शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दुबार पेरणीचे सावट गडद

By admin | Updated: July 9, 2015 02:05 IST

दोन ते तीन वर्षांपासून मृगाचा पाऊस बरसलाच नव्हता. त्यानंतरची नक्षत्र मात्र बळीराजाला साथ देत होती.

पिके आॅक्सिजनवर : जमिनी पडल्या कोरड्यावर्धा : दोन ते तीन वर्षांपासून मृगाचा पाऊस बरसलाच नव्हता. त्यानंतरची नक्षत्र मात्र बळीराजाला साथ देत होती. यंदा मात्र मृगातच पावसाने दमदार हजेरी लावली. शेतकरी पेरता झाला. रोप अंकुरली. पण ती बहरण्यासाठी पाऊस परतलाच नाही. दरवर्षी साथ देणारे आर्द्रा नक्षत्र यंदा पूर्णत: कोरडे गेले. त्यामुळे आकाशाकडे पावसाची वाट पाहात असलेल्या बळीराजाच्या डोळ्यातच आता पाऊस दाटला आहे. रोज दुपारी ढग दाटून येतात. गार हवेची झुळकही पसरते. पण आलेले ढग पुन्हा काही वेळातच विरून जातात. महिनाभरापासून हीच स्थिती असल्याने जिल्ह्यावर दुबार पेरणीचे सावट घोंगावत आहे. यंदाच्या खरीपातील पेरणी अहवालानुसार जिल्ह्यात एकूण ४ लाख २० हजार हेक्टर जमिनीवर पेरणीचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी २ लाख ३७ हजार हेक्टर जमिनीवर कापसाचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले. १ लाख ८१ हजार हेक्टरवर कपाशीचा पेरा झाला. त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत कापसाची ७६.२० टक्के पेरणी झाली. यात हिंगणघाट तालुक्यात सर्वाधिक ४२ हजार १५८ हेक्टरवर कपाशीची पेरणी झाली. त्याचप्रमाणे १ लाख १० हजार हेक्टरवर सोयाबीन पिकाचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी ७५ हजार ५२७ हेक्टरवर म्हणजेच ७७.७५ टक्के पेरणी आतापर्यंत झालेली आहे. या दोंंन्ही पिकांमध्ये आंतरपीक म्हणून तुरीची लागवड केली जाते. यंदा जिल्ह्यात ६५ हजार ६०० हेक्टरवर तूरपिकाचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी ३९ हजार ६५० हेक्टरवर म्हणजेच ६० टक्के पेरणी आटोपली आहे. चांगला पाऊस झाल्यावरच पेरणी करण्याचा सल्ला जिल्हा कृषी विभागाने दिला होता. त्यानुसार सतत चार दिवस मृगाचा पाऊस बरसल्यावरच शेतकरी पेरता झाला. परंतु त्यानंतर पावसाने मारलेली दडी दुबार पेरणीचे सावट गडद करीत आहे. जिल्ह्यात केवळ १० टक्केच क्षेत्र हे पूर्ण ओलिताखाली असून ९० टक्के जमीन ही कोरडवाहू क्षेत्रातील आहे. त्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांना पिके कशी जगवावी, हा प्रश्न पडला आहे. ओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांनाही भारनियमनाने ग्रासले आहे. दिवसभर वीज राहात नसल्याने पिकांना रात्र जागून ओलित करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. तसेच पाणीही पुरत नसल्याचे शेतकरी सांगत आहे. आता पाऊसच या संकटातून वाचवू शकत असल्याची भावना बळीराजा व्यक्त करीत आहे.(शहर प्रतिनिधी)कुठल्याही स्थितीत पीक जगणे महत्त्वाचेओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांना तितकीशी चिंता नसली तरी कोरडवाहू शेतकरी मात्र संकटात सापडले आहे. त्यातही विहिरीद्वारे ओलित असलेल्या शेतकरी वर्गालाच सिंचन करता येत आहे. त्यामुळे कालव्यांद्वारे जेथे सिंचनाची सोय करता येत असेल तेथे पाठबंधारे विभागाने किमान एक पाणी देता येईल एवढी सोय करणे गरजेचे आहे. त्यामुळे आणखी काही दिवस पाऊस नाहीच आला तरी देखील पिके जगू शकतील. कालव्यांतून जेवढे पाणी सोडता येईल तेवढे पाणी सोडण्याची गरज जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी व्यक्त केली. शेवटी जमेल तेवढी पीक जगणे महत्वाची असल्याचे ते म्हणाले.