शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
4
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
5
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
6
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
7
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
8
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
9
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
10
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
11
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
12
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
13
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
14
Navi Mumbai: तीन मित्रांच्या जीवावर बेतली पावसाळी सहल 
15
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
16
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
17
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
18
IPO: 'स्वप्न विकणारे' आयपीओ ठरले फसवे, रिटर्न्समध्ये गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग !
19
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
20
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली

दुबार पेरणीचे सावट गडद

By admin | Updated: July 9, 2015 02:05 IST

दोन ते तीन वर्षांपासून मृगाचा पाऊस बरसलाच नव्हता. त्यानंतरची नक्षत्र मात्र बळीराजाला साथ देत होती.

पिके आॅक्सिजनवर : जमिनी पडल्या कोरड्यावर्धा : दोन ते तीन वर्षांपासून मृगाचा पाऊस बरसलाच नव्हता. त्यानंतरची नक्षत्र मात्र बळीराजाला साथ देत होती. यंदा मात्र मृगातच पावसाने दमदार हजेरी लावली. शेतकरी पेरता झाला. रोप अंकुरली. पण ती बहरण्यासाठी पाऊस परतलाच नाही. दरवर्षी साथ देणारे आर्द्रा नक्षत्र यंदा पूर्णत: कोरडे गेले. त्यामुळे आकाशाकडे पावसाची वाट पाहात असलेल्या बळीराजाच्या डोळ्यातच आता पाऊस दाटला आहे. रोज दुपारी ढग दाटून येतात. गार हवेची झुळकही पसरते. पण आलेले ढग पुन्हा काही वेळातच विरून जातात. महिनाभरापासून हीच स्थिती असल्याने जिल्ह्यावर दुबार पेरणीचे सावट घोंगावत आहे. यंदाच्या खरीपातील पेरणी अहवालानुसार जिल्ह्यात एकूण ४ लाख २० हजार हेक्टर जमिनीवर पेरणीचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी २ लाख ३७ हजार हेक्टर जमिनीवर कापसाचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले. १ लाख ८१ हजार हेक्टरवर कपाशीचा पेरा झाला. त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत कापसाची ७६.२० टक्के पेरणी झाली. यात हिंगणघाट तालुक्यात सर्वाधिक ४२ हजार १५८ हेक्टरवर कपाशीची पेरणी झाली. त्याचप्रमाणे १ लाख १० हजार हेक्टरवर सोयाबीन पिकाचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी ७५ हजार ५२७ हेक्टरवर म्हणजेच ७७.७५ टक्के पेरणी आतापर्यंत झालेली आहे. या दोंंन्ही पिकांमध्ये आंतरपीक म्हणून तुरीची लागवड केली जाते. यंदा जिल्ह्यात ६५ हजार ६०० हेक्टरवर तूरपिकाचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी ३९ हजार ६५० हेक्टरवर म्हणजेच ६० टक्के पेरणी आटोपली आहे. चांगला पाऊस झाल्यावरच पेरणी करण्याचा सल्ला जिल्हा कृषी विभागाने दिला होता. त्यानुसार सतत चार दिवस मृगाचा पाऊस बरसल्यावरच शेतकरी पेरता झाला. परंतु त्यानंतर पावसाने मारलेली दडी दुबार पेरणीचे सावट गडद करीत आहे. जिल्ह्यात केवळ १० टक्केच क्षेत्र हे पूर्ण ओलिताखाली असून ९० टक्के जमीन ही कोरडवाहू क्षेत्रातील आहे. त्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांना पिके कशी जगवावी, हा प्रश्न पडला आहे. ओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांनाही भारनियमनाने ग्रासले आहे. दिवसभर वीज राहात नसल्याने पिकांना रात्र जागून ओलित करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. तसेच पाणीही पुरत नसल्याचे शेतकरी सांगत आहे. आता पाऊसच या संकटातून वाचवू शकत असल्याची भावना बळीराजा व्यक्त करीत आहे.(शहर प्रतिनिधी)कुठल्याही स्थितीत पीक जगणे महत्त्वाचेओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांना तितकीशी चिंता नसली तरी कोरडवाहू शेतकरी मात्र संकटात सापडले आहे. त्यातही विहिरीद्वारे ओलित असलेल्या शेतकरी वर्गालाच सिंचन करता येत आहे. त्यामुळे कालव्यांद्वारे जेथे सिंचनाची सोय करता येत असेल तेथे पाठबंधारे विभागाने किमान एक पाणी देता येईल एवढी सोय करणे गरजेचे आहे. त्यामुळे आणखी काही दिवस पाऊस नाहीच आला तरी देखील पिके जगू शकतील. कालव्यांतून जेवढे पाणी सोडता येईल तेवढे पाणी सोडण्याची गरज जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी व्यक्त केली. शेवटी जमेल तेवढी पीक जगणे महत्वाची असल्याचे ते म्हणाले.