शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
3
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
4
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
5
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
7
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
8
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
9
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
10
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
11
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
12
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
13
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
14
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
15
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
16
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
17
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
18
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
19
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
20
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव

कान्हापूर-मोर्चापूर रस्त्याची दैना

By admin | Updated: May 18, 2015 02:04 IST

सेलू मार्गावर कान्हापूर येथून मोर्चापूरकडे जात असलेल्या रस्त्याची मोठी दैना झाली आहे.

वर्धा : सेलू मार्गावर कान्हापूर येथून मोर्चापूरकडे जात असलेल्या रस्त्याची मोठी दैना झाली आहे. रस्त्यावरील डांबर उखडून गिट्टी बाहेर आली आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. शहराला सर्व गावे जोडली जावी यासाठी मुख्य रस्त्यापासून आत असलेल्या गावांपर्यंत पक्के रस्ते असणे आवश्यक आहे. त्याशिवाय गावांपर्यत विकास पोहोचू शकत नाही. म्हणूनच या रस्त्यांना रक्तवाहिन्या संबोधले जाते. वर्धा-सेलू मार्गावर असलेल्या कान्हापूर या गावापासून आत असलेल्या मोर्चापूर, वाहितपूर, रमणा यासह अनेक गावांना एकमेकांशी जोडण्यासाठी काही वर्षांपूर्वी पक्क्या डांबर रस्त्याची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे या भागातील नागरिकांना सेलू, वर्धा आदी शहरांकडे येणे सोपे झाले. हा संपूर्ण परिसर सुपीक जमिनींनी व्यापलेला आहे. त्यामुळे येथील शेतकरी वर्गाला झालेले उत्पन्न विकण्यासाठी त्यांना सेलू किंवा वर्धा शहरच गाठावे लागते. या रस्त्याने बैलगाडीची वाहतूकही मोठ्या प्रमाणात होते. रस्त्याच्या निर्मितीपासून या मार्गाकडे दुर्लक्ष केल्याने सध्यस्थितीत कान्हापूर ते मोर्चापूर रस्त्यावरील डांबर अनेक ठिकाणी उखडले असून रस्त्याची पूर्णत: दैना झाली आहे. हा रस्त्या वळणावळणाचा आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता बळावली असून किरकोळ अपघात तर येथे नित्याचेच झाले आहे. या मार्गावर डांबराचा कोट चढविणे गरजेचे झाले आहे. काहीच दिवसात पावसाला सुरुवात होणार आहे. त्याआधी या रस्त्याची दुरुस्ती न केल्यास रस्त्यावर आणखी खड्डे निर्माण होऊन अपघात बळावू शकतात. त्यामुळे ता रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर करावी अशी मागणी या परिसरातील नागरिक व प्रवासी करीत आहे.(शहर प्रतिनिधी)