शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यावर कारवाई केल्याने विष प्राशन करून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 06:00 IST

मोई (तांडा) येथील रामकिसन सरदार राठोड (४५) यांच्याकडे सव्वाचार एकर शेती आहे. सततची नापिकी व दुष्काळाने त्यांनी आधीच धसका घेतला होता. साडेचार लाखाचे कर्जही होते. अशातच त्यांना घरगुती वापराचे बिल आले. मात्र परिस्थिती अभावी बिल भरले नाही. ७ ला त्यांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. त्यांना सार्वजनिक वीजेच्या खांबावर हूक टाकून घरी पुरवठा सुरू केला.

ठळक मुद्देअभियंता,लाईनमनवर कारवाई करा : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : घरगुती वापराचा वीजपुरवठा बिल न भरल्याने महावितरण कंपनीच्या अभियंत्याने खंडीत केला होता. यासाठी १५ हजार दंडही ठोठावला. कारवाईच्या भितीपोटी शेतकºयाने विषप्राशन करून आत्महत्या केली. सदर घटना बुधवारी घडली. याप्रकरणी वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी कुटुंबियांसह ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.मोई (तांडा) येथील रामकिसन सरदार राठोड (४५) यांच्याकडे सव्वाचार एकर शेती आहे. सततची नापिकी व दुष्काळाने त्यांनी आधीच धसका घेतला होता. साडेचार लाखाचे कर्जही होते. अशातच त्यांना घरगुती वापराचे बिल आले. मात्र परिस्थिती अभावी बिल भरले नाही. ७ ला त्यांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. त्यांना सार्वजनिक वीजेच्या खांबावर हूक टाकून घरी पुरवठा सुरू केला. याची माहिती वायरमन ढोबळे यांना मिळाली. त्यांनी अभियंता अतकरे यांना कळविले. अतकरे यांनी राठोड यांच्याघरी धाड टाकली. मीटर व वायर जप्त केला. १५ हजारांचा दंडही दिला.या कारवाईचा धसका घेतल्याने त्यांनी १३ ला आष्टीच्या वीज वितरण कंपनी कार्यालयात येवून न्याय मागितला. ७५० रुपये बिल भरतो. कारवाई करू नका. दंड माफ करा अशी विनंती केली. मात्र अभियंता अतकरे यांनी काहीही ऐकुन न घेता शेतकºयांला धमकावले. अभियंत्याच्या धमकीमुळे वैफल्यग्रस्त रामकिसन राठोड यांनी मोई गाव गाठले. दुपारी १ वाजता घरातच विषारी औषध प्राशन केले. गावकºयांना माहिती होताच उपचारासाठी आष्टी ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र डॉक्टर गैरहजर असल्याने त्यांच्यावर कोणीही उपचार केले नाही. त्यांना आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयात नेताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, वडील आहे. याप्रकरणी अभियंता अतकरे, लाईनमन ढोबाळे यांच्या विरोधात आष्टी पोलिसात तक्रार देण्यात आली. जिल्हाधिकाºयांना निवेदन पाठविण्यात आले. शवविच्छेदन झाल्यावर आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे कुटुंबियांनी सांगितले.शेतकºयाने माझ्याकडे येवून माहिती दिली असती तर उपाययोजना करता आली असती याप्रकरणी वरिष्ठांना माहिती देण्यात आली. अभियंता व लाईनमन यांची चौकशी करून अहवाल वरिष्ठांना पाठविला जाणार आहे.-आर.एम. खडसे, उपविभागीय अभियंता, वीज वितरण कंपनी, आष्टी (शहीद).

टॅग्स :Deathमृत्यू