शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
2
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
3
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
4
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
5
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
6
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
7
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
8
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
9
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
10
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
11
गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म
12
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
13
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
14
पेट्रोलची चिंता मिटली! 2026 मध्ये येणार मारुतीची पहिली फ्लेक्स-फ्युएल कार, जाणून घ्या डिटेल्स...
15
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
16
Viral Video: दोघे भिडले, लाथा-बुक्क्या मारत एकमेकांवर तुटून पडले; मेट्रोतील राडा व्हायरल
17
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
18
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
19
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
20
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."

कराच्या माध्यमातून पालिका करतेय २४ टक्के दराने वसुली

By admin | Updated: November 27, 2015 02:24 IST

व्यावसायिक तसेच घरगुती मालमत्ता कराची स्थानिक स्वराज्य संस्थातर्फे आकारणी केली जाते.

बँक, सावकारांपेक्षाही दंडाची टक्केवारी अधिकवर्धा : व्यावसायिक तसेच घरगुती मालमत्ता कराची स्थानिक स्वराज्य संस्थातर्फे आकारणी केली जाते. वर्धा नगर परिषदेच्यावतीने सध्या मालमत्ता कर भरण्याबाबत नागरिकांना पत्र दिले जात आहे. यात बँक, सावकारांपेक्षाही अधिक टक्केवारी लावत दंड आकारण्यात आला आहे. हा दंड तब्बल २४ टक्क्यांच्या घरात असल्याने सामान्यांचे कंबरडेच मोडत आहे. या दंडाच्या रकमांबाबत पुनर्विचार करावा, अशी मागणी होत आहे.पालिकेद्वारे शहरातील निवासी, व्यावसायिकांना करारासंदर्भातील पत्रे पाठविण्यात आली आहेत. यात कर भरण्याबाबत मुदतही देण्यात आली आहे; पण त्यात आलेले आकडे डोळे विस्फारणारे ठरत आहेत. पालिकेने एका व्यक्तीस दिलेल्या पत्रामध्ये दंडाचे आकडे पाहून संबंधिताला धक्काच बसला. पालिकेने कोणत्या निकषावर दंडाची अव्वाच्या सव्वा रक्कम आकारली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्या ग्राहकास गतवर्षी १९५५ रुपये दंड आकारण्यात आला होता. यावर्षीच्या पत्रात तब्बल ८ हजार ९५० रुपये दंड आकारण्यात आले आहे. अन्य कराच्या रकमेतही मोठी वाढ करण्यात आली आहे. ही बाब सामान्यांसाठी तापदायक ठरत आहे. हे वाढलेले आकडे पाहून अनेकांच्या पायाखाली वाळूच सरकली आहे. कराची एवढी मोठी रक्कम सामान्यांचे कंबरडे मोडणारी ठरण्याची शक्यता आहे. करावर आकारलेल्या दंडाबाबत अनेक नागरिकांनी नगरसेवकांची भेट घेतली. त्यांना याबाबत माहिती देण्यात आली; पण नगरसेवक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष देत तोडगा काढावा, अशी मागणीही नागरिकांतून होत आहे.(कार्यालय प्रतिनिधी)दंडाच्या टक्केवारीने सामान्य अवाक्बँकांकडून वार्षिक दहा ते बारा टक्के, सावकारांकडून १८ टक्के व्याजाची आकारणी केली जाते. नगर पालिकेने कर भरण्याच्या पत्रामध्ये समावेशित केलेली दंडाची रक्कम तब्बल २४ टक्के असल्याचे निदर्शनास येते. यामुळे हा कुठला निकष आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पालिकेकडून सुरू असलेल्या या प्रकाराने नागरिकांत असंतोष पसरला आहे.लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचेनागरिकांनी याबाबत नगरसेवकांकडे तक्रार केल्यास ते दुर्लक्ष करीत आहेत. सामान्यांकडे पैसे असते तर वेळेवर कर भरला असता. अडचणीच्या काळात कराचा भरणा न केल्याने त्यांच्यावर २४ टक्के दंड आकारला जात आहे. हा कुठला नियम आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे तसेच सभागृहांमध्ये प्रश्न उपस्थित करून दंड कमी करावा, अशी मागणीही करण्यात येत आहे.