शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

स्वच्छ ‘वणा’साठी काढला धडक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 22:22 IST

शहर तसेच जवळपासच्या अनेक गावांची जीवनदायीनी असलेल्या वणा नदीचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. शहरातील सांडपाणी, अवैध रेती उपसा, वृक्षतोड, नदीत टाकण्यात येणाऱ्या कचºयामुळे ही नदी प्रदुषित होत आहे. स्वच्छ वणा या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी शहरातून मोर्चा काढून उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आहे. या मोर्चात विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

ठळक मुद्देयोग्य कार्यवाहीसाठी एसडीओंना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : शहर तसेच जवळपासच्या अनेक गावांची जीवनदायीनी असलेल्या वणा नदीचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. शहरातील सांडपाणी, अवैध रेती उपसा, वृक्षतोड, नदीत टाकण्यात येणाऱ्या कचºयामुळे ही नदी प्रदुषित होत आहे. स्वच्छ वणा या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी शहरातून मोर्चा काढून उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आहे. या मोर्चात विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.गेल्या कित्येक वर्षांपासून वणा नदीच्या विद्रुपिकरणात भर पडत आहे; पण त्याकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. याच अनुशंगाने विचार मंथन करून वणा नदीचे अस्तित्व अबाधीत राखण्यासाठी वणा नदी संवर्धन समितीच्यावतीने बुधवारी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात हिंगणघाट शहरातील एकूण ४० विविध सामाजिक संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालये, व्यापारी, किराणा, कपडा, मेडिकल्स, डॉक्टर असोसीएशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकातून काढण्यात आलेल्या मोर्चाने मोहता चौक, टिळक चौक असे मार्गक्रमण करीत वणा नदी परिसर गाठला. या ठिकाणी आंदोलनात सहभागींनी ‘मी नदी अस्वच्छ करणार नाही व तिचे पावित्र्य जपेल’ अशी शपथ घेतली. यावेळी काहींनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष राजेंद्र डागा, समितीचे अध्यक्ष रूपेश लाजूरकर, अनिल जवादे आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी सुनील डोंगरे, आशिष भोयर, अ‍ॅड. सुधीर कोठारी, अ‍ॅड. सागर हेमके, गजू कुबडे, अनिल भोंगाडे, अतुल हूरकट, शुभांगी डोंगरे, प्रदिप नागपूरकर, इकबाल पहलवान, श्याम ईडपवार यांनी मनोगत व्यक्त केले.त्यानंतर या मोर्चाने उपविभागीय महसूल कार्यालय तसेच तहसील कार्यालय गाठले. तेथे अधिकाºयांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. शिवाय त्यांच्याशी सकारात्मक चर्चा करण्यात आली. तहसीलदार मुंधडा यांनी आंदोलकर्त्यांचे म्हणणे जाणून घेत तातडीने योग्य कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तर उपविभागीय महसूल अधिकारी खंडाईत यांनीही निवेदन स्विकारून योग्य कार्यवाहीचे आश्वासन दिले. तसेच ३ जुलैला नगरपालिका, पाटबंधारे विभाग, आरोग्य, महसूल, कृषी, जीवन प्राधिकरण आदी विभागांच्या अधिकाºयांची बैठक बोलावू असेही सांगितले.स्वच्छ आणि सुंदर हा उद्देश केंद्रस्थानी ठेऊन हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या निमित्ताने विविध सामाजिक संघटनांनी आम्ही एक आहो असाच संदेश दिला. वणा नदी संवर्धन समितीच्या नेतृत्त्वात आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाच्या यशस्वीतेकरिता समितीचे सचिव अशोक मोरे, धनराज कुंभारे, पंकज साबळे, तुषार हवाईकर, निरज हवाईकर, संदेश मून, सनी बासनवार, उमेश डेकाटे, सचिन ऐलकुंचवार, अशोक पवनीकर, मयूर तुमाने, दिनेश वर्मा, राकेश शर्मा, प्रशांत बेंडे, डॉ. बि. आर. आंबेडकर शाळेतील शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाºयांनी विशेष सहकार्य केले.