शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

सांगा,स्वतंत्र आदिवासी कार्यालय कधी मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 00:01 IST

जिल्ह्यात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ या समाजापर्यंत पोहचण्याकरिता वर्ध्यात स्वतंत्र एकात्मिक प्रकल्प कार्यालय उभारण्यात यावे, अशी कित्येक दिवसाची मागणी आहे.

ठळक मुद्देपंकज भोयर : एकात्मिक प्रकल्प कार्यालयासाठी लक्षवेधी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ या समाजापर्यंत पोहचण्याकरिता वर्ध्यात स्वतंत्र एकात्मिक प्रकल्प कार्यालय उभारण्यात यावे, अशी कित्येक दिवसाची मागणी आहे. पण ही मागणी लालफीतशाहीत अडकल्याने आमदार डॉ. पंकज भोयर यांनी विधानसभेत यासंदर्भात आवाज बुलंद केला. ‘आदिवासी समाजाची फरफट कधी थांबणार, आदिवासींना हक्काचे स्वतंत्र कार्यालय कधी मिळणार’ असा प्रश्न उपस्थित करुन सभागृहाचे लक्ष वेधून घेतले.आदिवासी समाजासाठी शासन अनेक योजना राबवित आहे. पण त्याच्या लाभ घेताना जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वर्ध्यात स्वतंत्र प्रकल्प कार्यालय नसल्याने शासनाच्या योजनांचा लाभ व कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी नागपुर येथील प्रकल्प कार्यालयात येरझरा माराव्या लागतात. त्यामुळे पैसा व वेळेचा अपव्यय होऊन योजनांचा लाभ मिळण्यासही विलंब होतो. जिल्ह्यात आदिवासी समाजाची लोकसंख्या १२ टक्याच्या वर आहे. पण वर्धा येथे आदिवासी प्रकल्प कार्यालय नाही. याउलट नागपूर व भंडारा येथे आदिवासींची लोकसंख्या १० टक्याच्या आत असताना तिथे मात्र स्वतंत्र प्रकल्प कार्यालय आहे. त्यामुळे वर्धा येथे स्वतंत्र प्रकल्प कार्यालय सुरु करण्यात यावे, अशी मागणी अनेक वर्षापासून आदिवासी समाज करीत आहे. आदिवासी बांधवांच्या मागणीनुसार आमदार या नात्याने डॉ. पंकज भोयर यांनीही शासनाकडे याबाबत पाठपुरावा केला आहे. परिणामी वर्ध्यात स्वतंत्र प्रकल्प कार्यालय सुरु करण्याचा प्रस्ताव एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय नागपूर; यांनी अप्पर आयुक्त आदिवासी विभाग,नागपूर व आयुक्त आदिवासी विभाग नाशिक यांच्याकडे पाठविला. त्यांनी सकारात्मक अभिप्राय देऊन २८ जुलै २०१५ रोजी राज्य सरकारकडे पाठविला. या प्रस्तावाला आदिवासी विभागाच्या मंत्र्यांनीही मान्यता दिली. २५ आॅक्टोबर २०१८ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्धा येथील जाहीर सभेत वर्धा येथे स्वतंत्र एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय सुरु करण्याची घोषणा केली. परंतु प्रशासकीय स्तरावर आदेश काढण्यास प्रचंड विलंब होत आहे. त्यामुळे आदिवासी समाजात असंतोष वाढत आहे. या गंभीर बाबीची दखल सरकार ने घ्यावी व तातडीने या संदर्भात निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार डॉ. पंकज भोयर यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून केली आहे. आता शासनास्तरावरुन कधी निर्णय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.आमदारांच्या पाठपुराव्याला समाजबांधवांची साथजिल्ह्यात १२ टक्के आदिवासी बांधव असल्याने त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यास अडचणी होत असल्याने वर्ध्यात आदिवांसंीचे एकात्मिक कार्यालय उभारण्यासाठी आमदार डॉ.पंकज भोयर यांनीच सुरुवातीपासून पाठपुरावा सुरु केला आहे. त्यांच्या पाठपुराव्याल आदिवासी समाज बांधवांचीही साथ असल्याने कार्यालयाची निर्मिती झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशीच भूमिका आमदारांनी घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लवकरच हा प्रश्नही मार्गी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :Pankaj Bhoyarपंकज भोयर