शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
4
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
5
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
6
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
7
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
8
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
9
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
10
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
11
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
12
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
13
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
14
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
15
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
16
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
17
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
18
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
19
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
20
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या शोधात शिक्षक खेडोपाडी; संस्थांची स्पर्धाही सुरू

By admin | Updated: May 27, 2014 01:05 IST

शिक्षणसंस्था म्हणजे विद्येचे मंदिर व त्यात विद्यादान करणारे गुरुजन म्हणजे देव, अशी प्राचीन विचारधारा होती़ गुरूकूल म्हणजे विद्यालय व दूरदूर विद्यार्थी गुरूकुलात शिक्षणासाठी यायचे,

पुलगाव : शिक्षणसंस्था म्हणजे विद्येचे मंदिर व त्यात विद्यादान करणारे गुरुजन म्हणजे देव, अशी प्राचीन विचारधारा होती़ गुरूकूल म्हणजे विद्यालय व दूरदूर विद्यार्थी गुरूकुलात शिक्षणासाठी यायचे, आजही जातात; पण आजच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात शैक्षणिक संस्थांचा वाढता व्याप पाहता विद्यार्थी संख्या कमी पडू लागली आहे़ यामुळे तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था प्रकाशझोतात राहून विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसते़ आई-वडील वा आदरनीय व्यक्तींनी केलेल्या सामाजिक कार्याचा उमटलेला ठसा कायम राहावा, त्यांच्या स्मृती व त्यांचे कार्य सामान्य माणसाला सतत प्रेरणादायी ठरावे या भावनेतून शैक्षणिक संस्था उभारण्यात आल्या़ यातून समाजप्रेम असणार्‍यांनी सामाजिक बांधिलकी कायम ठेवली होती़ यामुळे कर्तबगार, कुशल कार्यक्षम शिक्षक, कर्मचारीदेखील आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहत होते़ त्यांना प्रसिद्धीझोतात राहण्याची गरज भासत नव्हती; पण बदलत्या परिस्थितीत हळूहळू विद्यामंदिरात ज्ञानदीप चेतविणार्‍यांचे हात दीप प्रज्वलीत करताना थरथरू लागले़ परिणामी, शिक्षण संस्थांतील वातावरण दूषित होऊन विद्यामंदिराचे रुपांतर संस्थांमध्ये झाले व संस्थांचे पेव फुटले़ प्राथमिक शाळेपासून अभियांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालयापर्यंत सर्वच संस्था आपल्या मूळ उद्देशापासून दूर गेल्या असून बाजारीकरण होत आहे़ शैक्षणिक संस्थेत पोषक वातावरण, क्रीडांगण, इमारत वा आवश्यक सोयी असो वा नसो, संस्था सुरू करायची, असा प्रकार सुरू आहे़ सद्यस्थितीत विद्यार्थ्यांच्या तुलनेत शिक्षण संस्था अधिक झाल्यात़ यामुळे जवळपास सर्वच शाळांना विद्यार्थी संख्या पूरेशी मिळत नसल्याने विद्यार्थी मिळविण्यासाठी या संस्थांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे़ या स्पर्धेच्या युगात प्रसिद्धी माध्यमांचा वापर केला जात आहे़ चित्रवाहिन्यांसह केबल, आॅटारिक्षावर प्रवेशाचे बॅनर्स, पत्रके आदींच्या माध्यमातून संस्था प्रकाशझोतात येऊ लागल्यात़ इतकेच नव्हे तर संस्थेची इमारत, अद्यावत व्यवस्था विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा, क्रीडांगण, प्रयोगशाळा, परिसर, शाळेत चालणारे विविध उपक्रम आदींचे चित्रीकरण करून आपली संस्था कशी दर्जेदार आहे, हे विद्यार्थी व पालकांना दाखविले जात आहे़ याच शाळेत विद्यार्थ्याना प्रवेश देण्याच्या सूचनाही दिल्या जात असल्याचे दिसते़ शिक्षकांना खेडोपाडी पाठवून विद्यार्थी शोधमोहिमही राबविली जात आहे़ या प्रकारामुळे शैक्षणिक संस्थांवर अशी वेळ का यावी, याचा विचार शिक्षण संस्था व शिक्षण विभागाने करणे गरजेचे झाले आहे़(तालुका प्रतिनिधी)