शहरं
Join us  
Trending Stories
1
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या
2
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
3
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
4
CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
5
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
6
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
7
"सोना कितना सोना है...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान करवाचौथला गोविंदाने बायकोला दिला सोन्याचा हार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
9
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
10
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
11
इक्विटी फंड गुंतवणुकीला ब्रेक; या ईटीएफमध्ये पैसा ओततायत लोक, तुम्ही...
12
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
13
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
14
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
15
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
16
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
17
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
18
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
19
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
20
"माझा शारीरिक छळही झाला", घटस्फोटाबद्दल मयुरी वाघचा धक्कादायक खुलासा, म्हणाली- "ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच..."

कपाशीनंतर उपविभागातील तूर उत्पादक शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 23:26 IST

बोंडअळीने कपाशीचे पीक फस्त केले. यामुळे शेतकरी हवालदिल झाले. आता आर्वी उपविभागातील आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यातील ४९९ गावांतील तूर पिकावर रोगाचे आक्रमण झाले आहे.

ठळक मुद्देशेतातील पीक पिवळे पडून वाळतेय : शेतकºयांमध्ये धास्ती

सुरेंद्र डाफ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : बोंडअळीने कपाशीचे पीक फस्त केले. यामुळे शेतकरी हवालदिल झाले. आता आर्वी उपविभागातील आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यातील ४९९ गावांतील तूर पिकावर रोगाचे आक्रमण झाले आहे. यात शेतातील उभे तूर पीक पिवळे पडून वाळू लागले आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाल्याचे दिसून येत आहे.आर्वी उपविभागात मागील वर्षी तूर उत्पादकांना समाधानकारक उत्पादन झाले. यामुळे त्यांना आर्थिक हातभार लागला; पण यंदा थंडीचे प्रमाण कमी-अधिक असल्याने याचा थेट परिणाम तूर पिकावर होत आहे. ऐन हातातोंडाशी आलेले तूर पीक वाळत असल्याने या अज्ञात रोगाने शेतकरी चांगलाच धास्तावला आहे. कपाशीनंतर नगदी व कमी खर्चाचे पीक म्हणून तुरीची ओळख आहे; पण अज्ञात रोगामुळे तूर पीक पूर्णत: वाळत आहे. बहुतांश शेतातील तूर पीक पिवळे पडले असून शेंगा वाळत आहे. शेंगा भरत नसल्याने उत्पादनावर परिणाम होणार असल्याचेच दिसते. तालुक्यातील वाठोडा, अहिरवाडा, वागदा, सर्कसपूर, राजापूर, निंबोली (शेंडे), देऊरवाडा, माटोडा, लाडेगाव, एकलारा, टाकरखेडा, नांदपूर, शिरपूर (बो.), जळगाव, वर्धमनेरी, मांडला, खुबगाव, पिंपळखुटा, गुमगाव, दहेगाव (मु.), रोहणा, धनोडी, रसुलाबाद, विरूळ (आ.), बाजारवाडा, हरदोली, पांजरा यासह तालुक्यातील सर्वच तूर उत्पादक शेतकºयांच्या शेतात या अज्ञात रोगाची लागण झाली आहे.कपाशीवर बोंडअळीचे आक्रमण झाल्याने शेतकºयांचे आर्थिक बजेट कोसळले. लागवड खर्चही निघाला नाही. आत तूर पिकावरही अज्ञात रोगाचे आक्रमण झाल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेतकºयाच्या शेतातील उभे पीक वाळत असल्याने तूर पिकही शेतकºयांच्या हातून जाण्याची चिन्हे आहेत.माझ्या शेतातील तीन एकराचे तूर पीक अज्ञात रोगाने वाळत आहे. तूर पिवळी पडली असून संपूर्ण झाडे वाळताना दिसतात. कृषी विभागाने तातडीने सर्व्हे करून मदत देणे गरजेचे आहे.- शिवदास शेंडे, तूर उत्पादक शेतकरी, निंबोली (शेंडे), आर्वी.आर्वी उपविभागातील तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतातील तूर पीक पिवळे पडून वाळत असल्याची तक्रार शेतकरी करीत आहे. कृषी विभागाद्वारे तातडीने उपाययोजना केल्या जातील.- सतीश सांगळे, उपविभागीय कृषी अधिकारी, आर्वी.