शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या स्वेच्छानिवृत्ती योजनेला मिळतोय अत्यल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 05:00 IST

आधीच तोट्यात असलेल्या एस.टी. महामंडळाचे वाहतूक उत्पन्न कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात बुडाले. त्यामुळे वेतनावरील खर्च कमी व्हावा आणि आर्थिक अडचणीतून बाहेर पडावे म्हणून महामंडळाने अधिकारी, कर्मचाऱ्यांकरिता स्वेच्छानिवृत्ती योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ३० जून २०२० रोजी वयाची ५० वर्षे पूर्ण करणाऱ्यांसाठी ही योजना लागू राहणार आहे; तर १ जुलै २०२० ते १ डिसेंबर २०२० पर्यंत नव्याने समावेश होणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबतही विचार केला जाणार आहे.

ठळक मुद्देवर्धा विभागातील पाच आगारांतून केवळ चारच अर्ज प्राप्त : १५०० कर्मचारी कार्यरत

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य परिवहन महामंडळाकडून ५० वर्षांवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या स्वेच्छानिवृत्तीसाठी आतापावेतो केवळ चारच अर्ज प्राप्त झाले आहेत.  राज्यातील २७ हजार कर्मचारी या योजनेसाठी पात्र ठरतील, असा अंदाज एस.टी. महामंडळाने व्यक्त केला होता. त्यासाठी २४ डिसेंबर ही अंतिम मुदतही ठेवली होती. मात्र, अत्यल्प अर्ज प्राप्त झाल्याने अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात येणार असल्याचे समजते. आधीच तोट्यात असलेल्या एस.टी. महामंडळाचे वाहतूक उत्पन्न कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात बुडाले. त्यामुळे वेतनावरील खर्च कमी व्हावा आणि आर्थिक अडचणीतून बाहेर पडावे म्हणून महामंडळाने अधिकारी, कर्मचाऱ्यांकरिता स्वेच्छानिवृत्ती योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ३० जून २०२० रोजी वयाची ५० वर्षे पूर्ण करणाऱ्यांसाठी ही योजना लागू राहणार आहे; तर १ जुलै २०२० ते १ डिसेंबर २०२० पर्यंत नव्याने समावेश होणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबतही विचार केला जाणार आहे. वर्धा विभागांतर्गत  वर्ध्यासह, आर्वी, पुलगाव, तळेगाव (श्यामजीपंत), हिंगणघाट, आदी पाच आगारे आहेत. या संपूर्ण आगारांत २४० बसगाड्या आहेत; तर १५००च्या जवळपास अधिकारी, कर्मचारी आणि कामगार आहेत. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या  वेतनावर महिन्याकाठी २.२५ ते अडीच कोटी इतका खर्च होतो. राज्यातील २७ हजार कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी पुढाकार घेतला तर वेतनासाठीचे दरमहा १०३ कोटी रुपये वाचणार आहेत. स्वेच्छानिवृत्तीसाठी इच्छुक कर्मचाऱ्यांकडून संमतीपत्र, वैयक्तिक माहितीपत्र मागविण्यात आले होते. मात्र,  वर्धा विभागांतर्गतच्या पाचही आगारांतून केवळ चारच अर्ज प्राप्त झाल्याची माहिती विभाग नियंत्रक चेतन हसबनीस यांनी दिली.

वर्धा विभागांतर्गत पाच आगार असून १५०० कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्व कर्मचार्यांच्या वेतनावर महिन्याकाठी २.२५ कोटी रुपये खर्च होतात.

अर्ज सादर करण्यास मिळणार मुदतवाढ या येजनेसाठी निवृत्ती घेणार्या कर्मचार्यांची माहिती उपलब्ध होत नाही तोपर्यंत नेमक्या निधीची मागणी करता येत नाही. महामंडळाने कर्मचार्यांची माहिती गोळा करण्यास सुरूवात केली असून अर्ज सादरीकरणाला मुदतवाढ मिळणार असल्याचे समजते. 

टॅग्स :state transportएसटी