शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

मेक इन इंडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी काम करावे

By admin | Updated: March 27, 2016 02:13 IST

आजचे विद्यार्थी हे भावी पिढीचे प्रतिनिधी आहेत. त्यांचे देशासाठी योजदान हे महत्वपूर्ण आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मेक इन इंडिया च्या माध्यमातून काम करायचे आहे.

रामदास तडस : यशवंत कन्या माध्यमिक शाळेत ‘नो व्हेईकल डे’ सायकल रॅलीद्वारे प्रबोधनदेवळी : आजचे विद्यार्थी हे भावी पिढीचे प्रतिनिधी आहेत. त्यांचे देशासाठी योजदान हे महत्वपूर्ण आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मेक इन इंडिया च्या माध्यमातून काम करायचे आहे. असे विचार खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले. स्थानिक यशवंत कन्या माध्यमिक शाळेत शनिवारी सकाळी ‘नो व्हेईकल डे’ बाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार रामदास तडस तर अतिथी म्हणून नगराध्यक्ष शोभा तडस, पोलीस निरीक्षक चंद्रकांत मदने, वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक कोल्हटकर, मुख्याध्यापक उर्मिला मसराम, मुख्याध्यापक अनिल तडस, न.प. सभापती दिलीप कारोटकर व डॉ. श्रावण साखरकर उपस्थित होते. लोकमत वृत्तपत्र समूहाचा उपक्रम म्हणून सर्वात प्रथम खासदार रामदास तडस यांच्या नेतृत्वात सायकल रॅली काढून प्रबोधन करण्यात आले. रॅलीचा समारोप कन्या शाळेच्या प्रांगणात करण्यात आला. येथील औद्योगिक वसाहतीमुळे देवळीला शहराचा दर्जा प्राप्त होत आहे. पॉवरग्रीडच्या माध्यमातून शहराचे नाव देशाच्या नकाशावर आले आहे. महालक्ष्मी सारख्या उद्योगामुळे रोजगारनिर्मिती होत आहे. पण वाढते प्रदुषण चिंतेची बाब आहे. त्यामुळे कारखानदारांनी आकाशात एका विशिष्ट उंचीवर धुरांडे लावून प्रदुषणाचे नियोजन करावे असेही खा. तडस म्हणाले. महिलांच्या पुढाकाराने समाजाची उन्नती होणार आहे. त्यामुळे स्त्रीयांनीही या उपक्रमात सहभागी होण्याची गरज पोलीस निरीक्षक मदने यांनी व्यक्त केली. सुदृढ समाजासाठी ‘नो व्हेईकल डे’ उपक्रम सर्वांच्या हिताचा ठरला आहे. नवीन पिढीला व्यसनापासून दूर ठेवणे गरजेचे आहे. तसेच परिसर निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येकाचे कार्य महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे डॉ. कोल्हटकर यांनी सांगितले. मुख्याध्यापक उर्मिला मसराम यांनीही विचार व्यक्त केले. संचालन पौर्णिमा साखरकर यांनी केले. आभार अर्चना बाराहाते यांनी मानले. कार्यक्रमाला पर्यवेक्षक विजय मांडवकर, रेखा शेरजे, अनिल देशमुख, निर्मला गुल्हाणे, सुधीर राठोड, संगीता मालेकर, वसुंधरा बिरे, प्रतिमा खडगे, नीता चोरे, वंडू वैद्य, प्रा. नितीन आचार्य, प्रा. पंकज चोरे, किरण ठाकरे, गणेश शेंडे, महालक्ष्मीचे प्रकाश दुधकोहळे, अमर मुरार, देवानंद उराडे, शंकर मांजरीवार, सुषमा बाभळे, रजनी टोणपे, प्रतिभा महल्ले, सुरेखा नगराळे, अनिता कापसे, संतोष नागरे, सागर वानखेडे, वनिता बाळबुधे, आशालता डिकोले, कराटे क्लबचे शिवा गोडबोले, सोयल शेख व राजीव गांधी व कन्या शाळेच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.(प्रतिनिधी)