शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

साडेसहा हजार मेट्रिक टन धान्याचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 05:00 IST

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता शासनाने मजूर, शेतमजूर, शेतकरी, अंत्योदय आणि प्राधान्य गटातील नागरिकांच्या अन्नधान्याची गरज लक्षात घेवून पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत तीन महिन्यांपर्यंत गरिबांना ५ किलो अतिरिक्त तांदूळ मोफत मिळणार आहे. यासह एप्रिल ते जून या तीन महिन्यांचे धान्य प्रत्येक महिन्याला शिधापत्रिकाधारकांना देण्यात येणार आहे.

ठळक मुद्देसोशल डिस्टन्सिंगने होतेय वाटप : शिधापत्रिकाधारकांना दरमहा मिळणार धान्य

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभार्थ्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत प्रतिव्यक्ती ५ किलो तांदूळ तीन महिने मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासोबतच शिधापत्रिकाधारकांनाही वेळेत धान्य उपलब्ध करुन देण्यासाठी वर्ध्यातील भारतीय खाद्य निगमच्या गोदामात १ लाख १६ हजार ६५६ मेट्रिक टन धान्य साठा उपलब्ध झाला असून एप्रिल व मे महिन्याच्या वाटपासाठी जिल्हा प्रशासनाला ६,७२० मेट्रिक टन धान्यसाठा वितरित करण्यात आला आहे. तालुकानिहाय धान्यपुरवठा करण्यात आला असून स्वस्तधान्य दुकानांच्या माध्यमातून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन धान्य वाटप सुरु आहे.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता शासनाने मजूर, शेतमजूर, शेतकरी, अंत्योदय आणि प्राधान्य गटातील नागरिकांच्या अन्नधान्याची गरज लक्षात घेवून पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत तीन महिन्यांपर्यंत गरिबांना ५ किलो अतिरिक्त तांदूळ मोफत मिळणार आहे. यासह एप्रिल ते जून या तीन महिन्यांचे धान्य प्रत्येक महिन्याला शिधापत्रिकाधारकांना देण्यात येणार आहे. तसेच अंत्योदय, प्राधान्य कुटुंब आणि शेतकऱ्यांना ही २ रुपये किलोप्रमाणे गहू व ३ रुपये किलोप्रमाणे तांदूळ मिळणार असल्याने लाभार्थ्यांना मोठा आधार होणार आहे. तीन महिन्याची परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील आठही तालुक्याच्या लाभार्थ्यांचा विचार करुन आतापर्यंत १ लाख १६ हजार ६५६ मेट्रिक टन धान्यसाठा भारतीय खाद्य निगमकडे उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यामध्ये ९७ हजार ५१७ मेट्रिक टन गहू व १९ हजार १३९ मॅट्रिक टन तांदूळ उपलब्ध आहे. एप्रिल व मे महिन्यासाठी आवश्यकतेनुसार ६ हजार ७३० मेट्रिक टन धान्य भारतीय खाद्य निगमकडून जिल्हा अन्नपुरवठा विभागाला देण्यात आला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये अन्नधान्य पुरवठ्याचे काम सुरु असून लागलीच भारतीय खाद्य निगमकडून जून महिन्याचाही धान्यपुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यात मुबलक धान्यसाठा असून सर्वापर्यंत धान्य पोहोचविण्यासाठी प्रशासन प्रयत्नरत आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दी करू नये,असे आवाहन करण्यात आले आहे.असा होत आहे लाभार्थ्यांना धान्यपुरवठाअंत्योदय अन्न योजना (पिवळी शिधापत्रिका) च्या लाभार्थ्यांना २ रुपये प्रतिकिलो प्रमाणे १५ किलो गहू, ३ रुपये किलो प्रमाणे २० किलो तांदूळ तसेच मोफत ५ किलो प्रति व्यक्ती प्रमाणे धान्य दिल्या जात आहे. प्राधान्य कुंटुंब लाभार्थी (पिवळी व केसरी शिधापत्रिका) लाभार्थ्यांना २ रुपये प्रति व्यक्ती ३ किलो गहू, ३ रुपये किलो प्रमाणे प्रती व्यक्ती २ किलो प्रमाणे तांदूळ तसेच मोफत ५ किलो प्रति व्यक्ती वाटप केल्या जात आहे. ज्या कुटुंबाकडे शिधापत्रिका उपलब्ध नाही, त्यांच्यासाठी तहसील कार्यालयात नोंदणी केल्यानंतर एप्रिल, मे व जून महिन्यांचे धान्य उपलब्ध करुन दिले जाणार असल्याची माहिती जिल्हा अन्नपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुनच धान्याचे वाटप केले जात आहे. उपलब्ध झालेला धान्यसाठी प्रत्येक तालुक्याला पुरविण्यात आला असून सर्वत्र अन्नधान्य वाटपाचे काम प्रगतीपथावर आहे. यासंदर्भात स्वस्त धान्य दुकानांच्या तक्रारीवर त्वरित कार्यवाही करण्यात येईल.- रमेश बेंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी, वर्धा.धान्य वाटप करताना अमरावतीच्या दोघांविरुद्ध गुन्हाकारंजा (घा.) : येथील विठ्ठल टेकडी परिसरात नागरिकांना विना परवानगीने अन्नधान्य वाटप करीत असलेल्या अमरावती येथील दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अब्दुल हफीज अब्दुल हकीम आणि रियाज खान दोन्ही रा. अमरावती हे एम. एच. ०२ डि. जे. ८९८९ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने अन्नधान्य वाटप करीत असल्याची माहिती निगराणी पथकातील प्रभाकर नासरे यांना मिळाली. नासरे यांनी टेकडी परिसरात जात त्यांची विचारपूस केली असता त्यांनी परिसरात बारा जीवनावश्यक वस्तूंची किट वाटप केल्याचे सांगितले. जिल्हाबंदी लागू असताना दोघेही वर्धा जिल्ह्यात आल्याने त्यांच्याविरुद्ध संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारंजा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस