शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

अंगावर रॉकेल घेत वेधले शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 23:48 IST

शेतकऱ्यांचे कर्ज प्रकरणे त्वरित मंजुर करून कर्ज वाटप करण्यात यावे, बोंडअळीच्या नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, नाफेडने खरेदी केलेल्या तूर व चण्याचे चुकारे एका आठवठ्यात देण्यात यावे या मागण्यासाठी गुरूवारी दुपारी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात किसान अधिकार अभियानचे प्रमुख प्रविण उपासे यांनी केरोसीन अंगावर घेत ....

ठळक मुद्देहिंगणघाट येथील प्रकार : एसडीओंनी केली आंदोलकांशी चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : शेतकऱ्यांचे कर्ज प्रकरणे त्वरित मंजुर करून कर्ज वाटप करण्यात यावे, बोंडअळीच्या नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, नाफेडने खरेदी केलेल्या तूर व चण्याचे चुकारे एका आठवठ्यात देण्यात यावे या मागण्यासाठी गुरूवारी दुपारी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात किसान अधिकार अभियानचे प्रमुख प्रविण उपासे यांनी केरोसीन अंगावर घेत अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधले.यावेळी उपस्थित अधिकारी व अन्य कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.यासंदर्भात प्रवीण उपासे यानी दिलेल्या माहितीनुसार, शेतकºयांच्या विविध समस्येबाबत यापूर्वी १५ जून ला एक निवेदन येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेले होते. त्या निवेदनावर प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्याने गुरूवारी किसान अधिकार अभियानचे २०० वर कार्यकर्ते प्रवीण उपासे यांच्या नेतृत्वात उप विभागीय कार्यालयात गेले. या ठिकाणी त्यांनी अधिकाऱ्यांना शेतकºयाच्या मागण्यांचे निवेदन दिले.व या मागण्यांकडे शासन लक्ष देत नाही असे म्हणत सोबत आणलेल्या बॉटल मधील केरोसीन प्रवीण उपासे यांच्यासह शेगाव (गोटाड्या) येथील तांनबाजी वैद्य , वाघोली येथील राजू गौळकार या दोन शेतककऱ्यांनी स्वत:च्या अंगावर केरोसीन ओतून घेतले. यावेळी उपस्थित असलेल्या अन्य कर्मचाऱ्यांनी तातडीने हालचाल करीत या तिघांनाही ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. यानंतर उपविभागीय अधिकारी समाधान शेंडगे यांनी सर्व आंदोलकाना चर्चेसाठी आपल्या कार्यालयात बोलावून त्याच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शासनाने मंडळ निहाय पीक कर्ज वाटप मेळावा आयोजित केलेला होता. या मेळाव्यात पोलीस पाटील, तलाठी,मंडळ अधिकारी ग्रा.पं.,सचिव तसेच राष्ट्रीयकृत बँकेच्या अधिकाऱ्यांना या आमंत्रित करण्यात आले होते. अर्ज द्या व कर्ज घ्या या मोहिमेनुसार अनेक शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात आले, परंतु ज्या शेतकऱ्यांचे जुने कर्ज तांत्रिक अडचणीमुळे कायम राहिले अशा शेतकऱ्यांची यादी संबंधित बँकेकडून मागितलेली आहे, व तसेच आदोलक शेतकरी नेत्यांना पण अशा शेतकऱ्यांची यादी मागितली आहे. त्यातील त्रुटी तपासून पुढील निर्णय घेण्यात येईल, बोंडअळीच्या नुकसान भरपाईची एक किस्त जमा झालेली असून येत्या एप्रिलपर्र्यत अन्य रक्कम दोन टप्प्यात जमा करण्यात येईल, अशी माहिती उपविभागीय अधिकारी समाधान शेंडगे यांनी आंदोलकांना दिली. नाफेड अंतर्गत खरेदी केलेल्या तूर व चण्याचे चुकाºयांची ७५ % रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली असून उर्वरित रक्कमही लवकरच जमा होईल अशी माहिती सहाय्यक निबंधक मून यांनी दिली. घटनास्थळी पोलीस आलेया आंदोलनात सुरेश पेंदारे, अनिल पुसदेकर,आत्माराम उचले, हेमंत पोटदुखे,मोहन बोसुर,विनोद मोहदरे,श्याम उईके,आशिष डंभारे, वासुदेव पुरके ,नागो गेडाम,नत्थु आत्राम, किशोर झळके, रामचंद्र वैद्य, उमेश डुकरे, बाबूलाल येरेकर नाना वानखेडे, गणेश कोहळे, शुभास विरुटकर आशिष पोटरकर, श्रवण क्षीरसागर, दिलीप पंडित,भास्कर मडावी,गणेश टेकाम, दीपक येते,भूषण देहादराय,आशिष खिलेकर, ललित ठवरी,आदींसह शिक्षकावर निलंबणाची कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी