शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

चार वैद्यकीय अधिकाऱ्यांवर उपजिल्हा रुग्णालयाचा डोलारा

By admin | Updated: September 5, 2016 00:35 IST

येथील ट्रामा केअर यूनिट व उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची १८ पदे मंजूर आहेत; परंतु केवळ चारच डॉक्टर कार्यरत आहे.

रिक्त पदांमुळे ट्रामा केअर कुचकामी : रोज होते १,५०० बाह्यरुग्णांची नोंद भास्कर कलोडे हिंगणघाटयेथील ट्रामा केअर यूनिट व उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची १८ पदे मंजूर आहेत; परंतु केवळ चारच डॉक्टर कार्यरत आहे. शंभर खाटांचे रुग्णालय २४ तास सेवा देणारे असून येथे नित्याला १ हजार ५०० बाह्यरुग्णांची तपासणी होत आहे. या चार डॉक्टरांच्या भरोशावर उपजिल्हा रुग्णालयाचा डोलारा उभा आहे. असे असले तरी कार्यरत डॉक्टरांवर अतिरिक्त सेवेचा त्रास व तालुक्यातील रुग्णांची हेळसांड होत आहे. याकडे जिल्हा प्रशानानाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. उपजिल्हा रुग्णालय राष्ट्रीय महामार्ग आणि दिल्ली चैन्नई रेल्वे मार्गावर आहे. तसेच नागपूर, चंद्रपूर, उमरेड, पांढरकवडा, वर्धा या जिल्ह्याच्या मध्यभागी आहे. मोठे शहर, मोठी बाजारपेठ म्हणून या शहराची ओळख आहे. शहराची लोकसंख्या रुग्णसंख्या, अपघाताचे प्रमाण त्यानुसार सर्वपरी उपचारासाठी पूर्ण क्षमतेने डॉक्टरांची उपलब्धता आवश्यक आहे; परंतु केवळ चार डॉक्टर शंभर खाटांच्या या रुग्णलयात २४ तास सेवा देत आहेत. उपलब्ध डॉक्टरांपैकी एक डॉक्टर अस्थिरोग तज्ज्ञ, दोन डॉक्टर भूलतज्ज्ञ व एक एमबीबीएस आहे. अशास्थितीत त्वचारोग, नेत्ररोग, बालरोग, प्रसुती, शस्त्रक्रिया, साथीचे आजार, आकस्मिक सेवा व अपघाती रुग्णांना तातडीचे उपचार शक्य होत नाही. राष्ट्रीय आरोग्य अभियानाची यामुळे योग्य प्रमाणात अमंलबजावणी होत नाही. रक्तपेढी असून आकस्मिक वेळी रक्त मिळत नाही. या रुग्णालयात अद्ययावत एक्स-रे मशीन नाही, सोनोग्राफी साठी खाजगी केंद्रात जावे लागते. या रुग्णालयात सेवा मिळत नसल्याने नागरिकांना खासगी अथवा नागपूर येथील महागड्या रुग्णालयात जावे लागत आहे. प्रत्येकाला आर्थिकदृष्ट्या हे शक्य होत नाही. यामुळे त्यांच्यासमोर काय करावे, असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. वेळेवर उपचार न मिळाल्यास येथे अनेकांना जीव गमवावा लागल्याचे वास्तव आहे. हीच अवस्था वडनेरच्या ग्रामीण रुग्णालयाची आहे. तेथे मंजूर तीन डॉक्टर पैकी तीन ही जागा रिक्त आहे. जि. प. अंतर्गत अल्लीपूर, कानगांव, बुरकोनीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील सहा पैकी पाच वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात ३१ पदेवर्धेलगत सावंगी येथील जवाहरलाल नेहरु वैद्यकीय महाविद्यालय व सेवाग्रामचे कस्तुरबा वैद्यकीय महाविद्यालय असताना जिल्हा रुग्णालयात ३१ डॉक्टर पूर्ण क्षमतेने रुग्ण सेवा देत आहे. त्यामुळे हिंगणघाटकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची भावना जनमानसात वाढत आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरण्याची मागणी आहे. हिंगणघाटचा बॅकलॉग भरावा राज्यातील आत्महत्याग्रस्त १० जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्य सेवा मिळावी म्हणून ४१२ डॉक्टरांच्या एक महिन्यापूर्वी मुलाखती घेण्यात आल्या. ते शासनाकडून मिळणाऱ्या आदेशाच्या प्रतीक्षेत आहे. यापैकी २६ डॉक्टर वर्धा जिल्ह्यासाठी मिळणार असल्याने अधिकाधिक वैद्यकीय अधिकारी हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालय व वडनेरच्या ग्रामीण रुग्णालयाला देण्याची मागणी आहे.