शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पाणीप्रश्न सोडविण्यासाठी नऊ विहिरी अधिग्रहित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 22:01 IST

स्थानिक न.प. प्रशासन वर्धा शहरातील नागरिकांना सध्या सहा दिवसाआड पाणी पुरवठा करीत आहे. इतकेच नव्हे तर धाम प्रकल्पातील उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यात आल्याने शहरात पाणी समस्या आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देएक टँकरची खरेदी : दहा टँकरने पाणी पुरवठा करण्याचा मानस

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्थानिक न.प. प्रशासन वर्धा शहरातील नागरिकांना सध्या सहा दिवसाआड पाणी पुरवठा करीत आहे. इतकेच नव्हे तर धाम प्रकल्पातील उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यात आल्याने शहरात पाणी समस्या आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. हिच पाणी समस्या निकाली काढण्यासाठी वर्धा न.प. प्रशासनाने पालिकेच्या मालकीच्याच एकूण नऊ विहिरी अधिग्रहित केल्या आहे. शिवाय एक नवीन टँकरचीही खरेदी केली आहे. सुमारे दहा टँकरद्वारे नागरिकांना पुरक पाणी पुरवठा करण्याचा मानस वर्धा न.प.चा असल्याचे सांगण्यात आले.वर्धा शहरातील रामनगर, तुकाराम वॉर्ड, जुनी म्हाडा कॉलनी, गांधीनगर, लक्ष्मीनगर, तारफैल, पुलफैल, स्टेशन फैल, दयालनगर, हिंदनगर, कृष्णनगर, जुना आरटीओ चौक परिसर आदी भागातील नागरिकांना वर्धा न.प. प्रशासन नळ योजनेद्वारे पाणी पुरवठा करते. परंतु, महाकाळी येथील ज्या धाम जलाशयातून सोडलेल्या पाण्याची येळाकेळी व पवनार येथून उचल करून नागरिकांना पाणी पुरवठा केल्या जातो, तोच जलाशय यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने पाहिजे तसा भरला नाही. शिवाय हिवाळ्याच्या दिवसातच भविष्यातील पाणी समस्या लक्षात घेता धाममधील उपलब्ध पाण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे. परिणामी, सध्या वर्धेकरांना न.प. प्रशासन नागरिकांना सहा दिवसाआड पाणी पुरवठा करीत आहेत. भविष्यात ही पाणी समस्या आणखी तीव्र होण्याची शक्यता असल्याने त्यावर मात करण्यासाठी वर्धा न.प. प्रशासनाने नागरिकांना टँकरनेही पाणी पुरवठा करण्याचे निश्चित केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून नऊ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. याच विहिरींमधील पाण्याची उचल करून त्या पाण्याचा पुरवठा दहा टँकरच्या सहाय्याने नागरिकांना करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी सांगितले. वर्धा शहरातील रामनगर जैन मंदिर परिसरातील विहिरींनी आतापर्यंतच्या दुष्काळी परिस्थितीत तळ गाठला नव्हता. मात्र, यंदाच्या वर्षी याच भागातील विहिरींनी तळ गाठल्याने वर्धा शहराला टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी नऊ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत; पण त्यापैकी केवळ चार उपयोगी पडणार आहेत.पालिकेकडे तीन टँकरवर्धा नगरपरिषद प्रशासनाकडे पूर्वी दोन टँकर होते; पण नवीन एक टँकरची खरेदी करण्यात आल्याने ही सध्या आता तीन इतकी झाली आहे. असे असलेले तरी जलसंकटावर मात करण्यासाठी दहा टँकरने वर्धेकरांना पाणी पुरवठा करण्याचा मानस उराशी बाळगणारा न.प. प्रशासन आणखी सात टँकर भाडेतत्त्वावर घेणार आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई