शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
3
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
4
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
5
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
6
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
7
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
8
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
9
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
10
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
11
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
12
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
13
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
14
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
15
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
16
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
17
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
18
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
19
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
20
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?

पाणीप्रश्न सोडविण्यासाठी नऊ विहिरी अधिग्रहित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 22:01 IST

स्थानिक न.प. प्रशासन वर्धा शहरातील नागरिकांना सध्या सहा दिवसाआड पाणी पुरवठा करीत आहे. इतकेच नव्हे तर धाम प्रकल्पातील उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यात आल्याने शहरात पाणी समस्या आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देएक टँकरची खरेदी : दहा टँकरने पाणी पुरवठा करण्याचा मानस

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्थानिक न.प. प्रशासन वर्धा शहरातील नागरिकांना सध्या सहा दिवसाआड पाणी पुरवठा करीत आहे. इतकेच नव्हे तर धाम प्रकल्पातील उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यात आल्याने शहरात पाणी समस्या आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. हिच पाणी समस्या निकाली काढण्यासाठी वर्धा न.प. प्रशासनाने पालिकेच्या मालकीच्याच एकूण नऊ विहिरी अधिग्रहित केल्या आहे. शिवाय एक नवीन टँकरचीही खरेदी केली आहे. सुमारे दहा टँकरद्वारे नागरिकांना पुरक पाणी पुरवठा करण्याचा मानस वर्धा न.प.चा असल्याचे सांगण्यात आले.वर्धा शहरातील रामनगर, तुकाराम वॉर्ड, जुनी म्हाडा कॉलनी, गांधीनगर, लक्ष्मीनगर, तारफैल, पुलफैल, स्टेशन फैल, दयालनगर, हिंदनगर, कृष्णनगर, जुना आरटीओ चौक परिसर आदी भागातील नागरिकांना वर्धा न.प. प्रशासन नळ योजनेद्वारे पाणी पुरवठा करते. परंतु, महाकाळी येथील ज्या धाम जलाशयातून सोडलेल्या पाण्याची येळाकेळी व पवनार येथून उचल करून नागरिकांना पाणी पुरवठा केल्या जातो, तोच जलाशय यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने पाहिजे तसा भरला नाही. शिवाय हिवाळ्याच्या दिवसातच भविष्यातील पाणी समस्या लक्षात घेता धाममधील उपलब्ध पाण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे. परिणामी, सध्या वर्धेकरांना न.प. प्रशासन नागरिकांना सहा दिवसाआड पाणी पुरवठा करीत आहेत. भविष्यात ही पाणी समस्या आणखी तीव्र होण्याची शक्यता असल्याने त्यावर मात करण्यासाठी वर्धा न.प. प्रशासनाने नागरिकांना टँकरनेही पाणी पुरवठा करण्याचे निश्चित केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून नऊ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. याच विहिरींमधील पाण्याची उचल करून त्या पाण्याचा पुरवठा दहा टँकरच्या सहाय्याने नागरिकांना करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी सांगितले. वर्धा शहरातील रामनगर जैन मंदिर परिसरातील विहिरींनी आतापर्यंतच्या दुष्काळी परिस्थितीत तळ गाठला नव्हता. मात्र, यंदाच्या वर्षी याच भागातील विहिरींनी तळ गाठल्याने वर्धा शहराला टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी नऊ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत; पण त्यापैकी केवळ चार उपयोगी पडणार आहेत.पालिकेकडे तीन टँकरवर्धा नगरपरिषद प्रशासनाकडे पूर्वी दोन टँकर होते; पण नवीन एक टँकरची खरेदी करण्यात आल्याने ही सध्या आता तीन इतकी झाली आहे. असे असलेले तरी जलसंकटावर मात करण्यासाठी दहा टँकरने वर्धेकरांना पाणी पुरवठा करण्याचा मानस उराशी बाळगणारा न.प. प्रशासन आणखी सात टँकर भाडेतत्त्वावर घेणार आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई