शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

परजिल्ह्यातील मद्यविक्रेत्यांवर कारवाई करा

By admin | Updated: August 7, 2016 00:19 IST

जिल्ह्यात १९७५ पासून शासनाने दारूबंदी केल्याने दारूविक्री, प्राशन करण्यास व बाळगण्यास मनाई आहे.

वर्धा : जिल्ह्यात १९७५ पासून शासनाने दारूबंदी केल्याने दारूविक्री, प्राशन करण्यास व बाळगण्यास मनाई आहे. वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असली तरी जिल्ह्याच्या सिमेला लागून अर्धा किमीच्या आत नागपूर, अमरावती, यवतमाळ जिल्ह्याच्या सिमेवर अनेक देशी-विदेशी दारूविक्रीचे अधिकृत परवाने देण्यात आले आहेत. परजिल्ह्यातील ही दारूविक्री बंद करावी, अशी मागणी जनवादी महिला संघटनेने केली आहे. जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या दारू परवान्यांचा मुख्य उद्देश वर्धा जिल्ह्यात दारू अवैध विक्रीस पाठविणे हा आहे. जिल्ह्यातील अनेक नागरिक सिमा ओलांडून मद्यपान करून येतात. राज्य उत्पादन शुल्क विभागाद्वारे सिमेलगतचे हे दारूविक्री परवाने वर्धा जिल्ह्यात दारू पूरवनू दारूबंदी उधळून लावण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप संघटनेने केला. वर्धा पोलीस नेहमी दारू जप्त करतात, हा त्याचा पुरावाच म्हणावा लागेल. या दारू दुकानांचे परवानाधारक मालक मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात दारू पुरवू शकतात काय, त्यांचे स्टॉक बुक, बिल बुक आदी रेकॉर्डला ते कशी नोंद करतात, त्यांना आपले कार्यालय कसे प्रमाणित करते, हे गौडबंगालच आहे. वर्धा पोलीस मोठ्या प्रमाणात दारू पकडत असून गुन्हे नोंद करतात. मुळाशी जाऊन कार्यवाही होत नाही. अमरावती, नागपूर, यवतमाळ जिल्ह्यातील वर्धा जिल्ह्यात दारू पाठविणाऱ्या दारूविक्रेत्यांची नावे विक्रेता सांगू शकतो वा दारूच्या शिशीवरील बॅच नंबर आदीवरून मिळू शकते. यामुळे त्याच्यावर गुन्हा नोंद करून परवाना रद्द करण्याची शिफारस पोलीस अधीक्षक करू शकतात; पण ते होत नाही. वर्धा येथे राज्य उत्पादन शुल्क व दारूबंदी कार्यालय आहे; पण ते निष्क्रीय आहे. शिवाय अमरावती, नागपूर, यवतमाळ येथील कार्यालयेही निष्क्रीय असल्याने जिल्ह्यात देशी-विदेशी दारू मिळते. जिल्ह्याची सिमा, सिमेपासून दहा किमीपर्यंत दारूविक्रीचा परवाना मंजूर करू नये, कार्यान्वित परवाने १० किमी दूर न्यावे, अवैधपणे दारू पुरविणाऱ्या यवतमाळ, नागपूर, अमरावती येथील विक्रेत्यांवर कडक कार्यवाही करावी, स्टॉक बूक आदी रेकॉर्ड तपासावे अशी मागणी संघटनेने राज्य उत्पादन शुल्क आयुक्त व अधीक्षक यांना निवेदनातून केली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)