शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
4
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
5
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
6
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
7
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
8
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
9
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
10
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
11
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
12
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
13
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
14
श्वेता तिवारीला एक्स पतीने कारमध्ये एका व्यक्तीसोबत पकडलं होतं रंगेहाथ, राजा चौधरीचा खुलासा
15
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
16
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
17
शुबमन गिलचा एक मेसेज अन् तो सासरवाडीतून थेट टीम इंडियाच्या ताफ्यात (VIDEO)
18
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Wimbledon 2025 : नोव्हाक जोकोविच विक्रमी २५ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचा डाव साधणार का?
20
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर

एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, ही खबरदारी घ्या!

By admin | Updated: September 17, 2015 02:37 IST

शेतकऱ्यांमध्ये असलेले नैराश्य दूर करण्यासाठी ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा.

वर्धा : शेतकऱ्यांमध्ये असलेले नैराश्य दूर करण्यासाठी ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा. यासोबतच यापुढे आपल्या गावात एकही आत्महत्या होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी बुधवारी बैठकीत दिल्या. विकास भवन येथे जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी तसेच ग्रामस्तरावर कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येसंदर्भात आढावा घेताना किशोर तिवारी बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आशुतोष सलील, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मीना, अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती उपस्थित होते.जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यासंदर्भात आढावा घेताना तिवारी म्हणाले, शेतकरी आत्महत्यासंदर्भात सर्व अधिकाऱ्यांना संवेदनशीलपणे काम करण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी ग्रामस्तरावर कार्यरत असणाऱ्या ग्रामसेवक ते शिक्षकापर्यंत सर्वांनी गावातील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधणे आवश्यक आहे. ज्या भागात नैराश्यमधून अथवा विविध कारणाने आत्महत्या झाल्यास त्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, असेही ते म्हणाले. कृषी, आरोग्य, ग्रामविकास, महसूल, जलसंधारण आदी विभागांच्या अधिकऱ्यांनी आत्महत्या होत असलेल्या भागात भेट देऊन शेतकऱ्यांना प्रत्येक योजनेचा प्रत्यक्ष लाभ पोहचवतानाच त्यांच्या जीवनात काय परिवर्तन झाले या संदर्भातही माहिती घेण्याची आवश्यकता व्यक्त करीत कृषी विभागाने पारंपारिक पद्धतीने शेती न करता किफायतशीरपणे शेती करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. तेलबिया, भाजीपाला, फळे आदी बाजरपेठेच्या मागणीनुसार पीक परिस्थितीत बदल केल्यास शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल. पुढील तीन महिन्यात कृषी कारणाने एकही आत्महत्या होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.शेतकऱ्यांना सुलभपणे आरोग्य सुविधांचा लाभ न मिळाल्यामुळे विवंचनेतून नैराश्य येण्याच्या घटना घडणार नाही, यासाठी राजीव गांधी जीवनदायी योजनांसोबतच सर्वच योजनांचा लाभ सातबारा असणाऱ्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्या. शासनाने आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील तसेच टंचाईग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षणशुल्क माफ केले आहे. ज्या शैक्षणिक संस्था शिक्षण शुल्क घेतील, अशा संस्थाचालकांवर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी विविध योजनांचा एकत्रितपणे शेतकऱ्यांना लाभ पोहोचवितांनाच आर्थिक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्यात येत असल्याचे सांगितले. संचालन निवासी उपजिल्हाधिकारी नावडकर यांनी केले.(जिल्हा प्रतिनिधी)