शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

थोडं बोला; पण नेहमी गोड बोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 21:55 IST

जीभेला जीभेला झालेली जखम लवकर बरी होते; पण जीभेमुळे झालेली जखम कधीच बरी होत नाही. म्हणून तिळ गुळ घ्या अन् गोड-गोड बोला असे म्हटल्या जाते. मधूर वाणी जीवनामध्ये आनंद, शांती, प्रेम व प्रसन्नता निर्माण करते. त्यामुळे प्रत्येकाने नेहमीच थोड बोलावे; पण गोड बोलले पाहिजे, असा सल्ला लोकमतशी बोलताना प्रा. राजश्री अजय देशमुख यांनी दिला.

ठळक मुद्देराजश्री देशमुख यांचा सल्ला...

जीभेला जीभेला झालेली जखम लवकर बरी होते; पण जीभेमुळे झालेली जखम कधीच बरी होत नाही. म्हणून तिळ गुळ घ्या अन् गोड-गोड बोला असे म्हटल्या जाते. मधूर वाणी जीवनामध्ये आनंद, शांती, प्रेम व प्रसन्नता निर्माण करते. त्यामुळे प्रत्येकाने नेहमीच थोड बोलावे; पण गोड बोलले पाहिजे, असा सल्ला लोकमतशी बोलताना प्रा. राजश्री अजय देशमुख यांनी दिला.मन प्रसन्न राहिल्यास अशक्य कामही शक्य होते. जर ओठावर गुळाचा गोडवा आणि हृदयात तिहाची स्रिग्धता असेल तर जग जिंकता येते. धनुष्यातून निघालेला बाण आणि मुखातून निघालेल्या शब्द कधीच परत येत नसतो. त्यामुळे शब्दाने कुणाला घायाळ करण्यापेक्षा शब्दाने कुणाचे सांत्वन करणे केव्हाही चांगलेच आहे. परिणामी, बोलताना शब्दांना धार नसावी तर आधार असला पाहिजे. आज मनुष्यात अहंम खुप वाढला आहे. बोलताना स्वत:ऐवजी समोरच्या व्यक्तीला प्राधान्य दिले तर स्वत:चा अहंकार दुसऱ्यावर लादल्या जात नाही. म्हणून थोडं बोला; पण गोड बोला, असे यानिमित्ताने आपण सांगू इच्छित असल्याचे प्रा. देशमुख म्हणाल्या.जीवन क्षणभंगूर आहे. शेवटच्या क्षणी सोबत काहीच येत नसते. जर चिंरतन काही असेल तर ते म्हणजे दुसºयांच्या आयुष्यात निर्माण केलेला गोडवा. त्यामुळेच वेणूचा मधूर स्वर वाणीतून ओघळू द्या आणि जीवनाला दिव्य सुगंधाने सुमधूर बनवून पूर्णतेच्या मार्गावर अग्रेसर व्हा, असेही प्रा. राजश्री अजय देखमुख यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.