शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
8
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
9
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
10
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
11
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
12
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
13
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
14
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
15
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
16
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
17
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
18
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
19
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
20
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल

एसटीच्या स्वेच्छानिवृत्ती योजनेला मिळतोय अत्यल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 05:00 IST

आधीच तोट्यात असलेल्या एस.टी. महामंडळाचे वाहतूक उत्पन्न कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात बुडाले. त्यामुळे वेतनावरील खर्च कमी व्हावा आणि आर्थिक अडचणीतून बाहेर पडावे म्हणून महामंडळाने अधिकारी, कर्मचाऱ्यांकरिता स्वेच्छानिवृत्ती योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ३० जून २०२० रोजी वयाची ५० वर्षे पूर्ण करणाऱ्यांसाठी ही योजना लागू राहणार आहे; तर १ जुलै २०२० ते १ डिसेंबर २०२० पर्यंत नव्याने समावेश होणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबतही विचार केला जाणार आहे.

ठळक मुद्देवर्धा विभागातील पाच आगारांतून केवळ चारच अर्ज प्राप्त : १५०० कर्मचारी कार्यरत

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य परिवहन महामंडळाकडून ५० वर्षांवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या स्वेच्छानिवृत्तीसाठी आतापावेतो केवळ चारच अर्ज प्राप्त झाले आहेत.  राज्यातील २७ हजार कर्मचारी या योजनेसाठी पात्र ठरतील, असा अंदाज एस.टी. महामंडळाने व्यक्त केला होता. त्यासाठी २४ डिसेंबर ही अंतिम मुदतही ठेवली होती. मात्र, अत्यल्प अर्ज प्राप्त झाल्याने अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात येणार असल्याचे समजते. आधीच तोट्यात असलेल्या एस.टी. महामंडळाचे वाहतूक उत्पन्न कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात बुडाले. त्यामुळे वेतनावरील खर्च कमी व्हावा आणि आर्थिक अडचणीतून बाहेर पडावे म्हणून महामंडळाने अधिकारी, कर्मचाऱ्यांकरिता स्वेच्छानिवृत्ती योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ३० जून २०२० रोजी वयाची ५० वर्षे पूर्ण करणाऱ्यांसाठी ही योजना लागू राहणार आहे; तर १ जुलै २०२० ते १ डिसेंबर २०२० पर्यंत नव्याने समावेश होणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबतही विचार केला जाणार आहे. वर्धा विभागांतर्गत  वर्ध्यासह, आर्वी, पुलगाव, तळेगाव (श्यामजीपंत), हिंगणघाट, आदी पाच आगारे आहेत. या संपूर्ण आगारांत २४० बसगाड्या आहेत; तर १५००च्या जवळपास अधिकारी, कर्मचारी आणि कामगार आहेत. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या  वेतनावर महिन्याकाठी २.२५ ते अडीच कोटी इतका खर्च होतो. राज्यातील २७ हजार कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी पुढाकार घेतला तर वेतनासाठीचे दरमहा १०३ कोटी रुपये वाचणार आहेत. स्वेच्छानिवृत्तीसाठी इच्छुक कर्मचाऱ्यांकडून संमतीपत्र, वैयक्तिक माहितीपत्र मागविण्यात आले होते. मात्र,  वर्धा विभागांतर्गतच्या पाचही आगारांतून केवळ चारच अर्ज प्राप्त झाल्याची माहिती विभाग नियंत्रक चेतन हसबनीस यांनी दिली.

वर्धा विभागांतर्गत पाच आगार असून १५०० कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्व कर्मचार्यांच्या वेतनावर महिन्याकाठी २.२५ कोटी रुपये खर्च होतात.

अर्ज सादर करण्यास मिळणार मुदतवाढ या येजनेसाठी निवृत्ती घेणार्या कर्मचार्यांची माहिती उपलब्ध होत नाही तोपर्यंत नेमक्या निधीची मागणी करता येत नाही. महामंडळाने कर्मचार्यांची माहिती गोळा करण्यास सुरूवात केली असून अर्ज सादरीकरणाला मुदतवाढ मिळणार असल्याचे समजते. 

टॅग्स :state transportएसटी