शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

अहो आश्चर्यम, महिला मजुरांची चक्क चारचाकीतून शेतात ‘एन्ट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2021 05:00 IST

कापूस वेचायला मजूर मिळत नाही, मिळालेच तर त्यांच्या सर्व अटी व शर्ती शेतमालकाला कबूल कराव्या लागतात. शेतात दिवसभर वेचलेल्या कापसाचे गाठोडे पूर्वीप्रमाणे डोक्यावरून घरी आता महिला मजूर आणत नाही. शेतापर्यंत जाण्यायेण्यासाठी वाहनाची व्यवस्था शेत मालकालाच  करावी लागते. शेतात कापूस कमी आहे म्हणून वेचणीचा भावही जास्त द्यावा लागतो. अशी शेती व्यवसायात विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वच बाजूने मेटाकुटीस आलेला शेतकरी अशाही परिस्थितीत सर्वांच्याच मन मर्जीने वागतो आहे.

प्रफुल्ल लुंगेलोकमत न्यूज नेटवर्कसेलू : काळाचा महिमा काही औरच असतो. कोणाच्या नशिबी काय येईल हे सांगता येत नाही. कामावर जाणाऱ्या महिला मजुरांना रस्त्याने कार दिसली की, आपल्याला यामध्ये कधी बसायला मिळेल याचा हेवा वाटायचा, मात्र आता मारुती कारमधून शेतमालक कापूस वेचण्यासाठी मजूर शेतात नेतो व संध्याकाळी आणून देतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसभर शेतात राबराब राबणाऱ्या मजुरांच्या नशिबी ही आता कारचा प्रवास आला आहे.       कापूस वेचायला मजूर मिळत नाही, मिळालेच तर त्यांच्या सर्व अटी व शर्ती शेतमालकाला कबूल कराव्या लागतात. शेतात दिवसभर वेचलेल्या कापसाचे गाठोडे पूर्वीप्रमाणे डोक्यावरून घरी आता महिला मजूर आणत नाही. शेतापर्यंत जाण्यायेण्यासाठी वाहनाची व्यवस्था शेत मालकालाच  करावी लागते. शेतात कापूस कमी आहे म्हणून वेचणीचा भावही जास्त द्यावा लागतो. अशी शेती व्यवसायात विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वच बाजूने मेटाकुटीस आलेला शेतकरी अशाही परिस्थितीत सर्वांच्याच मन मर्जीने वागतो आहे. ही शेतकऱ्यांसाठी चिंतेची आणि चिंतनाची बाब आहे.कापसाचे भाव कमी झाले आता सरासरी आठ हजार रुपये क्विंटल विकला जात आहे. वेचणीचा दर आठ ते दहा रुपये किलो आहे. शेतकऱ्यांचा शेती व्यवसाय सातत्याने तोट्यात आहे. यंदा कपाशीची बऱ्याच शेतकऱ्यांची दुसऱ्याच वेचात उलांगवाडी  झाली. अनेकांनी कपाशीची उलंगवाडी करून चना, गहू पेरण्याची तजवीज केली. शेतीचा व्यवसाय मजुरांमुळे परावलंबी होत चालला आहे. मजूरही शेतमालकांच्या अडचणीचा फायदा घेऊन अटी व शर्ती घालून कामाला येत आहे. शेतमालकाला नाईलाजाने मजुरांच्या सर्व अटी मान्य कराव्या लागत आहे. शेतात जाण्या-येण्यासाठी वाहनाची व्यवस्था केली तरच मजूर कामाला येते. त्याचबरोबर सर्व शेतीचे वाही पेरणीचे सामान मालकाने शेतात न्यायचे, रोजंदारी मजूर किंवा  महिला मजूर फक्त वेळेवर कामाला लागणे व काम संपल्यावर घरी येणे एवढेच काम करते. राहिलेली सर्व कामे नंतर शेतमालकास  पूर्ण करावी लागतात. अशी विचित्र अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे त्याला शेतमालक म्हणून घेण्याची लाज वाटते. आता मजूरवर्गच मालक झाल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे.

कापूस वेचणीसह इतरही कामाला मजुरांना वाहनातून न्यावे लागते. मजूर पायदळ यायला तयार नाही. अनेक शेतकरी भाड्याच्या वाहनातून तर काही शेतकरी स्वतःच्या कारने मजुरांना शेतात ने आण करतात. कापसाचे गाठोडे ही वाहनातूनच घरपर्यंत आणावे लागते. निंदनी, खुरपण, खत देणे हे सर्व मजूर वाहनच लागते. सर्व खर्च काढला  तर शेतकऱ्याला काही वाचत नाही. शेतकऱ्यांपेक्षा मजूर खाऊन-पिऊन सुखी आहे. - विनोद तलवारे, शेतकरी झडशी टाकळी. 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती