शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
2
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
3
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
4
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
5
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
6
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
7
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
8
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
9
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
10
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
11
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
12
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
13
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
14
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
15
'हा' मराठमोळा स्टार टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांत महागडा! दिलीप जोशी, रुपाली गांगुलीही मागे पडले!
16
जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...
17
"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण
18
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
19
“ज्योतीला फसवले जातेय, सामान्य व्यक्तीप्रमाणे महिन्याला १५-२०-२५ हजार कमावते”; वडिलांचा दावा
20
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट

अहो आश्चर्यम, महिला मजुरांची चक्क चारचाकीतून शेतात ‘एन्ट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2021 05:00 IST

कापूस वेचायला मजूर मिळत नाही, मिळालेच तर त्यांच्या सर्व अटी व शर्ती शेतमालकाला कबूल कराव्या लागतात. शेतात दिवसभर वेचलेल्या कापसाचे गाठोडे पूर्वीप्रमाणे डोक्यावरून घरी आता महिला मजूर आणत नाही. शेतापर्यंत जाण्यायेण्यासाठी वाहनाची व्यवस्था शेत मालकालाच  करावी लागते. शेतात कापूस कमी आहे म्हणून वेचणीचा भावही जास्त द्यावा लागतो. अशी शेती व्यवसायात विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वच बाजूने मेटाकुटीस आलेला शेतकरी अशाही परिस्थितीत सर्वांच्याच मन मर्जीने वागतो आहे.

प्रफुल्ल लुंगेलोकमत न्यूज नेटवर्कसेलू : काळाचा महिमा काही औरच असतो. कोणाच्या नशिबी काय येईल हे सांगता येत नाही. कामावर जाणाऱ्या महिला मजुरांना रस्त्याने कार दिसली की, आपल्याला यामध्ये कधी बसायला मिळेल याचा हेवा वाटायचा, मात्र आता मारुती कारमधून शेतमालक कापूस वेचण्यासाठी मजूर शेतात नेतो व संध्याकाळी आणून देतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसभर शेतात राबराब राबणाऱ्या मजुरांच्या नशिबी ही आता कारचा प्रवास आला आहे.       कापूस वेचायला मजूर मिळत नाही, मिळालेच तर त्यांच्या सर्व अटी व शर्ती शेतमालकाला कबूल कराव्या लागतात. शेतात दिवसभर वेचलेल्या कापसाचे गाठोडे पूर्वीप्रमाणे डोक्यावरून घरी आता महिला मजूर आणत नाही. शेतापर्यंत जाण्यायेण्यासाठी वाहनाची व्यवस्था शेत मालकालाच  करावी लागते. शेतात कापूस कमी आहे म्हणून वेचणीचा भावही जास्त द्यावा लागतो. अशी शेती व्यवसायात विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वच बाजूने मेटाकुटीस आलेला शेतकरी अशाही परिस्थितीत सर्वांच्याच मन मर्जीने वागतो आहे. ही शेतकऱ्यांसाठी चिंतेची आणि चिंतनाची बाब आहे.कापसाचे भाव कमी झाले आता सरासरी आठ हजार रुपये क्विंटल विकला जात आहे. वेचणीचा दर आठ ते दहा रुपये किलो आहे. शेतकऱ्यांचा शेती व्यवसाय सातत्याने तोट्यात आहे. यंदा कपाशीची बऱ्याच शेतकऱ्यांची दुसऱ्याच वेचात उलांगवाडी  झाली. अनेकांनी कपाशीची उलंगवाडी करून चना, गहू पेरण्याची तजवीज केली. शेतीचा व्यवसाय मजुरांमुळे परावलंबी होत चालला आहे. मजूरही शेतमालकांच्या अडचणीचा फायदा घेऊन अटी व शर्ती घालून कामाला येत आहे. शेतमालकाला नाईलाजाने मजुरांच्या सर्व अटी मान्य कराव्या लागत आहे. शेतात जाण्या-येण्यासाठी वाहनाची व्यवस्था केली तरच मजूर कामाला येते. त्याचबरोबर सर्व शेतीचे वाही पेरणीचे सामान मालकाने शेतात न्यायचे, रोजंदारी मजूर किंवा  महिला मजूर फक्त वेळेवर कामाला लागणे व काम संपल्यावर घरी येणे एवढेच काम करते. राहिलेली सर्व कामे नंतर शेतमालकास  पूर्ण करावी लागतात. अशी विचित्र अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे त्याला शेतमालक म्हणून घेण्याची लाज वाटते. आता मजूरवर्गच मालक झाल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे.

कापूस वेचणीसह इतरही कामाला मजुरांना वाहनातून न्यावे लागते. मजूर पायदळ यायला तयार नाही. अनेक शेतकरी भाड्याच्या वाहनातून तर काही शेतकरी स्वतःच्या कारने मजुरांना शेतात ने आण करतात. कापसाचे गाठोडे ही वाहनातूनच घरपर्यंत आणावे लागते. निंदनी, खुरपण, खत देणे हे सर्व मजूर वाहनच लागते. सर्व खर्च काढला  तर शेतकऱ्याला काही वाचत नाही. शेतकऱ्यांपेक्षा मजूर खाऊन-पिऊन सुखी आहे. - विनोद तलवारे, शेतकरी झडशी टाकळी. 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती