शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

पूरपीडितांना पट्ट्यांची दुय्यम प्रत मिळावी

By admin | Updated: May 27, 2017 00:33 IST

शहरात १९७९ मध्ये आलेल्या महापुरातील प्रभावीत नागरिकांना शासनाकडून पट्टे देण्यात आले.

मागणी : पट्टेधारकांच्या प्रती झाल्या गहाळ लोकमत न्यूज नेटवर्क हिंगणघाट : शहरात १९७९ मध्ये आलेल्या महापुरातील प्रभावीत नागरिकांना शासनाकडून पट्टे देण्यात आले. शासनाने येथील रहिवाशांना पट्टे हस्तांतरीत केले. याला बराच कालावधी झाला असून काही पट्टेधारकांची हस्तांतरणाची प्रत गाहाळ झाली आहे. त्यामुळे या नागरिकांना नव्याने पट्ट्याची दुय्यम प्रत देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे. नगरसेवक प्रकाश राऊत यांच्या नेतृत्त्वात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. हिंगणघाट शहरामध्ये सन १९७९ मध्ये महापूर आला होता. नदीकाठच्या लोकांची घरे पुरात वाहल्यामुळे त्या भागातील नागरिकांना पुरपिडीत म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यांना पुरपिडीत वसाहतीत भूखंड देण्यात आले. तर काही पुरपिडीतांना गोमाजी वार्ड, शास्त्री वार्ड, इंदिरा गांधी वॉर्ड, तुकडोजी वॉर्ड येथे भूखंड देण्यात आले होते. मात्र यामध्ये ज्या नागरिकांना भूखंडासंदर्भात पट्टे देण्यात आले होते. हे पट्टे देण्यास बराच कालावधी लोटला आहे. यात येथील काही रहिवाशांची पट्टे मिळाल्याबाबतची प्रत गहाळ झालेली आहे. ज्या नागरिकांचे पट्टे गहाळ झाले आहे अशा नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेमध्ये घरकूल मंजूर करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरिता त्यांना पट्ट्यांच्या प्रतीची अत्यंत आवश्यकता आहे. तहसील कार्यालयाच्यावतीने या पट्टेधारकांना नव्याने दुय्यम प्रत दिल्यास त्यांची अडचण दूर होईल, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. याकरिता ज्या नागरिकांचे पट्टे गहाळ झाले आहे त्यांना त्वरीत त्यांच्या पट्ट्यांची दुय्यम प्रत उपलब्ध करून द्यावी, अशा मागणीचे निवेदन तहसीलदारांना दिले. यावेळी नगरसेविका पद्मा कोडापे, प्रकाश राऊत तसेच शीतल रॉय, पुष्पा भोयर, तानाबाई कुमरे, चंदा कुमरे, रमेश जुमनाके, संगीता तोडासे, सिंधु बिजवार, सुमन कोडापे, सुरेश जुमनाके, विनोद घुबडे, दुर्गा तोडासे आदींची उपस्थिती होती. शासकीय योजनांचा लाभ घेताना येतो व्यत्यय येथील काही रहिवाशांना पंतप्रधान आवास योजनेमध्ये घरकूल मंजूर करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरिता त्यांना पट्ट्यांच्या प्रतीची अत्यंत आवश्यकता आहे. मात्र लाभार्थ्यांची पट्टे मिळाल्याबाबतची प्रत गहाळ झालेली आहे. ज्या नागरिकांचे पट्टे मिळाल्याची प्रत गहाळ झाली त्यांना दुय्यम प्रत दिल्यास शासकीय योजनांचा लाभ घेणे सोयीस्कर ठरू शकते. त्यामुळे या मागणीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.