शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

विद्यार्थ्यांचे अध्यापन मात्र सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 23:15 IST

कमी पटसंख्यांच्या कारणावरून शाळा बंद करण्याचा निर्णय शिक्षण विभागाच्यावतीने घेण्यात आला. त्यावर जिल्ह्यात अंमल करण्यात आला असून सहा शाळा बंद करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यातील सहा शाळांना कुलूप

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कमी पटसंख्यांच्या कारणावरून शाळा बंद करण्याचा निर्णय शिक्षण विभागाच्यावतीने घेण्यात आला. त्यावर जिल्ह्यात अंमल करण्यात आला असून सहा शाळा बंद करण्यात आल्या आहेत. सुरू सत्रात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची काळजी घेत त्या शाळा कागदावर बंद करण्यात आल्या आहे. शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना मात्र गावातच धडे देत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घेत हा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हा परिषद सांगत आहे.या शाळा बंद झाल्यास अर्ध्या सत्रातच विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडण्याची शक्यता आहे. शिवाय मध्येच कोणत्या शाळेत त्यांचे समायेजन करावे असा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत वर्तविण्यात आला होता. यावर जिल्हा परिषदेच्या सभासदांच्या म्हणण्यानुसार अध्यक्ष नितीन मडावी, शिक्षण सभापती जयश्री गफाट व तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांनी या शाळा विद्यार्थ्यांकरिता कागदोपत्री बंद करण्याचा निर्णय घेतला. शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयामुळे या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड वपडणार नाही, हे मात्र तितकेच खरे.कमी पटसंख्येच्या जिल्ह्यातील एकूण २८ शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर जिल्ह्यात कारवाई सुरू झाली आहे. प्रारंभी सहा शाळा बंद करण्यात आल्या आहेत. पण शाळा बंद करताना विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची आबाळ होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे. यामुळे असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.उर्वरीत शाळा नव्या शैक्षणिक सत्रात बंद करण्यात येणार आहेत. यातील विद्यार्थ्यांचे समायोजन लगतच्या शाळेत करण्यात येणार आहे. पण या शाळेत हे विद्यार्थी जाणार कसे याचा विचार शासनाच्यावतीने करण्यात आला नाही. वर्धा जिल्हा परिषदेने घेण्यात आलेला हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे, यात दुमत नाही. पण हा निर्णय सत्र संपेर्यंत आहे. यानंतर या विद्यार्थ्यांना ज्या शाळेत पाठविण्यात येईल त्या शाळेत त्यांना कसे पाठवावे असा प्रश्न त्यांच्या पालकांसमोर निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.सत्र समाप्तीनंतर कायसुरू सत्रात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची दक्षता घेत जिल्हा परिषदेने या शाळा कागदावर बंद केल्या आहेत. पण नवे सत्र सुरू झाल्यानंतर या विद्यार्थ्यांचे काय, याचा विचार आताच होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांचे समायोजन झाल्यानंतर त्यांच्यावर प्रवासाचा भुर्दंड बसणार नाही याची दक्षात जि.प प्रशासनाने घ्याची अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आता मध्येच शाळा बंद केल्यास त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर होण्याची शक्यता आहे. यामुळे शाळा कागदावर बंद करून विद्यार्थ्यांना त्याच शाळेत शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. नव्या सत्रात विद्यार्थ्यांचे समायोजन करताना त्यांना कुठलाही त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल. शिवाय बंद होणार असलेल्या शाळा तशाच सुरू राहील या संदर्भात शासनाला मागणी करण्यात येणार आहे.- नितीन मडावी, अध्यक्ष, जिल्हा परिषद वर्धा.

टॅग्स :Schoolशाळा