शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

केंद्रीय पथकाने केली दुष्काळ भागाची पाहणी

By admin | Updated: June 4, 2016 01:54 IST

२०१५ मधील खरीप हंगामात पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

जाम गावातील शेतकऱ्यांनी मांडली आपली कैफियतवर्धा : २०१५ मधील खरीप हंगामात पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशा शेतकऱ्यांना केंद्रशासनामार्फत मदत मिळावी यासाठी वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी आलो असल्याचे केंद्रशासनाच्या निती आयोगाचे अधिकारी डॉ. रामानंद यांनी समुद्रपूर तालुक्यातील जाम येथे शेतकऱ्यांशी चर्चा करताना सांगितले. समुद्रपूर तालुक्यातील जाम येथील ग्रामपंचायत सभागृहात केंद्र शासनाच्या दुष्काळ पाहणी पथकातील सदस्य असलेले निती आयोगाचे अधिकारी डॉ. रामानंद, केंद्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचे अवर सचिव रामा वर्मा, जलसंसाधन विभागाचे उपसंचालक मिलिंद पानपाटील, ए.जी. एम.एफ. सी.आय. मुंबईचे एम.एम. बोराडे, डायरेक्टर सेट्रल इलेक्ट्रीसिटीचे जे.के. राठोड यांनी जाम गावातील शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी शेतकऱ्यांना त्यांनी गावात पिण्याचे पाणी आहे का? मागच्या वर्षी किती टक्के उत्पादन झाले, पीक पेरणी व इतर खर्च आणि उत्पादन किती झाले, आणेवारी ५० टक्केच्या आत आहे का याबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी डॉ. रामानंद यांनी जाम येथील शेतकरी अमोल जांभळीकर यांच्याकडून मागच्या वर्षी झालेल्या उत्पादनाबाबतची माहिती जाणून घेतली. यावेळी जांभळीकर यांनी सांगितले की, माझ्याकडे दहा एकर शेती आहे. २०१५ मध्ये खरीप हंगामात मी कापूस, सोयाबीन व तुरीचा पेरा केला होता. त्यासाठी पाच लाख रूपये खर्च केले. पण उत्पन्न दोन लाखही आलेले नाही. त्यामुळे शेतकरी खुप अडचणीत आहे. अवधूत सोमल, अजय पिटे या शेतकऱ्यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी पथकातील पाचही सदस्यांनी जाम गावातील शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या. केंद्र शासनाच्या कृषी विभागांच्या योजनांचा आपल्याला लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. काही शेतकऱ्यांनी कैफियत मांडतांना सांगितले की, खरीप हंगाम गेल्यावर रब्बी हंगाम चांगला होईल या आशेवर शेतकऱ्यांनी रब्बीचा पेरा केला. पण हातातोंडाशी घास आला असताना अचानक गारपीट आल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यातील शेतकरी हवालदील झालेला असून त्याला शासकीय मदतीची मोठ्या प्रमाणात गरज असल्याचे शेतकऱ्यांनी पथकाला सांगितले. काही शेतकऱ्यांनी जलयुक्त शिवारांची कामे या परिसरात सुरू करण्याची मागणी केली. तसेच पिकांचे नीलगायीपासून नुकसान होत असल्याने त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणीही त्यांनी पथकाकडे केली. या पथकासोबत अप्पर जिल्हाधिकारी दीपक नलवडे, समुद्रपूरचे तहसीलदार सचिन यादव, हिंगणघाटचे तहसीलदार दीपक कारंडे, कृषी सहसंचालक विजय घावडे, जिल्हा कृषी अधिकारी डॉ. भारती आदी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)