शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
2
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
3
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
4
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
5
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
6
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
7
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
8
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
9
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
10
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
11
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
12
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
13
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी
14
संतापजनक! २ मुलांची आई पडली १७ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात, दोघंही झाले फरार; आता महिलेवर POCSO कारवाई!
15
जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा
16
"मला मावशीच्या मिठीतच शांतता मिळते"; पतीचं बोलणं मनाला लागलं, नवविवाहितेनं टोकाचं पाऊल उचललं!
17
रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द
18
श्रीसंतची दुखापत अन् RR फ्रँचायझीचा ८२ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा! विमा कंपनीची सर्वोच्च न्यायालयात धाव
19
Manoj Jarange: मनोज जरांगे आजच उपोषण सोडणार? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली...
20
Pitru Paksha 2025: गणेशोत्सवानंतर लगेचच पितृपक्ष का? ९० टक्के लोकांना माहीतच नाही खरे कारण!

परवानगीत अडकला विद्यार्थ्यांचा पोषण आहार

By admin | Updated: September 4, 2015 02:03 IST

शासनाकडून साहित्य पुरविण्यात आले नसल्याने गत दोन महिन्यांपासून राज्यभरातील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार मिळाला नाही.

दोन महिन्यांपासून साहित्य नाही : शिक्षकांना तात्पुरती व्यवस्था करण्याच्या सूचना रूपेश खैरी  वर्धाशासनाकडून साहित्य पुरविण्यात आले नसल्याने गत दोन महिन्यांपासून राज्यभरातील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार मिळाला नाही. हे साहित्य पुरविण्याकरिता असलेल्या कंत्राटदाराला अद्याप परवानगी नसल्याने ही अवस्था झाल्याचे पुढे आले आहे. शाळेतील चिमुकल्यांवर आहारापासून वंचित राहण्याची वेळ येवू नये, याकरिता वर्धेत जि.प. मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांनी शिक्षकांना त्यांच्या स्तरावर पोषण आहाराची व्यवस्था करण्याच्या सूचना केल्या आहेत.जिल्हा परिषद शाळेची घटती पटसंख्या व गावातील स्थितीवर मार्ग काढण्याकरिता शासनाच्यावतीने शालेय पोषण आहार योजना अंमलात आणली. ही योजना अंमलात आली त्या काळापासून ती वादाचीच अधिक ठरल्याचे समोर आले आहे. कधी शाळांना मिळणाऱ्या तांदळाचा दर्जा तर कधी इतर साहित्याचा असलेला तुटवडा यामुळे सदैव चर्चा झाली. आता साहित्य पुरविण्याकरिता असलेल्या कंत्राटदाराच्या पुरवानगीचा मुद्दा समोर आला आहे. जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात आहाराचे साहित्य पुरविल्या गेले नसल्याने आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात अद्यापपर्यंत पोषण आहार योजना बंदच असल्याचे दिसून आले आहे.उपलब्ध होते नव्हते साहित्य संपले जिल्ह्यात १,२५५ शाळा शासनाच्यावतीने पुरविण्यात येत असलेल्या पोषण आहाराच्या साहित्याचे वाटप जिल्हा परिषद, नगर परिषद व अनुदिानित खासगी शाळांना पुरविण्यात येते. जिल्ह्यात अशा एकूण १ हजार २५५ शाळा आहेत. यात शालेय पोषण आहार आला नसल्याने या शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहारापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. रोख किंवा उधारीवर तांदूळ खरेदीच्या सूचना शासनाच्यावतीने शालेय पोषण आहार पुरविण्यास अडचणी निर्माण होत असल्याने शिक्षकांनी त्यांच्या स्तरावर विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत; मात्र गत वर्षापासून शिक्षकांच्या वेतनात नियमितता नसल्याने त्यांची आर्थिक स्थिती ढासळल्याचे बोलले जात आहे. शिक्षकांनी त्यांच्या संबंधातील व्यवसायिकाकडून रोख अथवा उधारीत तांदूळ खरेदीच्या सूचना सीईओंनी दिल्या आहेत. शालेय पोषण आहार योजना राबविण्याकरिता शासनाच्यावतीने साहित्य पुरविले जात आहे. यात बऱ्याच शाळांत विद्यार्थी संख्या कमी अधिक होत असल्याने काही प्रमाणात साहित्य शिल्लक राहते. यामुळे शिक्षकांकडून त्या साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविण्यात आला. आज शाळेतील शिल्लक साहित्य पुर्णत: संपले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आता आहार कसा द्यावा, असा प्रश्न त्यांना पडला आहे.