शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

शिक्षक शिकविण्यासाठी की ‘बाबुगिरी’साठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 00:52 IST

सर्व शिक्षा अभियान, एसडीएमआयएस प्रणालीवर विद्यार्थ्यांची ४४ मुद्द्यांची माहीती गटसाधन केंद्रातील संगणक परिचालकानेच भरावी, असे आदेशीत असतानाही शिक्षकांवरच दबाव तंत्राची कार्यपद्धती अवलंबली जात आहे.

ठळक मुद्देगुरूजींचा सवाल : मोर्चा काढून पं.स. प्रशासनाला निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : सर्व शिक्षा अभियान, एसडीएमआयएस प्रणालीवर विद्यार्थ्यांची ४४ मुद्द्यांची माहीती गटसाधन केंद्रातील संगणक परिचालकानेच भरावी, असे आदेशीत असतानाही शिक्षकांवरच दबाव तंत्राची कार्यपद्धती अवलंबली जात आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शिक्षक हा कारकून, लेखापाल, शालेय पोषण आहाराचा दिवाणजीपणासाठी की केवळ विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी आहे. याबाबत शासनाने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघाच्या नेतृत्वात तालुक्यातील शिक्षकांनी केली असून याबाबतचे पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी व गट शिक्षणाधिकारी यांना मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.समग्र शिक्षा अभियानअंतर्गत एसडीएमआयएस प्रणालीवर विद्यार्थ्यांची जन्मनोंदीपासून ते विद्यार्थ्यांच्या आजोबाच्या वंशावळीपर्यंत जात, धर्म, प्रवर्ग यासर्व प्रकारातील ४४ मुद्द्यांची माहिती पंचायत समिती गटसाधन केंद्रातील संगणक परिचालकाने भरावी, असे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, पुणे यांचे १२ एप्रील २०१८, २५ एप्रील २०१८ आणि ११ जुलै २०१८ चे पत्रान्वये राज्यातील सर्व शिक्षण विभागाला आदेश आहेत. मात्र, समुद्रपूरच्या पंचायत समितीतील गटसाधन कार्यालयाने हा आदेश धुडकावत शिक्षण विभागाच्या यंत्रणेद्वारे एसडीएमआयएस प्रणालीवर माहीती भरण्यास मुख्याध्यापकाच्या मागे ससेमिरा लावत आहे. बहुतांश शाळा ग्रामीण व दुर्गम भागात असल्याने इंटरनेटची सुविधा नाही. माहीती भरण्यास लागणारा कमालीचा विलंब या सर्व अशैक्षणिक कामात एकीकडे शिक्षकांना गुंतवून ठेवत आहे. तर दुसरीकडे शासन राज्यस्तरावर शिक्षकांची अशैक्षणिक कामे कमी करण्यासाठी टाळ कुटत असल्याचा आरोपही शिक्षकांनी केला आहे. शिक्षकांचा हा जाच थांबवावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. शनिवारी प्राथमिक शिक्षक संघाच्या नेतृत्वात पंचायत समितीवर मोर्चा काढून धडक देण्यात आली. यावेळी गट विकास अधिकाऱ्यांच्यावतीने प्रशासन अधिकारी मोहन कुंभारे यांनी निवेदन स्विकारले. यावेळी शिक्षक संघाचे विभाग प्रमुख अजय गावंडे, वामन शेळके, गोविंद अवगान, हेमंत पारधी, राहुल पाटील, कमलाकर ठाकरे, विशाल केदार, अनंत वांदीले, शंकर कोल्हे, शरद वाघमारे, अशोक खडसे, कपील खेकारे, आनंद मंगरुळकर, अरविंद महाकाळकर, सुनील मांडवकर, किशोर डेकाटे, विलास मेश्राम, पद्माकर भुरे, खिरदास चिकराम, दिनेश काटेखाये, गणेश शंडे याच्यासह शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या.विद्यार्थ्यांची माहीती भरणे हे सर्वस्वी पंं.स.गटसाधन केंद्राचे काम आहे, असे शासनाचे आदेश असतांना शाळा मुख्याध्याकावर लादने अयोग्य आहे.मुख्याध्यापक आधीच विविध अशैक्षणिक कामाच्या चक्रव्यूहात भरडल्या जात आहे. त्यात प्रशासन अतिरीक्त काम लादत असेल तर मुख्याध्यापक व शिक्षकांच्या अडचणी विनाकारण वाढविण्याचा प्रयत्न समजण्यापलीकडे आहे.- अजय गावंडे, विभागीय अध्यक्ष, प्रा.शिक्षक संघ,वर्धा जिल्हा.

टॅग्स :Teacherशिक्षकMorchaमोर्चा