शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

३६ तासांच्या संचारबंदीसाठी यंत्रणा झाली सज्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:00 IST

संचारबंदी काळात नियमोल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे ३६ तासांच्या संचारबंदीसाठी पोलीस दलासह, आरोग्य विभाग, महसूल प्रशासनासह नगरपालिका सज्ज झाल्याचे दिसून येत आहे.गतवर्षी कोरोना विषाणू महामारीने संपूर्ण देशात कहर केला. अनेकांना या जीवघेण्या विषाणूने आपल्या कवेत घेतले होते. देशासह राज्यात आणि जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढत चालला असताना मागील वर्षीच्या मार्च महिन्यात लॉकडाऊन घोषित केले होते.

ठळक मुद्दे३५ अधिकाऱ्यांसह ५०० पोलीस उतरणार रस्त्यावर : उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यासह शहरात मागील आठवडा भरता कोरोना विषाणूचे रुग्ण झपाट्याने वाढत चालले असून जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. शनिवारी सायंकाळी ८ ते सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली असून पोलीस दलातील ३५ अधिकारी आणि ५०० कर्मचारी रस्त्यावर उतरून सेवा देणार आहे. संचारबंदी काळात नियमोल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे ३६ तासांच्या संचारबंदीसाठी पोलीस दलासह, आरोग्य विभाग, महसूल प्रशासनासह नगरपालिका सज्ज झाल्याचे दिसून येत आहे.गतवर्षी कोरोना विषाणू महामारीने संपूर्ण देशात कहर केला. अनेकांना या जीवघेण्या विषाणूने आपल्या कवेत घेतले होते. देशासह राज्यात आणि जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढत चालला असताना मागील वर्षीच्या मार्च महिन्यात लॉकडाऊन घोषित केले होते. तब्बल नऊ महिने नागरिक घरातच लॉक झाले होते. संपूर्ण व्यवहार, वाहतूक ठप्प झाली होती. इतकेच नव्हेतर जिल्ह्याच्या सीमादेखील सील करण्यात आल्या होत्या. सप्टेंबर महिन्यापासून कोरोनावर नियंत्रण मिळविण्यास यश आल्याने पुन्हा सर्व स्थिती पूर्वपदावर आली असताना २०२१ वर्षाच्या जानेवारी महिन्यापासून पुन्हा कोरोनाने एन्ट्री केली. जी रुग्णसंख्या १० ते १२ वर होती ती आता शंभरावर पोहचली. त्यामुळे पुन्हा एकदा प्रशासन अलर्ट मोडवर आली आहे. जिल्ह्यात दररोज वाढणारी रुग्णसंख्या लक्षात घेता ही साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा ३६ तासांची संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदी काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद राहणार असून विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग, महसूल विभाग, नगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी सज्ज झाले आहेत. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी तसेच शहरात प्रवेश करणाऱ्या मार्गांवर नाकाबंदी लावण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुलांना घराबाहेर निघण्यास मनाई करण्यात आली आहे. सायंकाळपासूनच पोलीस यंत्रणा नियमोल्लंघन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करत असल्याचे दिसून आले.  

सोमवारपर्यंत सेवाग्राम आश्रम राहणार बंद जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे संचारबंदी घोषित केली आहे. यात जागतिक प्रसिद्ध सेवाग्राम येथील महात्मा गांधी आश्रम संचारबंदीकाळात पर्यटकांसाठी बंद करण्यात येणार आहे. सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान अंतर्गत येणारी दुकाने, यात्री निवास, आहार केंद्रदेखील बंद ठेवण्यात येणार आहे. हा बंद सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत राहणार असल्याची माहिती अध्यक्ष टि.आर.एन.प्रभु यांनी दिली आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस