शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

केंद्रीय पथकाने केली दुष्काळ भागाची पाहणी

By admin | Updated: June 4, 2016 01:54 IST

२०१५ मधील खरीप हंगामात पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

जाम गावातील शेतकऱ्यांनी मांडली आपली कैफियतवर्धा : २०१५ मधील खरीप हंगामात पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशा शेतकऱ्यांना केंद्रशासनामार्फत मदत मिळावी यासाठी वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी आलो असल्याचे केंद्रशासनाच्या निती आयोगाचे अधिकारी डॉ. रामानंद यांनी समुद्रपूर तालुक्यातील जाम येथे शेतकऱ्यांशी चर्चा करताना सांगितले. समुद्रपूर तालुक्यातील जाम येथील ग्रामपंचायत सभागृहात केंद्र शासनाच्या दुष्काळ पाहणी पथकातील सदस्य असलेले निती आयोगाचे अधिकारी डॉ. रामानंद, केंद्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचे अवर सचिव रामा वर्मा, जलसंसाधन विभागाचे उपसंचालक मिलिंद पानपाटील, ए.जी. एम.एफ. सी.आय. मुंबईचे एम.एम. बोराडे, डायरेक्टर सेट्रल इलेक्ट्रीसिटीचे जे.के. राठोड यांनी जाम गावातील शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी शेतकऱ्यांना त्यांनी गावात पिण्याचे पाणी आहे का? मागच्या वर्षी किती टक्के उत्पादन झाले, पीक पेरणी व इतर खर्च आणि उत्पादन किती झाले, आणेवारी ५० टक्केच्या आत आहे का याबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी डॉ. रामानंद यांनी जाम येथील शेतकरी अमोल जांभळीकर यांच्याकडून मागच्या वर्षी झालेल्या उत्पादनाबाबतची माहिती जाणून घेतली. यावेळी जांभळीकर यांनी सांगितले की, माझ्याकडे दहा एकर शेती आहे. २०१५ मध्ये खरीप हंगामात मी कापूस, सोयाबीन व तुरीचा पेरा केला होता. त्यासाठी पाच लाख रूपये खर्च केले. पण उत्पन्न दोन लाखही आलेले नाही. त्यामुळे शेतकरी खुप अडचणीत आहे. अवधूत सोमल, अजय पिटे या शेतकऱ्यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी पथकातील पाचही सदस्यांनी जाम गावातील शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या. केंद्र शासनाच्या कृषी विभागांच्या योजनांचा आपल्याला लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. काही शेतकऱ्यांनी कैफियत मांडतांना सांगितले की, खरीप हंगाम गेल्यावर रब्बी हंगाम चांगला होईल या आशेवर शेतकऱ्यांनी रब्बीचा पेरा केला. पण हातातोंडाशी घास आला असताना अचानक गारपीट आल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यातील शेतकरी हवालदील झालेला असून त्याला शासकीय मदतीची मोठ्या प्रमाणात गरज असल्याचे शेतकऱ्यांनी पथकाला सांगितले. काही शेतकऱ्यांनी जलयुक्त शिवारांची कामे या परिसरात सुरू करण्याची मागणी केली. तसेच पिकांचे नीलगायीपासून नुकसान होत असल्याने त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणीही त्यांनी पथकाकडे केली. या पथकासोबत अप्पर जिल्हाधिकारी दीपक नलवडे, समुद्रपूरचे तहसीलदार सचिन यादव, हिंगणघाटचे तहसीलदार दीपक कारंडे, कृषी सहसंचालक विजय घावडे, जिल्हा कृषी अधिकारी डॉ. भारती आदी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)