शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

गारपिटग्रस्तांचा नुकसानीचा निधी त्वरित खात्यात जमा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 00:36 IST

मागील महिन्यात जिल्ह्यात काही तालुक्यांत गारपीट झाले. या गारपिटीमुळे शेतकºयांच्या शेतपिके तथा फळपिकांचे नुकसान झाले. या नुकसानीची भरपाई देण्यासाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला आहे.

ठळक मुद्देआयुक्तांच्या सूचना विविध विषयावर आढावा बैठक

आॅनलाईन लोकमतवर्धा : मागील महिन्यात जिल्ह्यात काही तालुक्यांत गारपीट झाले. या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेतपिके तथा फळपिकांचे नुकसान झाले. या नुकसानीची भरपाई देण्यासाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला आहे. हा निधी त्वरित गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा, अशा सूचना विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयावर आढावा सभा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे, खातेप्रमुख उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चौधरी यांनी सेवाग्राम विकास आराखड्याच्या प्रथम टप्प्यात पाच कामे प्रगतिपथावर असून सभागृह, यात्रीनिवासची टाकी, संरक्षण भिंत, धाम नदीची एक बाजू तथा यात्री निवास येथील पार्किंगचे काम सुरू असल्याचे सांगितले.यावर आयुक्तांनी मे २०१८ पर्यंत सदर कामे पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. तिसºया टप्प्यातील कामाचा आराखडा तयार करण्यात आला असून यावर्षी ६० कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. एकूण ८५ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याचे सांगितले. गौण खनिज, रेतीघाट आदींचा महसूल गोळा करून १०० टक्के वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करावे, विविध विभागांना देण्यात आलेले वृक्ष लागवड उद्दिष्ट पूर्ण करावे, स्वयंसेवी संस्थानी वृक्ष जोपासण्याची जबाबदारी घेत अशाच ठिकाणी वृक्ष लागवड करावी. वन विभागाने झुडपी जंगल जमिनीचा कलम ४ नुसार वृक्ष लागवडीकरिता वापर करावा अशाही सूचना त्यांनी दिल्या. शेतीपूरक अभियानांतर्गत मत्स्य उत्पादन, तलाव तेथे मासोळी, मच्छीयुक्त तलाव, फिशनर्सरी, बोटुकली निर्माण करणे, दुग्धव्यससाय, कुक्कुटपालन, चारा उत्पादन, रेशीम तुती लागवडीमध्ये वाढ करण्यासाठी संबंधित विभागांनी प्रयत्न करावे. जिल्ह्यात उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासणार नाही यासाठी केलेल्या उपाययोजनांची अनुपकुमार यांनी माहिती जाणून घेतली. जलयुक्त शिवार अभियान, धडक सिंचन विहिरीबाबतही आढावा घेण्यात आला.मायक्रो एटीएमचा उपयोग करण्याचे आवाहनमायक्रो एटीएम ही सुविधा घरपोच व गावात उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ही सेवा आधार लिंक असून यात कोणत्याही प्रकारची फसवणूक नाही. नागरिकांना थंबद्वारे व्यवहार करता येतात. ही सुविधा गावात व घरपोच उपलब्ध असल्याने नागरिकांना शहरात जाऊन आर्थिक व्यवहार करण्यासाठी वेळ व पैसा खर्च करण्याची गरज नाही. यासाठी नागरिकांनी मायक्रो एटीएम सेवेचा उपयोग करून लाभ घ्यावा, असे आवाहन सेलू तालुक्यातील बोरी येथे मायक्रो एटीएमच्या उद्घाटनप्रसंगी विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी केले.जिल्हा नियोजन समिती व आयडीएफसी बँक तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जि.प. सीईओ अजय गुल्हाणे, तहसीलदार महेंद्र सोनोने, गटविकास अधिकारी संघमित्रा कोल्हे, देवकुमार कांबळे, नायब तहसीलदार श्याम कावटी, मनीष कावडे, हेमंत काकडे, मंडळ अधिकारी सायरे उपस्थित होते.बँक सुविधा सुरळीत व्हावी, आपले आधार आपली बँक या सुविधेंतर्गत ही सेवा गावस्तरावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात बँक खाते उघडणे, पैसे काढणे व भरणे, निराधार, विधवा, राजीव गांधी पेन्शन, शिष्यवृत्ती रक्कम काढणे आदी कामे केली जाते. यामुळे वेळ, श्रम व बुडणारी मजुरीची वाचेल, असेही अनुपकुमार यांनी सांगितले.