शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

दुबार पेरणीचे सावट गडद

By admin | Updated: July 9, 2015 02:05 IST

दोन ते तीन वर्षांपासून मृगाचा पाऊस बरसलाच नव्हता. त्यानंतरची नक्षत्र मात्र बळीराजाला साथ देत होती.

पिके आॅक्सिजनवर : जमिनी पडल्या कोरड्यावर्धा : दोन ते तीन वर्षांपासून मृगाचा पाऊस बरसलाच नव्हता. त्यानंतरची नक्षत्र मात्र बळीराजाला साथ देत होती. यंदा मात्र मृगातच पावसाने दमदार हजेरी लावली. शेतकरी पेरता झाला. रोप अंकुरली. पण ती बहरण्यासाठी पाऊस परतलाच नाही. दरवर्षी साथ देणारे आर्द्रा नक्षत्र यंदा पूर्णत: कोरडे गेले. त्यामुळे आकाशाकडे पावसाची वाट पाहात असलेल्या बळीराजाच्या डोळ्यातच आता पाऊस दाटला आहे. रोज दुपारी ढग दाटून येतात. गार हवेची झुळकही पसरते. पण आलेले ढग पुन्हा काही वेळातच विरून जातात. महिनाभरापासून हीच स्थिती असल्याने जिल्ह्यावर दुबार पेरणीचे सावट घोंगावत आहे. यंदाच्या खरीपातील पेरणी अहवालानुसार जिल्ह्यात एकूण ४ लाख २० हजार हेक्टर जमिनीवर पेरणीचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी २ लाख ३७ हजार हेक्टर जमिनीवर कापसाचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले. १ लाख ८१ हजार हेक्टरवर कपाशीचा पेरा झाला. त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत कापसाची ७६.२० टक्के पेरणी झाली. यात हिंगणघाट तालुक्यात सर्वाधिक ४२ हजार १५८ हेक्टरवर कपाशीची पेरणी झाली. त्याचप्रमाणे १ लाख १० हजार हेक्टरवर सोयाबीन पिकाचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी ७५ हजार ५२७ हेक्टरवर म्हणजेच ७७.७५ टक्के पेरणी आतापर्यंत झालेली आहे. या दोंंन्ही पिकांमध्ये आंतरपीक म्हणून तुरीची लागवड केली जाते. यंदा जिल्ह्यात ६५ हजार ६०० हेक्टरवर तूरपिकाचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी ३९ हजार ६५० हेक्टरवर म्हणजेच ६० टक्के पेरणी आटोपली आहे. चांगला पाऊस झाल्यावरच पेरणी करण्याचा सल्ला जिल्हा कृषी विभागाने दिला होता. त्यानुसार सतत चार दिवस मृगाचा पाऊस बरसल्यावरच शेतकरी पेरता झाला. परंतु त्यानंतर पावसाने मारलेली दडी दुबार पेरणीचे सावट गडद करीत आहे. जिल्ह्यात केवळ १० टक्केच क्षेत्र हे पूर्ण ओलिताखाली असून ९० टक्के जमीन ही कोरडवाहू क्षेत्रातील आहे. त्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांना पिके कशी जगवावी, हा प्रश्न पडला आहे. ओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांनाही भारनियमनाने ग्रासले आहे. दिवसभर वीज राहात नसल्याने पिकांना रात्र जागून ओलित करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. तसेच पाणीही पुरत नसल्याचे शेतकरी सांगत आहे. आता पाऊसच या संकटातून वाचवू शकत असल्याची भावना बळीराजा व्यक्त करीत आहे.(शहर प्रतिनिधी)कुठल्याही स्थितीत पीक जगणे महत्त्वाचेओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांना तितकीशी चिंता नसली तरी कोरडवाहू शेतकरी मात्र संकटात सापडले आहे. त्यातही विहिरीद्वारे ओलित असलेल्या शेतकरी वर्गालाच सिंचन करता येत आहे. त्यामुळे कालव्यांद्वारे जेथे सिंचनाची सोय करता येत असेल तेथे पाठबंधारे विभागाने किमान एक पाणी देता येईल एवढी सोय करणे गरजेचे आहे. त्यामुळे आणखी काही दिवस पाऊस नाहीच आला तरी देखील पिके जगू शकतील. कालव्यांतून जेवढे पाणी सोडता येईल तेवढे पाणी सोडण्याची गरज जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी व्यक्त केली. शेवटी जमेल तेवढी पीक जगणे महत्वाची असल्याचे ते म्हणाले.