शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

कपाशीनंतर उपविभागातील तूर उत्पादक शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 23:26 IST

बोंडअळीने कपाशीचे पीक फस्त केले. यामुळे शेतकरी हवालदिल झाले. आता आर्वी उपविभागातील आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यातील ४९९ गावांतील तूर पिकावर रोगाचे आक्रमण झाले आहे.

ठळक मुद्देशेतातील पीक पिवळे पडून वाळतेय : शेतकºयांमध्ये धास्ती

सुरेंद्र डाफ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : बोंडअळीने कपाशीचे पीक फस्त केले. यामुळे शेतकरी हवालदिल झाले. आता आर्वी उपविभागातील आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यातील ४९९ गावांतील तूर पिकावर रोगाचे आक्रमण झाले आहे. यात शेतातील उभे तूर पीक पिवळे पडून वाळू लागले आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाल्याचे दिसून येत आहे.आर्वी उपविभागात मागील वर्षी तूर उत्पादकांना समाधानकारक उत्पादन झाले. यामुळे त्यांना आर्थिक हातभार लागला; पण यंदा थंडीचे प्रमाण कमी-अधिक असल्याने याचा थेट परिणाम तूर पिकावर होत आहे. ऐन हातातोंडाशी आलेले तूर पीक वाळत असल्याने या अज्ञात रोगाने शेतकरी चांगलाच धास्तावला आहे. कपाशीनंतर नगदी व कमी खर्चाचे पीक म्हणून तुरीची ओळख आहे; पण अज्ञात रोगामुळे तूर पीक पूर्णत: वाळत आहे. बहुतांश शेतातील तूर पीक पिवळे पडले असून शेंगा वाळत आहे. शेंगा भरत नसल्याने उत्पादनावर परिणाम होणार असल्याचेच दिसते. तालुक्यातील वाठोडा, अहिरवाडा, वागदा, सर्कसपूर, राजापूर, निंबोली (शेंडे), देऊरवाडा, माटोडा, लाडेगाव, एकलारा, टाकरखेडा, नांदपूर, शिरपूर (बो.), जळगाव, वर्धमनेरी, मांडला, खुबगाव, पिंपळखुटा, गुमगाव, दहेगाव (मु.), रोहणा, धनोडी, रसुलाबाद, विरूळ (आ.), बाजारवाडा, हरदोली, पांजरा यासह तालुक्यातील सर्वच तूर उत्पादक शेतकºयांच्या शेतात या अज्ञात रोगाची लागण झाली आहे.कपाशीवर बोंडअळीचे आक्रमण झाल्याने शेतकºयांचे आर्थिक बजेट कोसळले. लागवड खर्चही निघाला नाही. आत तूर पिकावरही अज्ञात रोगाचे आक्रमण झाल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेतकºयाच्या शेतातील उभे पीक वाळत असल्याने तूर पिकही शेतकºयांच्या हातून जाण्याची चिन्हे आहेत.माझ्या शेतातील तीन एकराचे तूर पीक अज्ञात रोगाने वाळत आहे. तूर पिवळी पडली असून संपूर्ण झाडे वाळताना दिसतात. कृषी विभागाने तातडीने सर्व्हे करून मदत देणे गरजेचे आहे.- शिवदास शेंडे, तूर उत्पादक शेतकरी, निंबोली (शेंडे), आर्वी.आर्वी उपविभागातील तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतातील तूर पीक पिवळे पडून वाळत असल्याची तक्रार शेतकरी करीत आहे. कृषी विभागाद्वारे तातडीने उपाययोजना केल्या जातील.- सतीश सांगळे, उपविभागीय कृषी अधिकारी, आर्वी.