शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

पर्यावरण हा विषय शिक्षकांकडूनच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा

By admin | Updated: January 4, 2017 00:37 IST

महाराष्ट्रातील हरित सेना शिक्षकांच्या कार्यशाळा घेवून तज्ज्ञांकडून शिक्षकांना मार्गदर्शन केल्या जाते.

हरित सेना शिक्षकांची जिल्हास्तरीय कार्यशाळा : सामाजिक वनीकरण विभागाचा उपक्रम सेवाग्राम : महाराष्ट्रातील हरित सेना शिक्षकांच्या कार्यशाळा घेवून तज्ज्ञांकडून शिक्षकांना मार्गदर्शन केल्या जाते. पर्यावरण हा विषय शिक्षकांकडूनच विद्यार्थ्यांपर्यंत आणि पुढे समाजात पोहचतो. त्यामुळे शिक्षकांना याविषयी जागरूक करणे आवश्यक आहे. वर्धा जिल्ह्याने झाडे लावण्याचे उद्दीष्ट्य पूर्ण केले असले तरी ही मोहीम एवढ्यावर न थांबता कामा नये. पर्यावरण घटकांवर अधिक जनजागृती करावी लागणार, असे प्रतिपादन सामाजिक वनिकरणचे उपसंचालक राजीव पवार यांनी केले. सामाजिक वनीकरण विभाग, तर्फे जिल्हास्तरीय राष्ट्रीय हरित सेना शिक्षकांची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजीव पवार होते. मंचावर सहाय्यक के.वाय. तळवेकर, मार्गदर्शक म्हणून भारती विद्यापीठ पुणे येथील अजिंक्य भटकर होते. मान्यवरांचे रोपटे देवून बी.डी. खडतकर यांनी स्वागत केले. पर्यावरणाकडे केलेल्या दुर्लक्षामुळे तापमान वाढत आहे. याचा फटका आपण पण सहन करतो. संकटे निर्माण झाली. आता अंमलबजावणी करणे आणि भावी पिढीला मार्गदर्शन व कार्यरत ठेवण्याची वेळ आली आहे. सण, उत्सवातून अधिक प्रचार व प्रसाराचे काम व्हावे तसेच समन्वयकांना अधिक कृतिशील होण्यासाठी ही कार्यशाळा महत्वाची ठरेल, असे पुढे बोलताना पवार म्हणाले. मार्गदर्शक अजिंक्य भटकर यांनी शिक्षक, समन्वयक यांच्यासोबत संवास साधला. पर्यावरण विषयाची व्याप्ती मोठी आहे. झाडे लावा, संवर्धन करा ऐवढेच हरितसेनेचे काम नसून याविषयी जागरुकता निर्माण करणे आवश्यक असल्याचे सांगितले. प्रत्येक शिक्षकाने आपली शाळा हरित आहे, का यावर भर दिला पाहिजे, असे सांगितले. यानंतर विद्यार्थ्यांनी शाळेत केलेल्या हरित सेनेतील कामाचा आढावा घेण्यात आला. शिक्षक उत्साही व अभ्यासू असेल तर विद्यार्थ्यांना कार्यासाठी प्रोत्साहित करू शकतात. शिक्षकांनी काम करताना माहिती, नोंदी ठेवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना वा सदस्यांना प्राणी, पक्षी, पाणी, झाडे, वनौषधी याची नोंदवहीमध्ये माहिती संकलीत करण्याची सवय लावावी. जेणेकरून नोंदीसोबत ज्ञान, जिज्ञासा, आवड निर्माण होवू शकते. अलीकडे या क्षेत्रात येण्याचा विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. करिअरची संधी आहे. शिक्षक व सदस्यांनी हरिअसेना प्रकल्पावर भर द्यावा. शाळा, गावकरी, ग्रा.पं. चा सहभाग वाढावा. पर्यावरणासाठी कृतिशील कार्यक्रमाची गरज असल्याचे भटकर म्हणाले. यानंतर वसंत डुम्पलवार, शोभा बेलखोडे यांनी मनोगत व्यक्त केले. हरित सेनेच्या कार्यशाळा किंवा सभा बोरधरणसारख्या निसर्गरम्य ठिकाणी घेण्यात याव्या अशी मागणी शिक्षकांनी केली. आभार बी.डी. खडतकर यांनी मानले. सहकार्य ए.बी. वंजारी, एस.कांबळे, एम.बी. गायकवाड, एस.एम. रिझवी यांनी केले.(वार्ताहर)