स :Natureनिसर्ग