शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस अन् मविआला नव्या भिडूची गरज नाही; मनसेला सोबत घेण्यास हर्षवर्धन सपकाळांचा नकार
2
‘लाडकी बहीण’चा फटका; ‘आनंदाचा शिधा’ विसरा
3
'घरी ये ना गं...', वारंवार बोलवूनही पत्नी परत येईना; विरहाने कंटाळलेल्या शेतकरी पतीने उचललं टोकाचं पाऊल!
4
PPF बनेल रिटर्न मशीन, १ रुपयाही खर्च केल्याशिवाय दरवर्षी कमवाल ₹२.८८ लाखांचं व्याज; पाहा कमाईचं सिक्रेट
5
कफ सिरप मृत्यू प्रकरणात मध्य प्रदेशात डॉक्टरला अटक; IMA आक्रमक, थेट सरकारलाच दिला इशारा!
6
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; PSU Stocks मध्ये आजही खरेदी
7
'७ विमाने पाडली होती', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा जुनाच सूर लावला; भारत आणि पाकिस्तानबद्दल काय म्हणाले?
8
९.१ कोटी नोकऱ्यांची मोठी संधी, तीन नोकऱ्यांपैकी एक नोकरी या क्षेत्रातून येणार...
9
गाढ झोपेतच काळाने घातला घाला! ४ वर्षीय चिमुकलीसह मावशीचा सर्पदंशाने मृत्यू; डॉक्टर निलंबित
10
वर्गात मित्राला कसे मारायचे? ChatGPT वर एक प्रश्न विचारला; विद्यार्थ्याला तुरुंगात जावे लागले
11
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
12
संपादकीय: ...आता थेट मुकाबला ! आनंदाचा शिधा देणार नसले, तरी... 
13
दिवाळीत मोठ्या खरेदीसाठीसाठी 'क्रेडिट कार्ड'नं पैसे देणं योग्य आहे का?; 'या' गोष्टी लक्षात ठेवा
14
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!
15
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
16
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
17
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
18
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
19
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
20
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 

आरोग्य सेवेच्या व्रती सुशीला नायर

By admin | Updated: December 26, 2015 02:16 IST

महात्मा गांधींच्या तत्वज्ञानाची आणि आदर्शाची मशाल सतत तेवत ठेवण्याचे काम डॉ. सुशीला नायर यांनी केले.

१०१ वी जयंती : बहुआयामी व्यक्तिमत्वदिलीप चव्हाण सेवाग्राममहात्मा गांधींच्या तत्वज्ञानाची आणि आदर्शाची मशाल सतत तेवत ठेवण्याचे काम डॉ. सुशीला नायर यांनी केले. स्वातंत्र्यपूर्वीचे आरोग्य सेवेचे व्रत स्वातंत्र्यनंतर अधिक जोमाने करून बापूंनी सोपविलेली जबाबदारी त्यांनी कस्तुरबा दवाखाना व महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्या रूपाने पूर्ण केली. त्या उत्तम डॉक्टर तर होत्या, सोबतच स्वातंत्र्य सेनानी, समाजसेवी, सहित्यिक, वक्ता, चित्रकार असे बहुआयामी व्यक्तिमत्व होते. आरोग्य सेवेच्या व्रती म्हणूनच त्यांचे जीवन समर्पित राहिले. २६ डिसेंबरला त्यांची १०१ वी जयंती साजरी होत आहे.डॉ. सुशीला नायर यांचा जन्म २६ डिसेंबर १९१४ साली गुजरात (पंजाब) जिल्ह्यातील कंजा गावात झाला. हे गाव आता पाकिस्तानमध्ये आहे. शीख परिवारातील असल्या तरी म. गांधींच्या प्रेरणादायी सानिध्यात राहण्याचे भाग्य त्यांचे मोठे बंधु प्यारेलालजींमुळे लाभले. भावाप्रमाणे आपले जीवनही बापू समर्पित करण्याचा निर्धार करून सामाजिक बदल, रचनात्मक कार्यक्रम व आरोग्य सेवेसाठी स्वत:ला झोकून दिले.साबरमती आश्रम सोडल्यानंतर बापू सेवाग्रामला आले. आश्रम स्थापन झाल्यानंतर डॉ. सुशीला नायर आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून आश्रमात आल्या. ग्रामोन्नती व स्वातंत्र्य चळवळीचे कार्य जोमाने सुरू झाले. प्यारेलालजी कार्यालयाची जबाबदारी सांभाळत. बापूंनी आरोग्य सेवेचे काम डॉ. सुशीला (बहणजी) यांच्यावर सोपविले. यासाठी स्वतंत्र व्यवस्था म्हणून जमनालाल बजाज (आखरी निवास) यांचे निवास स्थान देण्यात आले. कार्यकर्ता तसेच ग्रामस्थांवर त्या उपचार करू लागल्या. चव्हाण परिवाराच्या वाड्यात प्रार्थना, कताई व आरोग्य सेवेचे काम केले. १९४२ ला भारत छोडो ठराव झाला. या आंदोलनात बापूंसोबत त्या मुंबईला गेल्या. सर्वांना अटक करून पुण्याच्या आगाखॉ पॅलेसमध्ये ठेवले. २१ महिने बापूंची आरोग्य सेवा व सचिवाचे काम सांभाळले. बहणजींनी वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग ग्रामीण लोकांसाठीच नव्हे तर देशाच्या सामाजिक आरोग्यासाठीही झाला.बहणजींनी संस्थेत खादी व प्रार्थना अनिवार्य केली. डॉक्टर झाल्यानंतर ग्रामस्थांना सेवा देण्यास कुणी तयार नव्हते. यासाठी त्यांनी स्रानोकोत्तर प्रवेशास ग्रामीण भागात दोन वर्षांची सेवा अनिवार्य केली. यातून ग्रामीण भागाशी वैद्यकांचा संपर्क वाढला. वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशपूर्व परीक्षेत गांधी व विचारांची परीक्षा आवश्यक केली.