शहरं
Join us  
Trending Stories
1
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
2
"पुतिन आगीसोबत खेळत आहेत,जर मी तिथे नसतो तर..." , रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावर ट्रम्प संतापले
3
जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव
4
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
5
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
6
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
7
दिवसभर लोळावंसं वाटणं तुमच्यासाठी घातक, तो आहे एक आजार; काय आहेत लक्षणे?
8
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
9
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
10
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
11
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
12
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
13
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
14
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
15
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
16
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
17
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
18
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
19
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
20
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?

आरोग्य सेवेच्या व्रती सुशीला नायर

By admin | Updated: December 26, 2015 02:16 IST

महात्मा गांधींच्या तत्वज्ञानाची आणि आदर्शाची मशाल सतत तेवत ठेवण्याचे काम डॉ. सुशीला नायर यांनी केले.

१०१ वी जयंती : बहुआयामी व्यक्तिमत्वदिलीप चव्हाण सेवाग्राममहात्मा गांधींच्या तत्वज्ञानाची आणि आदर्शाची मशाल सतत तेवत ठेवण्याचे काम डॉ. सुशीला नायर यांनी केले. स्वातंत्र्यपूर्वीचे आरोग्य सेवेचे व्रत स्वातंत्र्यनंतर अधिक जोमाने करून बापूंनी सोपविलेली जबाबदारी त्यांनी कस्तुरबा दवाखाना व महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्या रूपाने पूर्ण केली. त्या उत्तम डॉक्टर तर होत्या, सोबतच स्वातंत्र्य सेनानी, समाजसेवी, सहित्यिक, वक्ता, चित्रकार असे बहुआयामी व्यक्तिमत्व होते. आरोग्य सेवेच्या व्रती म्हणूनच त्यांचे जीवन समर्पित राहिले. २६ डिसेंबरला त्यांची १०१ वी जयंती साजरी होत आहे.डॉ. सुशीला नायर यांचा जन्म २६ डिसेंबर १९१४ साली गुजरात (पंजाब) जिल्ह्यातील कंजा गावात झाला. हे गाव आता पाकिस्तानमध्ये आहे. शीख परिवारातील असल्या तरी म. गांधींच्या प्रेरणादायी सानिध्यात राहण्याचे भाग्य त्यांचे मोठे बंधु प्यारेलालजींमुळे लाभले. भावाप्रमाणे आपले जीवनही बापू समर्पित करण्याचा निर्धार करून सामाजिक बदल, रचनात्मक कार्यक्रम व आरोग्य सेवेसाठी स्वत:ला झोकून दिले.साबरमती आश्रम सोडल्यानंतर बापू सेवाग्रामला आले. आश्रम स्थापन झाल्यानंतर डॉ. सुशीला नायर आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून आश्रमात आल्या. ग्रामोन्नती व स्वातंत्र्य चळवळीचे कार्य जोमाने सुरू झाले. प्यारेलालजी कार्यालयाची जबाबदारी सांभाळत. बापूंनी आरोग्य सेवेचे काम डॉ. सुशीला (बहणजी) यांच्यावर सोपविले. यासाठी स्वतंत्र व्यवस्था म्हणून जमनालाल बजाज (आखरी निवास) यांचे निवास स्थान देण्यात आले. कार्यकर्ता तसेच ग्रामस्थांवर त्या उपचार करू लागल्या. चव्हाण परिवाराच्या वाड्यात प्रार्थना, कताई व आरोग्य सेवेचे काम केले. १९४२ ला भारत छोडो ठराव झाला. या आंदोलनात बापूंसोबत त्या मुंबईला गेल्या. सर्वांना अटक करून पुण्याच्या आगाखॉ पॅलेसमध्ये ठेवले. २१ महिने बापूंची आरोग्य सेवा व सचिवाचे काम सांभाळले. बहणजींनी वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग ग्रामीण लोकांसाठीच नव्हे तर देशाच्या सामाजिक आरोग्यासाठीही झाला.बहणजींनी संस्थेत खादी व प्रार्थना अनिवार्य केली. डॉक्टर झाल्यानंतर ग्रामस्थांना सेवा देण्यास कुणी तयार नव्हते. यासाठी त्यांनी स्रानोकोत्तर प्रवेशास ग्रामीण भागात दोन वर्षांची सेवा अनिवार्य केली. यातून ग्रामीण भागाशी वैद्यकांचा संपर्क वाढला. वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशपूर्व परीक्षेत गांधी व विचारांची परीक्षा आवश्यक केली.