शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
2
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
4
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
5
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
6
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
7
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
8
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
9
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
10
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
11
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
12
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
13
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
14
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
15
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
16
दीर्घकालीन कोमातील रुग्ण आणि दयामरणाचे वास्तव
17
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
18
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
19
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
20
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
Daily Top 2Weekly Top 5

परवानगीत अडकला विद्यार्थ्यांचा पोषण आहार

By admin | Updated: September 4, 2015 02:03 IST

शासनाकडून साहित्य पुरविण्यात आले नसल्याने गत दोन महिन्यांपासून राज्यभरातील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार मिळाला नाही.

दोन महिन्यांपासून साहित्य नाही : शिक्षकांना तात्पुरती व्यवस्था करण्याच्या सूचना रूपेश खैरी  वर्धाशासनाकडून साहित्य पुरविण्यात आले नसल्याने गत दोन महिन्यांपासून राज्यभरातील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार मिळाला नाही. हे साहित्य पुरविण्याकरिता असलेल्या कंत्राटदाराला अद्याप परवानगी नसल्याने ही अवस्था झाल्याचे पुढे आले आहे. शाळेतील चिमुकल्यांवर आहारापासून वंचित राहण्याची वेळ येवू नये, याकरिता वर्धेत जि.प. मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांनी शिक्षकांना त्यांच्या स्तरावर पोषण आहाराची व्यवस्था करण्याच्या सूचना केल्या आहेत.जिल्हा परिषद शाळेची घटती पटसंख्या व गावातील स्थितीवर मार्ग काढण्याकरिता शासनाच्यावतीने शालेय पोषण आहार योजना अंमलात आणली. ही योजना अंमलात आली त्या काळापासून ती वादाचीच अधिक ठरल्याचे समोर आले आहे. कधी शाळांना मिळणाऱ्या तांदळाचा दर्जा तर कधी इतर साहित्याचा असलेला तुटवडा यामुळे सदैव चर्चा झाली. आता साहित्य पुरविण्याकरिता असलेल्या कंत्राटदाराच्या पुरवानगीचा मुद्दा समोर आला आहे. जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात आहाराचे साहित्य पुरविल्या गेले नसल्याने आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात अद्यापपर्यंत पोषण आहार योजना बंदच असल्याचे दिसून आले आहे.उपलब्ध होते नव्हते साहित्य संपले जिल्ह्यात १,२५५ शाळा शासनाच्यावतीने पुरविण्यात येत असलेल्या पोषण आहाराच्या साहित्याचे वाटप जिल्हा परिषद, नगर परिषद व अनुदिानित खासगी शाळांना पुरविण्यात येते. जिल्ह्यात अशा एकूण १ हजार २५५ शाळा आहेत. यात शालेय पोषण आहार आला नसल्याने या शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहारापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. रोख किंवा उधारीवर तांदूळ खरेदीच्या सूचना शासनाच्यावतीने शालेय पोषण आहार पुरविण्यास अडचणी निर्माण होत असल्याने शिक्षकांनी त्यांच्या स्तरावर विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत; मात्र गत वर्षापासून शिक्षकांच्या वेतनात नियमितता नसल्याने त्यांची आर्थिक स्थिती ढासळल्याचे बोलले जात आहे. शिक्षकांनी त्यांच्या संबंधातील व्यवसायिकाकडून रोख अथवा उधारीत तांदूळ खरेदीच्या सूचना सीईओंनी दिल्या आहेत. शालेय पोषण आहार योजना राबविण्याकरिता शासनाच्यावतीने साहित्य पुरविले जात आहे. यात बऱ्याच शाळांत विद्यार्थी संख्या कमी अधिक होत असल्याने काही प्रमाणात साहित्य शिल्लक राहते. यामुळे शिक्षकांकडून त्या साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविण्यात आला. आज शाळेतील शिल्लक साहित्य पुर्णत: संपले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आता आहार कसा द्यावा, असा प्रश्न त्यांना पडला आहे.