शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींच्या रस्त्याला हजारावर ठिगळं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 06:00 IST

तत्कालीन सरकारच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आर्वी नाका-जुना पाणी चौकापर्यंतच्या रस्ता बांधकामाला मंजुरी मिळाली. या कोटी एक-दोन नव्हे तर तब्बल २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. रस्त्याचे बांधकाम सुरू झाले आणि प्रारंभापासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडले. नियोजनाच्या अभावात रस्त्याचे बांधकाम होत असल्याची ओरड होऊ लागली.

ठळक मुद्देसंडे अँकर । आर्वी नाका ते जुनापाणी चौक मार्ग, अल्पावधीतच पितळ उघडे, ‘पॅचिंग’चे काम युद्धस्तरावर सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आर्वी नाका चौक ते जुना पाणी चौकापर्यंत रस्त्याला कित्येक ठिकाणी भेगा गेल्याने कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या रस्त्याला ठिगळं लावण्याची नामुष्की सार्वजनिक बांधकाम विभागावर ओढवली असून हा रस्ता चर्चेचा विषय ठरला आहे. या रस्ता बांधकामाची चौकशी करण्याची मागणी वर्धेकर नागरिकांतून होत आहे.तत्कालीन सरकारच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आर्वी नाका-जुना पाणी चौकापर्यंतच्या रस्ता बांधकामाला मंजुरी मिळाली. या कोटी एक-दोन नव्हे तर तब्बल २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. रस्त्याचे बांधकाम सुरू झाले आणि प्रारंभापासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडले. नियोजनाच्या अभावात रस्त्याचे बांधकाम होत असल्याची ओरड होऊ लागली. तरीदेखील कंत्राटदाराने रस्त्याचे बांधकाम सुरूच ठेवले. रस्ता बांधकाम करताना आर्वी मार्गालगतचे अतिक्रमण हटविण्यात आले नाही. राजकीय पदाधिकाऱ्यांचे हितसंबंध जोपासण्यासाठी अतिक्रमणकर्त्यांकडे डोळेझाक करण्यात आली. याशिवाय अनेक ठिकाणचे वीजखांबही हटविण्यात आले नाही. रस्त्याचे बांधकाम करताना गुणवत्तेचा विचारच झाला नाही. त्यामुळे आज वाहनांच्या आवागमनामुळे अनेक ठिकाणचे सिमेंट निघून जात आहे. तर ठिकठिकाणी शेकडोवर भेगा पडलेल्या असल्याने बांधकाम विभागाच्या वतीने पॅचिंगचे काम मागील आठवडाभरापासून युद्धतस्तरावर सुरू आहे. अल्पावधीतच रस्त्याचे पितळ उघडे पडल्याने गैरप्रकार झाल्याचीही आता ओरड होत आहे. रस्त्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च झालेला निधी पाण्यात गेल्याचेही नागरिक बोलत आहेत.आर्वी मार्गालगत नालीचे नियमबाह्य बांधकामआर्वी मार्गालगत नालीचे बांधकाम केले जात आहे. यात नियोजनाचा प्रचंड अभाव आहे. नाल्या उंच बांधण्यात आल्या असून जुन्या नाल्यांशी त्या मिळत नसल्याने या नाल्यांमधील पाणी जुन्या नाल्यांमध्ये येत आहे. शिवाय नालीचे बांधकाम सरळ न करता नागमोडी पद्धतीने करण्यात आले आहे. याला देखरेखीची जबाबदारी असणाऱ्या अभियंत्यांचीही मूकसंमती असल्याचे दिसून येते. नियमबाह्य आणि निकृष्ट दर्जाचे बांधकाम होत असताना देयकेही अदा केली जात असल्याने बांधकाम विभागाच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त केला जात आहे.हा रस्ताही ठरला विकासाचा ‘नमुना’छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आर्वी नाका चौकापर्यंतच्या रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यात आले. यापूर्वी भूमिगत गटार योजनेचे काम करण्यात आले. मात्र, रस्ता सिमेंटीकरणानंतर चेंबरवर झाकणे बसविण्यात आली. त्यामुळे अनेक ठिकाणी चेंबर व तर कुठे खाली असल्याने वाहनचालकांना येथून जाताना तारेवरची कसरत करावी लागत असून अपघातांना आमंत्रण मिळत आहे. या रस्त्याचे बांधकामही शहरात चर्चेचा विषय ठरले आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक