शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय पथकाने केली दुष्काळ भागाची पाहणी

By admin | Updated: June 4, 2016 01:54 IST

२०१५ मधील खरीप हंगामात पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

जाम गावातील शेतकऱ्यांनी मांडली आपली कैफियतवर्धा : २०१५ मधील खरीप हंगामात पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशा शेतकऱ्यांना केंद्रशासनामार्फत मदत मिळावी यासाठी वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी आलो असल्याचे केंद्रशासनाच्या निती आयोगाचे अधिकारी डॉ. रामानंद यांनी समुद्रपूर तालुक्यातील जाम येथे शेतकऱ्यांशी चर्चा करताना सांगितले. समुद्रपूर तालुक्यातील जाम येथील ग्रामपंचायत सभागृहात केंद्र शासनाच्या दुष्काळ पाहणी पथकातील सदस्य असलेले निती आयोगाचे अधिकारी डॉ. रामानंद, केंद्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचे अवर सचिव रामा वर्मा, जलसंसाधन विभागाचे उपसंचालक मिलिंद पानपाटील, ए.जी. एम.एफ. सी.आय. मुंबईचे एम.एम. बोराडे, डायरेक्टर सेट्रल इलेक्ट्रीसिटीचे जे.के. राठोड यांनी जाम गावातील शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी शेतकऱ्यांना त्यांनी गावात पिण्याचे पाणी आहे का? मागच्या वर्षी किती टक्के उत्पादन झाले, पीक पेरणी व इतर खर्च आणि उत्पादन किती झाले, आणेवारी ५० टक्केच्या आत आहे का याबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी डॉ. रामानंद यांनी जाम येथील शेतकरी अमोल जांभळीकर यांच्याकडून मागच्या वर्षी झालेल्या उत्पादनाबाबतची माहिती जाणून घेतली. यावेळी जांभळीकर यांनी सांगितले की, माझ्याकडे दहा एकर शेती आहे. २०१५ मध्ये खरीप हंगामात मी कापूस, सोयाबीन व तुरीचा पेरा केला होता. त्यासाठी पाच लाख रूपये खर्च केले. पण उत्पन्न दोन लाखही आलेले नाही. त्यामुळे शेतकरी खुप अडचणीत आहे. अवधूत सोमल, अजय पिटे या शेतकऱ्यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी पथकातील पाचही सदस्यांनी जाम गावातील शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या. केंद्र शासनाच्या कृषी विभागांच्या योजनांचा आपल्याला लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. काही शेतकऱ्यांनी कैफियत मांडतांना सांगितले की, खरीप हंगाम गेल्यावर रब्बी हंगाम चांगला होईल या आशेवर शेतकऱ्यांनी रब्बीचा पेरा केला. पण हातातोंडाशी घास आला असताना अचानक गारपीट आल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यातील शेतकरी हवालदील झालेला असून त्याला शासकीय मदतीची मोठ्या प्रमाणात गरज असल्याचे शेतकऱ्यांनी पथकाला सांगितले. काही शेतकऱ्यांनी जलयुक्त शिवारांची कामे या परिसरात सुरू करण्याची मागणी केली. तसेच पिकांचे नीलगायीपासून नुकसान होत असल्याने त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणीही त्यांनी पथकाकडे केली. या पथकासोबत अप्पर जिल्हाधिकारी दीपक नलवडे, समुद्रपूरचे तहसीलदार सचिन यादव, हिंगणघाटचे तहसीलदार दीपक कारंडे, कृषी सहसंचालक विजय घावडे, जिल्हा कृषी अधिकारी डॉ. भारती आदी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)