शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, ही खबरदारी घ्या!

By admin | Updated: September 17, 2015 02:37 IST

शेतकऱ्यांमध्ये असलेले नैराश्य दूर करण्यासाठी ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा.

वर्धा : शेतकऱ्यांमध्ये असलेले नैराश्य दूर करण्यासाठी ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा. यासोबतच यापुढे आपल्या गावात एकही आत्महत्या होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी बुधवारी बैठकीत दिल्या. विकास भवन येथे जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी तसेच ग्रामस्तरावर कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येसंदर्भात आढावा घेताना किशोर तिवारी बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आशुतोष सलील, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मीना, अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती उपस्थित होते.जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यासंदर्भात आढावा घेताना तिवारी म्हणाले, शेतकरी आत्महत्यासंदर्भात सर्व अधिकाऱ्यांना संवेदनशीलपणे काम करण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी ग्रामस्तरावर कार्यरत असणाऱ्या ग्रामसेवक ते शिक्षकापर्यंत सर्वांनी गावातील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधणे आवश्यक आहे. ज्या भागात नैराश्यमधून अथवा विविध कारणाने आत्महत्या झाल्यास त्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, असेही ते म्हणाले. कृषी, आरोग्य, ग्रामविकास, महसूल, जलसंधारण आदी विभागांच्या अधिकऱ्यांनी आत्महत्या होत असलेल्या भागात भेट देऊन शेतकऱ्यांना प्रत्येक योजनेचा प्रत्यक्ष लाभ पोहचवतानाच त्यांच्या जीवनात काय परिवर्तन झाले या संदर्भातही माहिती घेण्याची आवश्यकता व्यक्त करीत कृषी विभागाने पारंपारिक पद्धतीने शेती न करता किफायतशीरपणे शेती करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. तेलबिया, भाजीपाला, फळे आदी बाजरपेठेच्या मागणीनुसार पीक परिस्थितीत बदल केल्यास शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल. पुढील तीन महिन्यात कृषी कारणाने एकही आत्महत्या होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.शेतकऱ्यांना सुलभपणे आरोग्य सुविधांचा लाभ न मिळाल्यामुळे विवंचनेतून नैराश्य येण्याच्या घटना घडणार नाही, यासाठी राजीव गांधी जीवनदायी योजनांसोबतच सर्वच योजनांचा लाभ सातबारा असणाऱ्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्या. शासनाने आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील तसेच टंचाईग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षणशुल्क माफ केले आहे. ज्या शैक्षणिक संस्था शिक्षण शुल्क घेतील, अशा संस्थाचालकांवर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी विविध योजनांचा एकत्रितपणे शेतकऱ्यांना लाभ पोहोचवितांनाच आर्थिक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्यात येत असल्याचे सांगितले. संचालन निवासी उपजिल्हाधिकारी नावडकर यांनी केले.(जिल्हा प्रतिनिधी)