शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
5
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
6
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
7
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
8
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
10
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
11
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
12
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
13
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
14
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
15
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
16
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
17
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
18
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
19
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
20
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
Daily Top 2Weekly Top 5

तुरीवर अळ्यांचा प्रकोप

By admin | Updated: November 16, 2015 00:41 IST

गत पंधरवड्यापासून असलेल्या ढगाळ वातावरणाचा फटका तुरीला बसला आहे. ढगाळ वातावरणामुळे

ढगाळ वातावरण : महागड्या फवारणीचा भुर्दंडआर्वी : गत पंधरवड्यापासून असलेल्या ढगाळ वातावरणाचा फटका तुरीला बसला आहे. ढगाळ वातावरणामुळे तूर पिकावर मोठ्या प्रमाणावर अळ्यांचा प्रकोप पहावयास मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. यावर कृषी विभागाकडून मार्गदर्शन मिळण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. आर्वी तालुक्यातील वाठोडा, वागडा, अल्लीपूर, खुबगाव, सर्कसपूर, लाडेगाव, मांडपूर, बाजरवाडा, दहेगाव, निबोंली (शेंडे), देऊरवाडा, जळगाव, टाकरखेडा, परतोडा, वर्धमनेरी, वाढोणा, गुमगाव, पिंपळखुटा आदी गावांसह इतरही गावांतील शेत शिवारात अळ्यांचा प्रकोप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. याचा फटका तूर उत्पादकांना सोसावा लागणार असल्याचे बोलल्या जात आहे. यावर आळा घालण्यासाठी शेतकरी सध्या शेतात फवारणी करीत आहे. पण त्याचा तितकासा उपयोग होत नसल्याचेही सांगण्यात येत आहे. पंधरवड्यापासून आर्वी तालुक्यात ढगाळ वातावरण आहे. हे वातावरण तुरीवरील अळ्यांसाठी पोषक असते. दिवाळीपुर्वी फुलाने बहरलेल्या तुरीला स्वच्छ उन्हाची गरज असते. परंतु त्याच दरम्यान ढगाळ वातावरण सतत राहिल्याने तूर पिकावर अळ्यांचा प्रकोप वाढायला सुरुवात झाली आहे. यावर्षी तूर पिकाचे दर हे १३ हजारापर्यंत गेले. ओलीताची सोय असलेले शेतकरी नगदी पीक म्हणून तूर पिकाकडे बघतात. यावर्षी कपाशीचे पीक समाधानकारक नसल्याने व त्यातही कापसाचा भाव चार हजाराच्या वर जात नसल्याने शेतकरी आधीच आर्थिक विवंचनेत आहे. त्यातच तूर पिकांवर अळ्यांचा प्रकोप आल्याने शेतकऱ्यांवर दुष्काळात तेरावा महिना साजरा करीत महागडी औषध फवारणीची वेळ आली आहे. सध्या शेतकरी मोठ्या प्रमाणावर कृषी केंद्रातून तूर पिकावर फवारणीचे औषध घेत आहे. मागील वर्षी तूरीला पिकाला समाधानकारक भाव मिळाल्याने यावर्षीही त्यांनी या पिकावर लक्ष केंद्रीत केले. परंतु त्यालाही ढगाळ वातावरणाचा फटका बसल्याने शेतकऱ्यांना त्याचा चांगलाच फटका बसत आहे. वातावरणातील बदल व नोव्हेंबर महिना अर्धा होऊनही थंडी न वाढल्याने याचा दुष्परिणाम तूर पिकावर झाल्याचे बोलल्या जाते. कृषी विभागाने यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.(तालुका प्रतिनिधी)