शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

कपाशीनंतर उपविभागातील तूर उत्पादक शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 23:26 IST

बोंडअळीने कपाशीचे पीक फस्त केले. यामुळे शेतकरी हवालदिल झाले. आता आर्वी उपविभागातील आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यातील ४९९ गावांतील तूर पिकावर रोगाचे आक्रमण झाले आहे.

ठळक मुद्देशेतातील पीक पिवळे पडून वाळतेय : शेतकºयांमध्ये धास्ती

सुरेंद्र डाफ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : बोंडअळीने कपाशीचे पीक फस्त केले. यामुळे शेतकरी हवालदिल झाले. आता आर्वी उपविभागातील आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यातील ४९९ गावांतील तूर पिकावर रोगाचे आक्रमण झाले आहे. यात शेतातील उभे तूर पीक पिवळे पडून वाळू लागले आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाल्याचे दिसून येत आहे.आर्वी उपविभागात मागील वर्षी तूर उत्पादकांना समाधानकारक उत्पादन झाले. यामुळे त्यांना आर्थिक हातभार लागला; पण यंदा थंडीचे प्रमाण कमी-अधिक असल्याने याचा थेट परिणाम तूर पिकावर होत आहे. ऐन हातातोंडाशी आलेले तूर पीक वाळत असल्याने या अज्ञात रोगाने शेतकरी चांगलाच धास्तावला आहे. कपाशीनंतर नगदी व कमी खर्चाचे पीक म्हणून तुरीची ओळख आहे; पण अज्ञात रोगामुळे तूर पीक पूर्णत: वाळत आहे. बहुतांश शेतातील तूर पीक पिवळे पडले असून शेंगा वाळत आहे. शेंगा भरत नसल्याने उत्पादनावर परिणाम होणार असल्याचेच दिसते. तालुक्यातील वाठोडा, अहिरवाडा, वागदा, सर्कसपूर, राजापूर, निंबोली (शेंडे), देऊरवाडा, माटोडा, लाडेगाव, एकलारा, टाकरखेडा, नांदपूर, शिरपूर (बो.), जळगाव, वर्धमनेरी, मांडला, खुबगाव, पिंपळखुटा, गुमगाव, दहेगाव (मु.), रोहणा, धनोडी, रसुलाबाद, विरूळ (आ.), बाजारवाडा, हरदोली, पांजरा यासह तालुक्यातील सर्वच तूर उत्पादक शेतकºयांच्या शेतात या अज्ञात रोगाची लागण झाली आहे.कपाशीवर बोंडअळीचे आक्रमण झाल्याने शेतकºयांचे आर्थिक बजेट कोसळले. लागवड खर्चही निघाला नाही. आत तूर पिकावरही अज्ञात रोगाचे आक्रमण झाल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेतकºयाच्या शेतातील उभे पीक वाळत असल्याने तूर पिकही शेतकºयांच्या हातून जाण्याची चिन्हे आहेत.माझ्या शेतातील तीन एकराचे तूर पीक अज्ञात रोगाने वाळत आहे. तूर पिवळी पडली असून संपूर्ण झाडे वाळताना दिसतात. कृषी विभागाने तातडीने सर्व्हे करून मदत देणे गरजेचे आहे.- शिवदास शेंडे, तूर उत्पादक शेतकरी, निंबोली (शेंडे), आर्वी.आर्वी उपविभागातील तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतातील तूर पीक पिवळे पडून वाळत असल्याची तक्रार शेतकरी करीत आहे. कृषी विभागाद्वारे तातडीने उपाययोजना केल्या जातील.- सतीश सांगळे, उपविभागीय कृषी अधिकारी, आर्वी.