शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
2
अवघ्या १० दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडशी लग्न, लिवरपूलचा स्टार फुटबॉलपटू जग सोडून गेला; स्पेनमध्ये अपघात...
3
एक रिपोर्ट आणि अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स आपटले; करून देत होते मोठा फायदा, आता नुकसान
4
बीडचे पालकमंत्री अजित पवारांच्या पुढाकाराने CIIITचा मार्ग खुला; जागा-निधी देण्याचा निर्णय
5
आज थांबवले नाही तर १०० टक्के उद्या...; मराठी बोलण्यास नकार दिल्यावरुन मारहाण, मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद
6
'माऊस जगलर' वापरून एकाचवेळी ५ कंपन्यात नोकरी; वर्षात ७ कोटींची कमाई; कसा झाला भांडाफोड?
7
नीरेचा नदीकाठ आक्रोशाने गहिवरला; 36 तासानंतर सापडला आजीसोबत पंढरपूरला निघालेल्या गोविंदाचा मृतदेह
8
“तळीये गावातील दरडग्रस्त कुटुंबियांचे लवकरात लवकर पुनर्वसन करावे”; अंबादास दानवेंची मागणी
9
Vastu Tips: शुक्रवारी बांबूचे रोप आणा घरी, लक्ष्मी कुबेर येतील दारी; चुकवू नका योग्य दिशा!
10
Sonam Raghuwanshi : "राजा रघुवंशीच्या हत्येनंतर सोनमने बॉयफ्रेंड राजशी केलं लग्न", सासरच्यांचा खळबळजनक आरोप
11
अहमदाबाद अपघातानंतर एअर इंडियाला आणखी एक धक्का! दिल्ली-वॉशिंग्टनला जाणारे विमान वाटेतच रद्द
12
सापांचा राजा...! किंग कोब्राच्या १८८ वर्षांच्या रहस्यावरून पडदा हटला; डीएनए घेतला अन्...
13
"माझा एक मित्र लाइमलाइटमध्ये राहण्यासाठी वाट्टेल ते करतो..." , कोणाबद्दल बोलतोय प्रियदर्शन जाधव?
14
'माझ्याशी लग्न कर नाही तर तुरुंगात जा!', भर लग्नातून नववधूची पोलिसांकडे धाव; नवरदेवानं काय केलं ऐकाच... 
15
डाबर च्यवनप्राशची बदनामी; रामदेव बाबाच्या पंतजलीला कोर्टाचा दणका! काय दिले आदेश?
16
Gold Silver Price 3 July: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी तेजी, चांदीही १००० रुपयांपेक्षा अधिक महागली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
17
१५ तास लागत होते, आता विठुरायाचे दर्शन ५ तासांत! लाखो भाविक पंढरपुरात, हा चमत्कार झाला कसा?
18
कोल्डड्रिंक पिऊन बेशुद्ध झाला, ५ दिवसांनी शुद्ध येताच मोठा धक्का बसला! तरुणासोबत काय झालं ऐकून होईल थरकाप
19
५ अद्भूत योगात आषाढी एकादशी: ७ राशींना विठुराया पावेल, अपार कृपा; भरघोस भरभराट, शुभ-लाभ काळ!
20
दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना दिलासा, मुंबई पोलिसांची हायकोर्टात महत्त्वाची माहिती

कोट्यवधींच्या रस्त्याला हजारावर ठिगळं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 06:00 IST

तत्कालीन सरकारच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आर्वी नाका-जुना पाणी चौकापर्यंतच्या रस्ता बांधकामाला मंजुरी मिळाली. या कोटी एक-दोन नव्हे तर तब्बल २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. रस्त्याचे बांधकाम सुरू झाले आणि प्रारंभापासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडले. नियोजनाच्या अभावात रस्त्याचे बांधकाम होत असल्याची ओरड होऊ लागली.

ठळक मुद्देसंडे अँकर । आर्वी नाका ते जुनापाणी चौक मार्ग, अल्पावधीतच पितळ उघडे, ‘पॅचिंग’चे काम युद्धस्तरावर सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आर्वी नाका चौक ते जुना पाणी चौकापर्यंत रस्त्याला कित्येक ठिकाणी भेगा गेल्याने कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या रस्त्याला ठिगळं लावण्याची नामुष्की सार्वजनिक बांधकाम विभागावर ओढवली असून हा रस्ता चर्चेचा विषय ठरला आहे. या रस्ता बांधकामाची चौकशी करण्याची मागणी वर्धेकर नागरिकांतून होत आहे.तत्कालीन सरकारच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आर्वी नाका-जुना पाणी चौकापर्यंतच्या रस्ता बांधकामाला मंजुरी मिळाली. या कोटी एक-दोन नव्हे तर तब्बल २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. रस्त्याचे बांधकाम सुरू झाले आणि प्रारंभापासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडले. नियोजनाच्या अभावात रस्त्याचे बांधकाम होत असल्याची ओरड होऊ लागली. तरीदेखील कंत्राटदाराने रस्त्याचे बांधकाम सुरूच ठेवले. रस्ता बांधकाम करताना आर्वी मार्गालगतचे अतिक्रमण हटविण्यात आले नाही. राजकीय पदाधिकाऱ्यांचे हितसंबंध जोपासण्यासाठी अतिक्रमणकर्त्यांकडे डोळेझाक करण्यात आली. याशिवाय अनेक ठिकाणचे वीजखांबही हटविण्यात आले नाही. रस्त्याचे बांधकाम करताना गुणवत्तेचा विचारच झाला नाही. त्यामुळे आज वाहनांच्या आवागमनामुळे अनेक ठिकाणचे सिमेंट निघून जात आहे. तर ठिकठिकाणी शेकडोवर भेगा पडलेल्या असल्याने बांधकाम विभागाच्या वतीने पॅचिंगचे काम मागील आठवडाभरापासून युद्धतस्तरावर सुरू आहे. अल्पावधीतच रस्त्याचे पितळ उघडे पडल्याने गैरप्रकार झाल्याचीही आता ओरड होत आहे. रस्त्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च झालेला निधी पाण्यात गेल्याचेही नागरिक बोलत आहेत.आर्वी मार्गालगत नालीचे नियमबाह्य बांधकामआर्वी मार्गालगत नालीचे बांधकाम केले जात आहे. यात नियोजनाचा प्रचंड अभाव आहे. नाल्या उंच बांधण्यात आल्या असून जुन्या नाल्यांशी त्या मिळत नसल्याने या नाल्यांमधील पाणी जुन्या नाल्यांमध्ये येत आहे. शिवाय नालीचे बांधकाम सरळ न करता नागमोडी पद्धतीने करण्यात आले आहे. याला देखरेखीची जबाबदारी असणाऱ्या अभियंत्यांचीही मूकसंमती असल्याचे दिसून येते. नियमबाह्य आणि निकृष्ट दर्जाचे बांधकाम होत असताना देयकेही अदा केली जात असल्याने बांधकाम विभागाच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त केला जात आहे.हा रस्ताही ठरला विकासाचा ‘नमुना’छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आर्वी नाका चौकापर्यंतच्या रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यात आले. यापूर्वी भूमिगत गटार योजनेचे काम करण्यात आले. मात्र, रस्ता सिमेंटीकरणानंतर चेंबरवर झाकणे बसविण्यात आली. त्यामुळे अनेक ठिकाणी चेंबर व तर कुठे खाली असल्याने वाहनचालकांना येथून जाताना तारेवरची कसरत करावी लागत असून अपघातांना आमंत्रण मिळत आहे. या रस्त्याचे बांधकामही शहरात चर्चेचा विषय ठरले आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक